शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

Navratri 2021 : दाही दिशांमध्ये व्यापून राहिलेली ऊर्जा प्राप्त करण्यासाठी कुष्मांडा देवीची करा उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 16:30 IST

Navratri 2021 : जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्माण्डाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे.

>> आचार्या विदुला शेंडे 

या देवी सर्वभूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता,नम:स्तस्यै नम:स्तस्यै नम:स्तस्यै नमो नम:।

आश्विन शुद्ध चतुर्थी म्हणजेच घटाची चौथी माळ. या दिवशी कुष्मांडा या देवी शक्तीची साधना करतात. कुष्मांड म्हणजेच कोहळा किंवा तत्सम फळ म्हणजे भोपळा. ज्यांच्यामधे निसर्गदत्त प्राणशक्ती ही सर्वात अधिक आहे. कुष्माण्डाचा आणखी एक अर्थ म्हणजे कुसुम + अण्डज म्हणजेच कुसुमासारख्या, फुलासारख्या सुंदर देवीने केलेली ब्रह्मांडाची निर्मिती.

जेव्हा या चराचर विश्वाचे काहीच अस्तित्त्व नव्हते, तेव्हा परमेश्वरी तत्वाला इच्छा झाली, सृजनाची `एकोऽहम बहुर्यामी' ब्रह्मांड निर्माण करण्याची! तेव्हा या शक्तीची उत्पत्ती झाली व या कुष्माण्डाच्या स्मितहास्यातून विश्वाचे अस्तित्व उदयास आले, म्हणूनच ही आरंभिक अशी आदिशक्ती रूप आहे.

या देवीच्या शक्तीने आणि तेजाने दाही दिशा प्रकाशमान झाल्या. दहा दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, अग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, ऊर्ध्व, अधर. या दशदिशांमधून ही शक्ती आपल्याला ज्ञान देते की पूर्व म्हणजे पुढे बघा. दूरदर्शी व्हा आणि ध्येयाकडे वाटचाल करा. कितीही संकटे आली तरी डगमगू नका. पश्चिम दिशा सांगते मागील चूकातून शहाणा हो. मागील सुंदर आठवणीतून जीवनाचा सुंदर रस अनुभव. उत्तर दिशेकडून कार्यासाठी लागणारी संसाधने हे व धु्रव ताऱ्यासारखे ध्येय व कार्यावर लक्ष अढळ राहू दे. दक्षिण दिशेकडून वेळेचे, काळाचे महत्व जाण. उपदिशांकडून दोन गोष्टींमधले समत्व शीक. संसाधने जोडताना वेळेचे भान ठेव. ऊर्ध्व म्हणजे वरची दिशा सांगते कितीही यश मिळाले तरी पाय जमिनीवर राहू देत व अधर अर्थात खालची दिशा सांगते तुला आसमंत गाठायचा आहे मग घे भरारी आणि तुझ्या कार्याचा उपयोग खालील तळागाळातील समाजासाठी होऊ देत.

अशी ही विश्वशक्ती `वूâष्माण्डा' हीच प्राण ऊर्जा आहे. सर्व वस्तुंची निर्मिती हिच्यातून आहे. त्यामुळे त्यांच्यामधले तेज आणि छाया म्हणजे सावली ही दैवी शक्ती आहे.

ही देवी अष्टभूजा आहे. तिच्या हातात कमंडलू, धनुष्य बाण, कमळ, अमृतकलश, चंद्र, गदा आणि कमंडलू, माला आहे. अमृत कलश हातात आहे म्हणून हिला मोहिनी किंवा मिनाक्षीदेवी असेही म्हणतात. हिच्या हातातील जपमाला साधकाला सर्व सिद्धी व निधी देतात. हिचे वाहन सिंह आहे. 

ज्यांना स्वत:ची वैश्विक, पार्थिव उन्नती हवी आहे, त्यांनी या शक्तीची उपासना करावी. आपल्या शरीरातील अनाहत चक्र या स्थानी ही देवी शक्ती आहे. जिथे लक्ष देऊन साधना केली असता साधकामध्ये निरपेक्ष प्रेम, अनुकंपा, आत्मस्विकृती, किर्ती, सामर्थ्य , आरोग्य प्राप्त होते. हिच्या साधनेने सर्व रोग, शोक, दु:खं दूर होऊन संसाररूपी भवसागर तरुन जाण्याची शक्ती देते. तसेच आध्यात्माची अनुभूती येऊन साधक आत्मोन्नतीकडे जातो. 

या देवीची आराधना पुढील श्लोक म्हणून करतात. 

सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च।दधाना हस्तेपद्माभ्यो कुष्माण्डा शुभदास्तुमे।

या दैवी शक्तीने जागृत झालेल्या प्रेमाने अनुवंâपेने साधकामधील राग, द्वेष इ. फळून जातो. जरी आधीच्या पिढीकडून रागीट स्वभाव आला, तरी तो स्वभाव वितळून जातो, असे ऋषी वेदांतामध्ये सांगतात. तमस आणि राक्षसी वृत्ती नष्ट होते. वाईट, अमंगल, अविचार निघून जातात. ही फक्त प्रेम आणि करुणा देते. हीची प्रार्थना करूयात-

दुर्गविनाशिनी त्वंहि दारिद्र्यादि विनाशिनीजगन्माता जगत् कर्ती जगदाधार रुपिणीम।चराचरेश्वरी कुष्माण्डे प्रणमाम्यहमत्रैलोक्यसुंदरी त्वं हि दु:ख, शोक, निवारिणीम,परम आनंदमयी कुष्माण्ड प्रणमाम्यहम।

टॅग्स :Navratriनवरात्री