शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

Nirjala Ekadashi 2023: निर्जला एकादशीच्या दिवशी भीमाचे नाव घेऊन पोटावर हात फिरवतात; काय आहे ही प्रथा? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 12:33 IST

Nirjala Ekadashi 2023: ३१ मे रोजी निर्जला एकादशी आहे, या एकादशीला जेवायचे तर नाहीच शिवाय पाणीही प्यायचे नाही तरीसुद्धा भीमाचे नाव घेत पोटावर हात फिरवायचा; का? वाचा!

ज्येष्ठ मासातील एक महत्त्वाचे व्रत म्हणजे निर्जला एकादशी. यंदा ३१ मे रोजी म्हणजे येत्या बुधवारी निर्जला एकादशी आहे. हिला 'भीमसेनी एकादशी' असेही म्हणतात. यासंबंधीची एक कथा आहे.

भीमाला भूक आवरत नसे. साहजिकच इच्छा असूनही तो उपवास करू शकत नव्हता. त्यामुळे खिन्न होऊन एके दिवशी त्याने आपली ही व्यथा व्यासांना सांगून उपाय विचारला. त्यावेळेस व्यासांनी त्याला `निर्जला एकादशी' चे व्रत करण्याचा सल्ला दिल. ही एकच एकादशी केल्याने इतर तेवीस एकादशी केल्याचे फळ मिळते. त्याप्रमाणे भीमाने ही एकादशी आनंदाने आणि भक्तीपूर्वक केली. 

गुजरातमध्ये या एकादशीला भीम एकादशी असे दुसरे नावही प्रचलित आहे. तशीच आणखीन एक प्रथाही गुजराथी मंडळी पाळतात. ती म्हणजे अजीर्ण-अपचन या शारीरिक व्याधीपासून मुक्ती मिळावी, म्हणून या दिवशी उपास करतात. शिवाय भीमाचे नाव घेऊन दिवसभरात शक्य होईल तेवढ्या वेळा पोटावरून हात फिरवायचा. मात्र ही प्रथा केवळ गुजरातपुरतीच मर्यादित आहे. पण आपणही ती फॉलो करायला काहीच हरकत नाही. यंदाच्या निर्जला एकादशीला तुम्हीदेखील पोटावरून हात फिरवा, पण स्वतःच्याच! गमतीचा भाग सोडा,  

पण या प्रथेवरुन नेमके काय सुचवायचे असेल?

अनेकदा अशी परिस्थिती येते जेव्हा अन्न पाणी मिळणे अवघड असते. यामागे कारण काहीही असू शकते. प्रवास, अन्न पाण्याचा अभाव, दारिद्र्य किंवा अन्य काहीही! अशा स्थितीत आपल्या तहान-भूकेवर नियंत्रण मिळण्याआधी मनावर नियंत्रण मिळवणे गरजेजे आहे. आपण आपल्या शरीराला तशी सवयच लावत नाही. तहान लागली की पाणी पितो, भूक लागली की घरातले डबे हुडकतो, मिळेल ते खातो, या सवयींमुळे मनावर आणि जिभेवर नियंत्रण राहिलेले नाही. आपल्या शरीराला प्रतिकूल परिस्थितीचीही सवय लावायला हवी, तरच परीक्षा काळात, संकट काळात आपला निभाव लागेल. यासाठी धर्मशास्त्राने योजलेला उपाय म्हणजे दर पंधरा दिवसांनी म्हणजे महिन्यातून दोनदा एकादशीचा उपास! हा उपास पूर्ण दिवस करून दुसऱ्या दिवशी विठ्ठल दर्शनानंतर पारणं फेडलं जातं. म्हणजेच उपास सोडला जातो. एरव्ही एकादशीला फळे खाण्याची, पाणी पिण्याची मुभा असते, पण निर्जला एकादशीला पाणीही पिऊ नयेत असे शास्त्र संकेत आहेत. खडतर परिश्रमाशिवाय अन्नाचे आणि परिस्थितीचे मोल कळणार नाहीत. आणि प्रश्न राहिला या प्रथेचा, तर आपण जसे भरल्या पोटावरून हात फिरवतो तसे रित्या पोटावरून समाधानाने हात फिरवायला अर्थात प्रतिकूल परिस्थितीतही आनंदाने, समाधानाने जगायला शिकले पाहिजे, हा त्यामागील हेतू असावा!

टॅग्स :Healthआरोग्य