शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

मना सज्जना एक जीवी धरावे ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 20:06 IST

ज्याची फोड करता येत नाही असे जे एक अखंड तत्व आहे. ज्याच्यात सर्व परिमाणं, सर्व संदर्भ सामावलेले आहेत अशी जी एकात्मता आहे, भक्ती आहे, जिथे कुठलाही पक्ष विपक्ष नाही, अशी जी एकात्मता आहे, त्या 'एका' ला जीवी धरावयाचा आहे आणि त्याला जीवी धरणाराच खऱ्या अर्थाने आपले हित साधतो..!

- युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी ( बीड, महाराष्ट्र )

मना सज्जना एक जीवी धरावे ।जनी आपुले हित तुवा करावे ॥रघुनायकावीण बोलो नको हो ।सदामानसी तो निजध्यास राहो ॥

प्रत्येक माणूस आयुष्यभर आपले हित साधण्यासाठी अविरत प्रयत्नशील राहतो. जीवाचा आटापिटा करून तो आपल्या हितासाठी अनंत वस्तू मिळवित असतो. प्रत्येक माणूस आपल्या शक्तीनुसार, मिळालेल्या संधीनुसार, आपल्या संग्रही अनंत गोष्टी जमवतो. काही माणसांपाशी तर वस्तुसंग्रहाचा ढीग जमा होतो पण तरीही त्यांच्या ठिकाणी शांतता, स्वस्थता, समाधान ह्या गोष्टी आपल्याला पहावयास मिळत नाहीत.

याचा अर्थच असा की, अजून आपले हित साधलेले नाही. आपण जी समृद्धी मिळविलेली आहे, जे काही मिळविलेले आहे, ते परिपूर्ण नसून अपूर्ण आहे. ज्या प्रमाणात वस्तुसंग्रह वाढतो त्या प्रमाणात त्या वस्तूवरील मालकी वाढते, त्या प्रमाणात जीवनात अस्वस्थता येत राहते.

या मालकीबरोबर अनंत अडचणी, अनंत प्रश्न येत राहतात. बाहेरून पाहणारास जरी वाटत असेल की, याला काय कमी आहे..? पद, प्रतिष्ठा, पैसा, घरदार, बायकामुलं, सत्ता, अधिकार या सर्वार्थाने याने तर हित साधले आहे पण त्याच्या अंतरंगाचा वेध घेतला तर कमीपणाचा प्रत्यय आपल्याला येईल..!

भलेही मग तो कमीपणा पैशाचा, प्रकृतीचा, प्रेमाचा अथवा ज्ञानाचा कशाचाही असो..! हे प्रत्येकाच्या जीवनात आहे म्हणून खरे हित कसे साधायचे..? हे श्रीसमर्थ रामदास स्वामी आपल्या मनोबोधात सांगतात -

मना सज्जना एक जीवी धरावे ।

हे भल्या माणसा..! तुला आयुष्यात स्वस्थता, शांतता, सुख हवे असेल तर तूं जीवाभावाचे ठिकाणी 'एक' धर..! हा 'एक' काय.? हे समजावून घेणे महत्त्वाचे आहे. हेच तत्त्व समजावून देण्यासाठी तर अनेक शास्त्रं निर्माण झाली, ग्रंथ निर्माण झाले पण तरीही आपण समजू शकलो नाहीत.

जिझस ख्राईस्टला (येशूला) लहानपणी या 'एका' च्याच जिज्ञासेमुळे शाळेला मुकावे लागले. जिझसला (येशूला) शाळेत घातले. तो वर्गात बसला. शिक्षक शिकवू लागले.

१+१=२, २+१=३.

बे एक बे, बे दुणे चार वगैरे वगैरे आणि जिझस (येशू ख्रिस्त) एकदम उठून उभा राहिला. गुरुजी १+१=२ हे समजले पण सर्वप्रथम हा 'एक' कसा..? हे समजावून द्या..! एकचा धडा शिकवल्याशिवाय दोनचा कसा शिकवता..? एकचा धडा शिकवल्याखेरीज मी दोनचा पाढा म्हणणार नाही.

लाख, करोड समजून देता येतील पण 'एका' ची व्याख्या, 'एका' चे विश्लेषण अवघड आहे. ज्याची फोड करता येत नाही असे जे एक अखंड तत्व आहे. ज्यात सर्व परिमाणं, सर्व संदर्भ सामावलेले आहेत अशी जी एकात्मता आहे, भक्ती आहे, जिथे कुठलाही पक्ष विपक्ष नाही, अशी जी एकात्मता आहे, त्या 'एका' ला जीवी धरावयाचा आहे आणि त्याला जीवी धरणाराच खऱ्या अर्थाने आपले हित साधतो..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी 87 93 03 03 03 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक