शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

श्रावण सोमवार विशेष: प्रभू श्रीराम यांनी आराधना केली म्हणून रामेश्वर नामकरण

By विलास.बारी | Updated: August 20, 2023 19:25 IST

जळगावातील रामेश्वर मंदिराचा स्कंद पुराणात उल्लेख, प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासादरम्यान या ठिकाणी दोन महिने मुक्कामी राहिले होते

विलास बारी

जळगाव - तापी- गिरणा व अंजनी या तीन नद्यांच्या संगमावर वसलेले एक अपरिचित व प्राचीन दोन शिवलिंग असलेले पवित्र तीर्थक्षेत्र रामेश्वर म्हणून नावारूपाला आले आहे.  ऋषी विश्वामित्र यांची ही तपोभूमी म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी ऋषी विश्वामित्रांनी गायत्री यज्ञ करण्याचे नियोजन केले होते. आजही या ठिकाणी त्या यज्ञाची रक्षा भाविकांना देण्यात येत असते. श्री राम आणि लक्ष्मण यांनी आपल्या वडिलांची आज्ञा घेऊन ऋषी विश्वामित्रासोबत या दंडकारण्य् म्हणजे सिद्धाश्रमात यज्ञाची रक्षा करण्याकरिता या ठिकाणी आल्याची आख्यायिका आहे.

प्रभू राम यांचे दोन वेळा आगमन

प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता वनवासादरम्यान या ठिकाणी दोन महिने मुक्कामी राहिले होते. या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांनी राजा दशरथ यांचा दशक्रिया विधी तापी नदीच्या काठी पूर्ण केला होता. यावेळी सिद्धाश्रमात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी आपल्या हातांनी दोन शिवलिंगांची स्थापना केले होती. प्रभू श्रीराम यांनी या ठिकाणी ईश्वराची आराधना केली म्हणून या ठिकाणाला रामेश्वर असे नाव पडल्याची माहिती स्कंद पुराणात असल्याचे रामेश्वर मंदिरातील नारायण स्वामी व सेवेकरी हिम्मत कोळी यांनी सांगितले आहे.

या ठिकाणी कसे येणार

जळगाव शहरापासून ४५ कि.मी. अंतरावर हे मंदिर आहे. कानळदा, घार्डी, आमोदा, भोकर, पळसोद मार्गे रामेश्वर मंदिरावर जाता येऊ शकते.

पाळधीकडून येताना २२ कि.मी. झुरखेडा, गाढोदा, जामोद, पळसोद मार्गे रामेश्वर तीर्थस्थळावर जाता येते.

धरणगाव येथून सुमारे २६ कि.मी. सोनवद, गाढोदा, पळसोद मार्गे रामेश्वर मंदिरावर जाता येते.

या ठिकाणी जळगाव शहरातून रामेश्वर मंदिरावर जाण्यासाठी दिवसभरातून चार वेळा एसटी बस आहे. मात्र भाविकांच्या निवासाची व्यवस्था या ठिकाणी नसल्याने सकाळपासून सायंकाळपर्यंत दर्शन घेऊन परत जाता येऊ शकते.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशल