शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

Navratri 2022: दुसरी माळ : ध्येय गाठायचे तर तपश्चर्या हवीच, हे शिकवणारी देवी ब्रह्मचारिणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2022 10:45 IST

Navratri 2022: देवीची नऊ रूपं हे केवळ अवतार नाहीत तर आदर्श जीवन जगण्याचा वस्तुपाठ आहे.

आई भगवतीचे नवरात्रीतले दुसरे रूप आहे ब्रह्मचारिणीचे! इथे ब्रह्न हा शब्द तपश्चर्या या अर्थी वापरला आहे. ब्रह्मचारिणी अर्थात तपश्यर्या करणारी. वेद, तत्व आणि तप हे ब्रह्न शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. ब्रह्मचारिणी हे देवीचे स्वरूप पूर्ण ज्योतिर्मय आणि भव्य आहे. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलु आहे.

पूर्वजन्मात ब्रह्मचारिणी देवीने हिमालयाच्या वंशात जन्म घेतला होता. तेव्हा महर्षी नारद यांच्या मार्गदर्शनावरून तिने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी खूप मोठी तपपश्चर्या केली होती. याच अत्यंत अवघड तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणून ओळखले जाऊ लागले. देवीने एक हजार वर्षे फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या केली होती. नंतरची शंभर वर्षे फक्त भाज्या खाऊन  तर कधी जमिनीवरो पडलेली बेलपत्रे खाऊन आणि उर्वरित वर्षे कडक उपास करत ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता घोर तपश्चर्या केली होती. देवीने अन्नत्याग करत हळू हळू बिल्वपत्रांचे सेवनही बंद केले, म्हणून तिला `अपर्णा' असेही नाव मिळाले.

Navratri 2022 : पहिली माळ : आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ कसे राहावे याचा परिपाठ देणारी देवी शैलपुत्री!

 हजारो वर्षे तपश्चर्या केल्यामुळे ब्रह्मचारिणी देवीच्या मुखावर तेज आले, मात्र शरीर कृष झाले, क्षीण झाले. तिची अशी अवस्था पाहून आईला तिची काळजी वाटत असे. तिला तपश्चर्येतून जागे करण्यासाठी आईने बऱ्याचदा हाक मारली, ती हाक `उ मा' या नावे गाजली आणि देवीला आणखी एक नाव मिळाले, उमा!

देवीच्या कठोर तपश्चर्येमुळे तिन्ही लोकांत हाहा:कार माजला. देवता, ऋडि, सिद्धगण, मुनि सर्वांनाच देवी ब्रह्मचारिणीच्या तपश्चर्येचा हेवा वाटू लागला. शेवटी खुद्द ब्रह्मदेव आले आणि त्यांनी प्रसन्न होऊन आकाशवाणी केली, `हे देवी, आजवर एवढी कठोर तपश्चर्या कोणीही केली नाही. ती फक्त तूच करू जाणे. तुझ्या तपश्चर्येची चर्चा युगानुयुगे केली जाईल. तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल. भगवान चंद्रमौळी तुला पतिरूपात प्राप्त होईल. आता तू तुझी तपश्चर्या थांबव. लवकरच तुझे वडील तुला घ्यायला येतील, त्यांच्याबरोबर तू परत जा.'

ब्रह्मदेवांचे शब्द खरे ठरले आणि देवीचा भगवान शंकराशी विवाह झाला. ब्रह्मचरिणी देवीची ही कथा दर नवरात्रीत ऐकली जाते. तिच्यासारखी आपणही इप्सित गोष्टीच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या केली पाहिजे, हा त्यामागचा हेतू.

ब्रह्मचरिणी देवीचे हे रूप अनंत फळ देणारा आहे. देवीच्या उपासनेत मनुष्याच्या तप, त्याग, वैराग्य, सदाचार, संयमात वृद्धी होते. आयुष्यातील संघर्षमयी प्रसंगातही मन विचलित होत नाही. देवीच्या कृपेने यश व सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मचरिणी देवीच्या उपासनेमुळे `स्वाधिष्ठान' चक्रात मन स्थिरावते. या स्थितीत पोहोचलेला योगी देवीची कृपा प्राप्त करतो, अशी मान्यता आहे. 

दधाना करपद्माभ्यामक्षमालाकरमण्डलू,देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा।।

टॅग्स :Navratriनवरात्री