शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

Motivational Story: पंचवीस वर्षांचे आयुर्मान मिळालेला मनुष्य शतायुषी कसा झाला? वाचा त्यामागची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2024 14:44 IST

Inspirational Story: किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे पाहणं महत्त्वाच आहे, त्यासाठी हे आयुष्य कसं आणि किती मिळालं आहे तेही जाणून घ्या.

एका साधुमहाराजांना एका सज्जनाने प्रश्न विचारला, `महाराज, माणसाचे आयुष्य सर्वसाधारण किती असते?'महाराज म्हणाले, `पंचवीस वर्षे'आश्चर्यचकित होत सगळे म्हणू लागले, `महाराज ते कसे काय?'महाराज सांगू लागले, एक रुपक कथा आहे.जेव्हा ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली, त्यावेळी ईश्वराने प्रत्येक प्राण्याचे आयुष्य निश्चित केले. प्रत्येकी पन्नास वर्षे. मनुष्य ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ कलाकृती असल्याने मनुष्याला घडवायला देवाला अधिक वेळ लागला. म्हणून मग देवाने माणसाला आयुष्य दिले, फक्त पंचवीस वर्षे. सगळ्या प्राण्यांना-पक्ष्यांना पन्नास वर्षे आयुष्य आणि आपल्याला फक्त पंचवीस वर्षे? मनुष्य बुद्धिवादी प्राणी असल्याने त्याला वाटू लागले की ईश्वराने आपल्यावर अन्याय केला आहे. त्याने ईश्वराजवळ तक्रार केली. `देवा, पंचवीस वर्षांच्या आयुष्यात मला काहीच आनंद मिळवता येणार नाही. थोडे अधिक आयुष्य वाढवून दिले असते तर...'

ईश्वराने सांगितले, `माझ्या व्यवस्थेप्रमाणे मी वाटप केले आहे़ जर तुला ते कमी वाटत असेल, तर त्या प्राण्याला आपले आयुष्य जास्त वाटत असेल, तर त्याच्याकडून तू खुशाल घेऊ शकतोस.'थोड्या वेळाने बैल आला आणि ईश्वराला म्हणाला, `देवा पन्नास वर्षे आयुष्य माझ्यासाठी खूप जास्त होईल. त्यातले पंचवीस वर्षे कमी केले तर बरे होईल.'ईश्वराने म्हटले, `ठीक आहे, तुला नको असलेले पंचवीस वर्षे मनुष्याला दे.'माणसाने बैलाकडची पंचवीस वर्षे आयुष्य आनंदाने स्वीकारले. थोड्या वेळाने कुत्रा आला, तोही तेच सांगू लागला.`देवा, पन्नास वर्षे आयुष्य खूप होईल. मला पंचवीस वर्षेच पुरे!'देवाने त्याच्या आयुष्यातील पंचवीस वर्षे कमी करून मनुष्याला दिली. पंच्याहत्तर वर्षांचे आयुष्य मिळूनही मनुष्य समाधानी नव्हता. त्याला पूर्ण १०० वर्षे आयुष्य हवे होते.तेवढ्यात घुबड आले. त्यानेही पंचवीस वर्षे आयुष्य मागून वरची पंचवीस वर्षे मनुष्याला दान केली. 

अशा रितीने मनुष्याचे आयुष्य १०० वर्षे पूर्ण झाले. मात्र, या शंभर वर्षात तो खऱ्या अर्थाने पहिली पंचवीस वर्षेच जगतो. वरची उसनी मिळालेली वर्षे ज्या प्राण्यांकडून दानात मिळाली, त्यांच्यासारखे जगतो. त्यानंतर पंचवीस वर्षे कुटुंबासाठी बैलासारखा  राबतो. निवृत्ती जवळ येऊ लागली, की वृद्धापकाळ डोकावतो. मनुष्य शांत होण्याऐवजी कुत्र्यासारखा समोरच्यावर भुंकून आपलेच म्हणणे खरे करू पाहतो. पंचाहत्तर वर्षे कशी बशी जातात, परंतु शेवटची पंचवीस वर्षे ना जागता येत ना झोप लागत, अशी घुबडासारखी अवस्था होते आणि अशा अवस्थेत मनुष्य केवळ मृत्यूची वाट पाहू लागतो. कारण त्यावेळी त्याला आयुष्य नाही, तर जगण्यातून सुटका हवी असते. त्याला उसने आयुष्य मागितल्याचा पश्चात्ताप होऊ लागतो आणि देवाने दिलेली पंचवीस वर्षेच आनंदाची होती, याचा आठव होऊ लागतो. 

ही रुपक कथा ऐकून झाल्यावर भाविक म्हणाले, महाराज, म्हणजे माणसाचे आयुष्य दु:खमयच आहे का? सुखी होण्याचा उपाय नाही का?'महाराज म्हणाले, `आहे ना! जोपर्यंत धडधाकट आहात, तोपर्यंत ईश्वराची ओळख करून घ्या. म्हणजे नाशिवंत शरीराचा आणि संसाराचा मोह होणार नाही. संसारातून हळू हळू मन काढा आणि ते ईश्वराशी जोडा. सतत सत्संग करा. ईश्वराच्या इच्छेत जगायला शिका. म्हणजे उरलेले दु:खदायक आयुष्य तुम्हाला सुखदायक होईल. वास्तविक जेवढी वर्षे तुम्ही ईश्वराशी जोडून राहता तेवढेच तुमचे खरे आयुष्य!'

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी