शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2020 : नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : सहावी माळ: कात्यायनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 07:30 IST

Navratri 2020 : कात्यायनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते. भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो.

चंद्रहासोज्ज्वलकरा शार्दूलवरवाहनाकात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।

देवी दुर्गेचे सर्वपरिचित रूप म्हणजे देवी कात्यायनी. देवीला ही ओळख मिळण्यामागे एक कथा आहे. कत् नामक एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांचे पुत्र ऋषि कात्य असे त्यांचे नाव होते. याच कात्य ऋषिंच्या गोत्रात विश्वप्रसिद्ध महर्षि कात्यायन यांचा जन्म झाला. त्यांनी भगवती पराम्बा हिची अनेक वर्षे कठोर तपश्चर्या केली. आई भगवतीने त्यांच्या कुळात जन्म घ्यावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन देवीने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या कुळात जन्म घेतला. 

हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : पाचवी माळ: स्कंदमाता 

काही कालानंतर जेव्हा महिषासुर नावाचा असूर पृथ्वीवर अत्याचार करू लागला, तेव्हा त्याचा नायनाट करण्यासाठी भगवान विष्णू, ब्रह्मदेव आणि भगवान शंकर यांनी आपल्या शक्तीचा अंश एकवटून देवीला आवाहन केले. महर्षी कात्यायनांनी त्यांची सर्वप्रथम पूजा केली आणि त्यांचीच देवीला ओळख मिळाली, व ती कात्यायनी म्हटली जाऊ लागली. 

त्याचप्रमाणे आणखीही एक कथा ऐकायला मिळते, की महर्षी कात्यायन यांच्या वंशात देवीने जन्म घेतला. अश्विन कृष्ण चतुर्दशीला जन्म घेऊन शुक्ल सप्तमी, अष्टमी, नवमीपर्यंत तीन दिवस कात्यायन ऋषिंनी देवीचे अनुष्ठाण मांडले आणि त्याच कालावधीत देवी कात्यायनीने दशमीला महिषासूराचा वध केला. 

देवी कात्यायनी अमोघ फलदायिनी आहे. भगवान श्रीकृष्णांना पतिरूपात मिळवण्यासाठी गोपिकांनी देवी कात्यायनीचेच व्रत केले होते. देवीचे रूप अत्यंत भव्य-दिव्य आहे. तिचा वर्ण सोनेरी आणि तेजस्वी आहे. तिला चार भुजा आहेत. एका हाताने देवी आशीर्वाद देत आहेत, तर दुसऱ्या हाताने अभय देत आहे. तिसऱ्या हातात तलवार आहे आणि चौथ्या हातात कमळ आहे. देवी कात्यायनी सिंहासनावर आरूढ झाली आहे. 

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची उपासना केली जाते. त्या दिवशी साधकाचे मन `आज्ञा' चक्रात स्थिरावते. योगसाधनेत आज्ञा चक्राला महत्त्वपूर्ण स्थान आहे. या चक्रात स्थित असलेला साधक आई कात्यायनीच्या चरणी सर्वस्व अर्पण करून शरण जातो. त्याच्या समर्पित भावामुळे देवी प्रसन्न होऊन त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करते. 

कात्यायनी देवीच्या उपासनेमुळे साधकाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष प्राप्त होते. भूतलावर राहून अलौकिक तेज आणि प्रभाव प्राप्त होतो.  रोग, शोक, संताप, भय सर्व नष्ट होते. तसेच जन्मोजन्मीच्या पापातूनही मुक्तता होते. यासाठी देवीच्या उपासनेला पर्याय नाही. देवी कात्यायनी आपल्या भक्ताचे अनंत अपराध आपल्या पोटात घेते. सदैव तिच्या सान्निध्यात राहून साधकाने परमानंदाचा अनुभव घ्यावा आणि तिच्या कृपाछायेत आयुष्य व्यतित करावे. 

हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : चौथी माळ: कूष्माण्डा

टॅग्स :Navratriनवरात्री