शहरं
Join us  
Trending Stories
1
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
2
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
3
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
4
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
5
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
6
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
7
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
8
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
9
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
10
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
11
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
12
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
13
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
14
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
15
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
16
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
17
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
18
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
19
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
20
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!

Navratri 2021 : नवरात्रीत देवीची केवळ पूजा नाही तर 'शक्तीची उपासना' करा! - प.पु. पांडुरंगशास्त्री आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 12:13 IST

Navratri 2021 : या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस, तेच नवरात्रीचे दिवस!

ठळक मुद्देआपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिले आहे. आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे.क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायची शक्ती प्रदान करील. 

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीची उपासना करण्याचे दिवस. जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत, तर त्यांचे अस्तित्त्व टिकून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते. जगात तपश्चर्येला यश मिळते. ही गोष्ट सत्याच्या उपासकांनी विसरता कामा नये. तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत मूल्ये देखील विजयी झाली आहेत, ही गोष्ट आपल्याला उपरोक्त सत्याची अंधुक कल्पना देते. दुर्बळ लोकांचे सत्य, संस्कार किंवा संस्कृती यांची कोणी पूजा करत नाही. 

आश्विन महिन्यात येणाऱ्या या नवरात्र उत्सवाबाबत एक पौराणिक कथा प्रसिद्ध आहे. महिषासुर नावाचा एक राक्षस अतिशय प्रभावी बनला होता. त्याने स्वत:च्या सामर्थ्याच्या बळावर सर्वच देवांना व मनुष्यांना 'त्राहि माम्' करून सोडले होते. दैवी विचारांची प्रभा अस्पष्ट बनली होती व दैवी लोक भयग्रस्त झाले होते. 

धैर्य घालवून बसलेल्या देवांनी ब्रह्मा, विष्णु, महेश यांची आराधना केली. देवांच्या प्रार्थनेने प्रसन्न झालेल्या आद्य देवांना महिषासुराचा राग आला. त्यांच्या पुण्यप्रकोपातून एक दैवीशक्ती निर्माण झाली. सर्व देवांनी जयजयकार करून ती सांभाळली, तिचे पूजन केली. तिला स्वत:च्या दिव्य आयुधांनी मंडित केली. या दैवी शक्तीने नऊ दिवस अविरत युद्ध करून महिषासुराला मारले. आसुरी वृत्तीला दाबून, दैवी शक्तीची पुन्हा स्थापना करून देवाला अभय दिले. ही दैवी शक्ती तीच आपली जगदंबा!

या दिवसात आईजवळ शक्ती मागायची व आसुरीवृत्तीवर विजय मिळवायचा. आजही महिषासुर प्रत्येकाच्या हृदयात स्वत:चे स्थान जमवून बसला आहे आणि आत असलेल्या दैवी वृत्तीना गुदमरवून सोडले आहे. या महिषासुराच्या मायेला ओळखले पाहिजे. तिच्या आसुरी जुलमापासून मुक्त होण्यासाठी आवश्यकता आहे दैवी शक्तीच्या आराधनेची. नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवून आई जगदंबेची पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे दिवस, तेच नवरात्रीचे दिवस!

आपली चुकीची समजूत आहे, असूर म्हणजे मोठ्या दाताचे, मोठ्या नखांचे, लांब केसांचे, मोठे डोळे असलेले कोणी भयंकर राक्षस! खरे पाहता असुर म्हणजे 'असुषु रमन्ते इति असुर:' प्राणातच रममाण होणारे, भोगातच रममाण होणारे! तसेच महिष म्हणजे रेडा. त्या दृष्टीने पाहता रेड्याची वृत्ती बाळगणारा तो महिषासुर. रेडा नेहमी स्वत:चेच सुख पाहतो. समाजात ही रेड्याची वृत्ती पसरत चालली आहे. परिणामत: संपूर्ण समाज स्वार्थी, प्रेमविरहित व भावशून्य बनला आहे. समाजात आज व्यक्तिवाद व स्वार्थैकपरायणता अमर्याद बनून महिषासुर रूपात नाचत आहे. या महिषासुराच्या नाकात वेसण घालण्यासाठी आईजवळ सामथ्र्य मागण्याचे दिवस म्हणजे नवरात्राचे दिवस!

आपल्या वेदानीही शक्तीच्या उपासनेला फारच महत्त्व दिले आहे. महाभारताचे पानन् पान बलोपासना व शौर्यपूजा यांनी भरलेले आहे. व्यास, भीष्म व कृष्ण यांची सर्वच भाषणे तेज, ओज, शौर्य, पौरुष व पराक्रम यांनी भरलेली आहेत. महर्षी व्यासांनी पांडवांना शक्ती उपासनेचे महत्त्व समजावले आहे. त्यांनी पांडवांना उपदेश केला की, तुम्हाला जर धर्माची मूल्ये टिकवायची असतील तर हात जोडून, बसून चालणार नाही. शक्तीची उपासना करावी लागेल. अर्जुनाला दिव्य अस्त्र प्राप्त करण्यासाठी व्यासांनी स्वर्गात जाण्याची सूचना केली होती. 

अनादि कालापासून आसुरीवृत्ती सद्विचार, दैवी विचारावर मात करत आलेली आहे आणि दैवी विचार अडचणीत येताच देवांनी भगवंताजवळ शक्ती मागितली आहे. सामर्थ्य मागितले आहे आणि आसुरीवृत्तीचा पराभव केला आहे. केवळ सद्विचार आहेत तेवढे पुरत नाहीत. त्यांचे रक्षण होणेदेखील आवश्यक आहे. आणि त्यासाठी शक्तीची उपासना आवश्यक आहे. 

आपणही आळस झटकून, क्षणिक प्रमादाना दूर सारून पुन्हा शक्तीची उपासना सुरू केली पाहिजे. `संघे शक्ति: कलौ युगे' ही गोष्ट ध्यानात ठेवून नवरात्राच्या दिवसात दैवी विचारांच्या लोकांची  संघटना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संघटनेत प्रामुख्याने जगदंबा असेल आणि तिच्या भक्तीनेच आपल्यात शक्ती प्रगट होईल हे सुचवण्यासाठी नवरात्राच्या दिवसात गरबा किंवा रास यांच्या रूपात देवीच्या भोवती फिरायचे असते. देवीच्या सभोवती फिरता फिरता सांगितले पाहिजे की, `माते, तू आम्हाला सद्बुद्धी दे, आम्हाला संघबळ दे. आमच्या संघबळाच्या आड आमचा अहंकार येतो, आमची महिषवृत्ती जागृत होते, आमचे द्वेष उफाळून येतात, त्यांना तू खाऊन टाक.'

आई जगदंबेची आपली ही उपासना नवरात्रात सुरू होते. पण ती केवळ नऊ दिवसांपुरती सीमित राहू नये, हे ध्यानात ठेवण्याची गरज आहे. क्षणाक्षणाची शक्ती उपासना आपल्याला जडवादी जगात उभे राहायची शक्ती प्रदान करील. 

नवरात्राचे दिवस म्हणजे शक्तीच्या उपासनेचे दिवस. आईच्या पूजेचे दिवस. 'खा, प्या, मजा करा' अशा आसुरी विचारश्रेणीवर विजय मिळवण्याचा दिवस. संघशक्तीचे महत्त्व व भक्तीची महत्ता समजवण्याचे दिवस. तसेच तपश्चर्येचा महिमा व एकता यांचे महत्त्व समजवणारे दिवस. या दिवसात घुमत असलेला साधनेचा सूर पकडून जीवन समर्पणाच्या संगीताने भरून टाका!

जगदंब उदयोऽस्तु!

टॅग्स :Navratriनवरात्री