शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

Narad Jayanti 2022 : कळीचा नारद? छे! हे तर कळकळीचे नारद; वाचा महर्षी नारदांची वैशिष्टये!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 16:44 IST

Narad Jayanti 2022 : मालिका, सिनेमांमधून महर्षी नारदांची विनोदी आणि चुकीची प्रतिमा रेखाटली गेली आहे. वास्तविक तसे नसून या व्यक्तिमत्त्वाचे अनेक गुण घेण्यासारखे आहेत, कोणते ते बघा.

१७ मे रोजी महर्षी नारद यांची जयंती आहे. ते आद्य कीर्तनकार म्हणून ओळखले जातात. याबरोबरच त्यांची अनेक स्वभाव वैशिष्ट्य आहेत. ते निस्सीम विष्णुभक्त आहेत. जाणून घेऊया त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी!

ब्रम्हदेवांचा मानसपुत्र, विष्णुंचा प्रियभक्त, त्रैलोक्यात संचार करणारे देवदानवांनंतरचे एकमेव मुनी. ऑल स्पेस परमीट. क्षणात इकडे तर क्षणात तिकडे. देव, दानव, मानव, पशू पक्षी सर्वांशी मैत्री. जगन्मित्र, अजातशत्रु.

व्यक्तिमत्त्व अगदी साधे, धोतर, उपरणे, एका हातात वीणा दुसर्‍या हातात चिपळया, मुखी भगवंताचे अखंड नामस्मरण. मानवासारखेच सर्व विकार व विचार असलेले मानवाचे मानवरूपी प्रतिनिधी. संकटकाळी देवाच्या आधी धावून जाणारे (जसे आपल्या खाजगी चानेलचे प्रतींनिधी शासनाच्याही आधी जाऊन पोहोचतात तसे) कोणतेही स्मरण कोणीही केलेले नसतांना धाऊन जाणारे संकटमोचक अशी त्यांची खरी ओळख आहे. 

डोक्यात भरपूर कल्पना असणारे, कल्पनाशक्तीचे विपुल भांडार. आधुनिक गुगल ऋषी. संगणक देवताच जणू! कधी हार न मानणारे व उदास न होणारे. प्रख्यात वकिलासारखा युक्तिवाद मांडून, प्रसंगी भांडून, कोणत्याही समस्येवर तोडगा काढून, शेवट गोड करणारे असे हे महर्षी नारद!

देवही संभ्रमीत होतील अशा कठीण प्रसंगी धीर न सोडता, आपल्या गोलमाल व गोडगोड बोलण्याने समोरच्यावर छान छाप पाडून, अगदी स्वतःला बुद्धिमान समजणार्‍या भल्या भल्या उन्मत्त राक्षसी वृत्तीच्या उच्चपदस्थांनाही सहज कह्यात घेणारे (उल्लू बनवणारे) नारद. अगा असा मुनी झालाची नाही.

त्यांच्यावर आरोप खूप झाले. कळीचा नारद, (खरे तर ह्यांना बघितलेच की अनेकांची कळी खुलायची, काहीतरी नवे घडणार, किंवा ऐकायला मिळणार!! म्हणून कळीचा नारद), आगलाव्या नारद, लावालाव्या करणारा, काड्या करणारा, भांडण लावून देऊन, दुरून मजा बघणारा. पण इतके आरोप होवूनही हे महाराज भक्तीत गुंग. त्यांनी कधीही हे सर्व आरोप मनावर घेतलेच नाही की रागाने फुगून बसले नाहीत.

बहुजनहित व नीतीची, धर्माची बाजू घेणे, न्यायाने तडजोड करणे, हेच त्यांचे ब्रीद होते. पृथ्वीतलावरच्या यच्चयावत समाज हितासाठी, विकासासाठी, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांसारीक, भौतिक, सांस्कृतिक क्षेत्रात दिवस रात्र संशोधन करून तन मन धनाने कार्यरत असणार्‍या प्रत्येक व्यक्तीची नोंद घेत, पालनकर्त्या विष्णूंना त्वरेने जाऊन ते जगातील नववे आश्चर्य म्हणून सांगून त्यांच्या कार्याचा उचित बहुमान घडविण्यासाठी त्यांना “जीवनगौरव” देऊन सत्कार करा सांगणारे आपले नारदच. त्यांच्यामुळेच कित्येक दुर्लक्षित संत, महंत, ऋषि, मुनि, शास्त्रज्ञ, विद्वान, कलावंत, भक्त, जपी, तपी, असे अज्ञाताच्या पडद्याआड असलेले गुणवंत धूलरत्न, जगासमोर आणले गेले. वाल्मिकी, ध्रुव, प्रह्लाद, अनसूया, गौतम ऋषि, भगीरथ, मार्कंडेय, संदीपक, असे अनेक जे प्रसिद्धी टाळत होते, त्यांना त्यांनी त्यांच्या कार्यासहित उजेडात आणले.

अगदी कोणाच्याही दालनात, कोणत्याही वेळेत त्यांना मुक्त प्रवेश होता. मग आता  सांगा, अशी व्यक्ति का नाही आवडणार आबालवृद्धांना? प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचनात यांची उपस्थिती गुप्त सुप्त रूपात किंवा कोणत्याही रूपात श्रवणभक्तिसाठी ते असतातच. कारण तेथे भगवंताचे अधिष्ठान असते.जिथे नारायण तिथे महर्षी नारद!