शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

करंगळीखालील दोनाहून अधिक रेषा दर्शवतात प्रेमसंबंध,दोन विवाह, विवाहबाह्य संबंध, घटस्फोट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 17:52 IST

अनेक जण ज्योतिषशास्त्राला नावे ठेवतात. परंतु त्याचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या तज्ञांकडून ज्योतिष जाणून घेतले, तर या शास्त्राच्या अचूक भाष्याची ...

अनेक जण ज्योतिषशास्त्राला नावे ठेवतात. परंतु त्याचा सूक्ष्म अभ्यास केलेल्या तज्ञांकडून ज्योतिष जाणून घेतले, तर या शास्त्राच्या अचूक भाष्याची आपल्याला अनुभूती येऊ शकेल. मात्र आजकाल वरवरचा अभ्यास करून स्वतःला ज्योतिष म्हणवणाऱ्या लोकांमुळे या शास्त्राचे गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. ज्योतिष शास्त्र हे ग्रह ताऱ्यांवर अवलंबून असल्याने आपोआपच ते अवकाश विज्ञानाशीसुद्धा जोडलेले आहे. त्यामुळे त्यात मांडलेले ठोकताळे बिनबुडाचे नसून प्रत्येक गोष्टीला शास्त्राधार आहे. फक्त त्याचा सखोल अभ्यास करणारा अभ्यासू हवा.

या शास्त्राच्या अनेक उपशाखा आहेत. हस्त ज्योतिष, समुद्र ज्योतिष, पंचांग ज्योतिष, अंकज्योतिष इ. या सर्वांचा वापर आपण आयुष्यात मार्गदर्शन करून घेण्यापुरता करू शकतो. ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दर्शकाचे काम करू शकते. परंतु त्यावर पूर्णपणे विसंबून राहणे आणि कर्तव्यशून्य होणे चुकीचे ठरेल. कारण मनुष्याच्या कर्तृत्वामध्ये ग्रहदशा पालटण्याचेही सामर्थ्य आहे. त्यामुळे भविष्य ऐकून खचून न जाता त्या अनुषंगाने निर्णय घेणे, हे जास्त उचित ठरू शकते. 

विवाह हा मनुष्याच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. तो यशस्वीपणे पार पडला तर अर्धे युद्ध जिंकल्यासारखे असते. परंतु अनेकांच्या आयुष्यात विवाह ठरण्यापासून टिकण्यापर्यंत अडचणींचा ससेमिरा काही केल्या थांबत नाही. अशा वेळी हस्त ज्योतिष त्या अडचणींमागचे सर्वसामान्य बुद्धीला चटकन कळू शकेल असे कारण सांगते. ते कारण म्हणजे - 

>>आपल्या हाताच्या करंगळीच्या खाली असलेली रेषा आपले वैवाहिक जीवन दर्शवते. ही रेषा तळहाताच्या बाहेरून आत येते. या ओळीच्या मध्यभागी स्पष्टता, लांबी, तुटकपणा यासारख्या गोष्टी विवाहाबद्दल भाकीत करतात. कधीकधी येथे एकापेक्षा जास्त रेषा असतात, परंतु सर्वात लांब आणि स्पष्ट असलेली रेष म्हणजे लग्नाची रेष मानली जाते.

>>लग्नाच्या रेषेच्या आसपासच्या रेषा प्रेम संबंधांबद्दल भाकीत करतात. जितक्या रेषा जास्त, तेवढी जास्त प्रेमप्रकरणं! थांबा! हे वाचून लगेच कोणाच्या व्यक्तिमत्त्वावर शंका घेऊ नका. अनेकदा प्रेम एकतर्फी, अप्रगट, अव्यक्त स्वरूपाचेही असू शकते. वयाच्या त्या त्या टप्प्यावर एकाकी आयुष्य जगणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत स्वाभाविकपणे तसे घडू शकते. हस्त शास्त्राचा सांगायचा मुद्दा एवढाच, की त्या छोट्या आणि अस्पष्ट रेषा तात्कालिक प्रेमसंबंध दर्शवतात. 

>>त्यातील ठळक रेषा जी हृदय रेषेच्या अगदी जवळ असेल तर व्यक्तीचे लवकरच लग्न होते. याउलट हृदय रेषेपासून ती रेषा दूर असल्यास विवाहाला विलंब दर्शवते. 

>>ज्या लोकांना करंगळीखाली दोन ठळक रेषा असतात, त्यांचे दोन विवाह होतात. पहिल्या विवाहात काडीमोड होऊन दुसरा विवाह होतो. सामंजस्याने घेतले तर विवाह टिकतो अन्यथा त्यातही अडचणी येऊ शकतात. 

>>लग्नाची रेषा सुरू होते त्यावर दुसरी रेषा दुभंगून जात असेल, तर विवाह मोडण्याची शक्यता असते. अशा लोकांनाही पुनर्विवाहाला सामोरे जावे लागते. 

>>लग्न रेषा सूर्य रेषेकडे झुकत असेल तर श्रीमंत घराचे स्थळ सांगून येते. 

>>जर लग्नाची रेषा सरळ जाण्याऐवजी खाली वाकली तर अशा लोकांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येतात.

या सर्व सूचनांबरोबरच आणखी एक नियम हस्तशास्त्र किंवा इतरही शास्त्र सांगते, ते म्हणजे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने विश्वासाने एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला असेल, तर कोणत्याही अडचणीतून वाट शोधता येते. 

टॅग्स :Astrologyफलज्योतिष