शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

Navratri 2020 :नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : सातवी माळ: कालरात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 07:30 IST

Navratri 2020 :जो चुकीचे वागतो, त्याला शिक्षा होण्याची भीती असते. कर नाही, त्याला डर कशाला? शुद्ध चारित्र्य आणि शुद्ध आचरण असलेल्या भक्तांना देवी अभय देते. संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभी राहते.

एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिातालम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणीवामपादोल्लसल्लोहलताकण्टभूषणावर्धन्मूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयंकरी।।

आई दुगेचे सातवे रूप कालरात्री या नावाने परिचित आहे. तिचा रंग गडद काळ्या अंधारासारखा आहे. केस अस्ताव्यस्त पसरले आहेत. गळ्यात विद्युल्लतेची चकाकणारी माळ घातली आहे. ती त्रिनेत्रा आहे. हे तीन डोळे ब्रह्मांडाप्रमाणे गोल आहेत. देवीच्या तेजासमोर वीजेचे तेज फिके पडते. देवीच्या श्वासोच्छासातून अग्नीचे लोळ निघताना दिसतात. देवीने गाढवाला आपले वाहन निवडले आहे. देवी एका हाताने आशीर्वाद तर एका हाताने अभय देत आहे. आणखी दोन हातापैकी एका हाता लोखंडी अवजार आणि दुसऱ्या हातात रक्ताने माखलेले खड्ग आहे. 

हेही वाचा : Navratri 2020 : नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : सहावी माळ: कात्यायनी

कालरात्रिचे स्वरून दिसायला अतिशय भयंकर असले, तरी त्यात पुरेपूर आवेश आहे. देवी दुष्टांचा नायनाट करते, सृजनांना भरभरून आशीर्वाद देते. कालरात्रि भक्तांचे प्रत्येक कार्य शुभ करणारी आहे, म्हणून तिला शुभंकरी देखील म्हटले आहे. देवीच्या उग्र रूपाने भक्तांना भय वाटण्याचे कारण नाही, भय वाटले पाहिजे, ते दृष्कृत्य करणाऱ्या राक्षसांना, दुष्ट लोकांना.

दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माता कालरात्रिकीची उपासना केली जाते. या दिवशी साधकाचे मन `सहस्रार' चक्रात स्थित होते. त्या स्थितीत मन पोहोचल्यावर समस्त ब्रह्माण्डाची द्वारे खुली झाल्यासारखे वाटते. मनुष्य पाप-पुण्याच्या पलीकडे जातो. अहम् ब्रह्मास्मि, चा शोध लागला, की मनुष्याच्या हातून दुष्कृत्ये घडत नाहीत, कारण तो परमानंदात रममाण झालेला असतो. 

माता कालरात्री दुष्टांचा विनाश करणारी आहे. दानव, दैत्य, राक्षस, भूत, प्रेत यांच्या नुसत्या स्मरणाने आपला थरकाप होतो. मात्र देवी त्यांच्यामुळे आपल्या लागलेली पीडा नष्ट करते. देवीच्या उपासकांना अग्नि, जल, जंतु, शत्रू, रात्री इ. कोणत्याही गोष्टींचे भय राहत नाही. देवीला आदर्श मानून तेही शक्तीउपासक होतात आणि अंतर्गत भीतीवर मात करतात.

जो चुकीचे वागतो, त्याला शिक्षा होण्याची भीती असते. कर नाही, त्याला डर कशाला? देवी शुद्ध चारित्र्य आणि शुद्ध आचरण असलेल्या भक्तांना अभय देते. संकटकाळी त्यांच्या पाठीशी उभी राहते. आपल्यालाही तिची कृपादृष्टी व्हावी वाटत असेल, तर आपणही यम, नियम, संयमाचे पालन केले पाहिजे. काया, वाचा, मन पवित्र ठेवले पाहिजे. आपले प्रत्येक कार्य तिच्या साक्षीने केले  पाहिजे आणि तिलाच समर्पित केले पाहिजे. देवीचे आपल्यावर लक्ष आहे, या आदरयुक्त भीतीने आपली पावले वाममार्गावर पडणार नाहीत आणि शुभंकरी देवी सदैव आपले कल्याण करेल.

कालरात्रि देवी की जऽऽऽय!

हेही वाचा : Navratri 2020: नवदुर्गांचे स्वरूप आणि महात्म्य : पाचवी माळ: स्कंदमाता 

टॅग्स :Navratriनवरात्री