शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

New year 2021: २०२१ मध्ये कोणत्या व्यक्तींना यश मिळेल जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: December 28, 2020 19:14 IST

New year 2021: येत्या काळात तीच व्यक्ती टिकून राहील, तीच व्यक्ती राज्य करेल, तीच व्यक्ती बदल घडवू शकेल, जिच्याजवळ सकारात्मकतेचा मोठा स्रोत असेल.

ज्योत्स्ना गाडगीळ 

थांबा थांबा. शीर्षक वाचून, सदर लेख भविष्याशी निगडीत आहे, असे कदाचित आपल्याला वाटू शकेल. परंतु नाही. हा लेख भविष्य कथन करण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणारा आहे. 

हेही वाचा : २०२१ मधील 'अच्छे दिन'; जाणून घ्या, पुढच्या वर्षीचे सण-वार-उत्सव-मुहूर्त

१ जानेवारी हे हिंदूंचे नववर्ष नाही, तरीदेखील आपले दैनंदिन व्यवहार इंग्रजी तारखेनुसार चालतात. त्यामुळे इंग्रजी सालाप्रमाणे त्याचे स्वागत ओघाने आलेच. स्वागत म्हटले, की जल्लोष, आनंद, नवे संकल्प या गोष्टीही आल्याच. या सर्व गोष्टींसाठी मुख्यत्वे लागणार आहे, ती म्हणजे प्रचंड सकारात्मकता. येत्या काळात तीच व्यक्ती टिकून राहील, तीच व्यक्ती राज्य करेल, तीच व्यक्ती बदल घडवू शकेल, जिच्याजवळ सकारात्मकतेचा मोठा स्रोत असेल. म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक खूणगाठ मनाशी पक्की बांधून घ्या, ती म्हणजे, परिस्थिती कितीही वाईट असेल, परंतु आपल्याला सकारत्मकतेनेच विचार करायचा आहे. सकारात्मकता अंगी बाणण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील, ती पुढीलप्रमाणे-

चित्रपटात आपण पाहतो, कोणी काही अपशब्द काढला, वाईट बोलले, की नायिका ते वाक्य मध्यातून तोडत नायकाच्या तोंडावर हात ठेवते. या गोष्टी फिल्मी किंवा रोमँटिक वाटतात. परंतु, वास्तवातही कोणी अभद्र बोलले की आपण, त्याला तिथेच हटकतो. कारण, वाईट गोष्टींचा उच्चारही नको. म्हणूनच मनात कितीही वाईट विचार आले, तरी ते एकवेळ कागदावर लिहून काढावे, फाडून टाकावे, पण त्यांचा उच्चार करू नये.

गुगलवर एखादी गोष्ट सर्च केली, की गुगलशी संलग्न असलेल्या सर्व समाज माध्यमांवर संबंधित जाहिराती झळकू लागतात. कारण, या गोष्टी सर्व्हरने आपापसात जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे जी गोष्ट आपण सातत्याने बोलतो, त्या गोष्टीचे आपल्याभोवती वलय तयार होते आणि तशाच गोष्टी घडू लागतात. हा काही चमत्कार नाही, तर हे आपल्याच विचारांनी निर्माण केलेले जाळे आहे. त्यात न अडकता आपल्याला अलिप्तपणे बाहेर पडायचे असेल, तर नकारात्मक विचार, उच्चार टाळले पाहिजेत. बोलायचेच आहे, तर चांगलेच बोलूया, चांगलेच वागूया, चांगलाच विचार करूया. 

आपण बऱ्याचदा, आपल्याजवळ काय आहे, ते न पाहता, काय नाही, त्याचा विचार करत दु:खी होतो. येत्या वर्षात आणि पुढील आयुष्यातही आपल्याला उणिवांचा विचार न करता, जमेची बाजू कोणती, त्याचा विचार करायचा आहे. जे नाही, त्यावर मात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा आहे. तसे केल्याने आपोआपच आपल्या विचारात परिवर्तन घडेल. आपल्या मनाला नैराश्य शिवणार देखील नाही आणि शिवलेच तरी त्यातून बाहेर पडण्याची आपल्या मनाची तयारी असेल.

आपल्या आयुष्यातला मोठा काळ रुसव्या, पुâगव्यांमध्ये, कोण काय बोलला, कसा वागला, या गोष्टींच्या चिंतनात खर्च होतो. त्यामुळे नात्यांचा आणि वेळेच क्षय होतो. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या तिथेच सोडून, दुर्लक्षित करून पुढच्या कामाला सुरुवात केली, तर भूतकाळातल्या कटू आठवणींचा आपल्याला त्रास होणार नाही. फार काळ कोणावर राग न ठेवता, नदीच्या प्रवाहाप्रमाणे आयुष्यही प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न करूया.

कटू आठवणी मागे सोडून भविष्य घडवण्यासाठी सकारात्मकतेने पाऊल टाकणे गरजेचे आहे. आपल्या परिस्थितीतून आपल्याला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते, ती म्हणजे आपण स्वत:! यासाठीच चांगल्या कार्याचा, चांगल्या विचाराचा आणि चांगल्या कृतीचा श्रीगणेशा करूया आणि नव वर्षाचे सहर्षाने स्वागत करूया.

हेही वाचा :2020 इंग्रजी वर्षाअखेरीस गुरुपुष्यामृत योग, ही तर नववर्षाच्या अनुकूलतेची नांदीच!

टॅग्स :New Yearनववर्ष