शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

Meditation: मनाला आवाज असतो का? हो असतो! पण तो ऐकायचा कसा ते सांगताहेत संदीप महेश्वरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:00 IST

Meditation Tip: नवीन वर्षात इतरांचे बोलणे ऐकण्याआधी स्वत:च्या मनाचा आवाज कसा ऐकायचा ते शिकून घ्या!

आपल्या अवती भोवती एवढे आवाज असतात की बाजूला बसलेला माणूस काय बोलतो हे ऐकू येत नाही तर आतला आवाज कुठून ऐकू येणार? परंतु याच गदारोळामुळे आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो. प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधत राहतो. पण मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी सांगतो, तुम्हाला हवी असलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुमच्याच जवळ आहेत, पण ती ऐकण्यासाठी तुमचे कान सावध नाहीत. त्यासाठी सात दिवस दिलेला सराव करा, तुम्हाला तुमचा शोध लागेल. 

आपल्या सगळ्यांना वाईट सवय किंवा खोड असते, ती म्हणजे रिकामे वाटू लागले की वेळ काढण्यासाठी मोबाईल हातात घ्या नाहीतर टीव्ही बघणे. अशा वेळी आपण बाहेर जाणे, निसर्गात फिरणे, लोकांशी बोलणे या गोष्टी करायच्या सोडून आपल्याच चौकटीत राहणे पसंत करतो. त्यामुळे एकलकोंडेपणा जास्त वाढतो. त्याऐवजी जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा शांत बसायला शिका. आपल्या डोक्यात काय सुरू आहे ते तटस्थपणे बघायला शिका. काहीही न करता शांत बसण्याची सवय नसल्याने सुरुवातीला ते अवघड वाटेल, शांत बसण्याचा कंटाळाही येईल, मात्र ते करत राहा. सरावाने तो कंटाळा निघून जाईल. 

संदीप हे स्वानुभवाच्या आधारावर सांगताना म्हणतो, 'मी वर्षातून दोनदा तरी बाहेरगावी एकटा जातो व जाताना मोबाईल नेणे टाळतो. त्यामुळे मला माझ्या सान्निध्यात पूर्ण वेळ मिळतो. पूर्णवेळ स्वतःच्या सोबत राहणे कंटाळवाणे वाटले तरी तो अनुभव नावीन्य पूर्ण असतो. एका लिमिटनंतर तुमच्या डोक्यातले विषय संपून जातात आणि मनाच्या खोलवर रुतलेले विषय मान वर काढतात. त्यावर मनातल्या मनातही व्यक्त होणे टाळा. त्यामुळे तुमचे मन तुमच्याशी बोलू लागेल. तुम्हाला नेमके काय अपेक्षित आहे, तुमच्या मर्यादा किती व कोणत्या यांची जाणीव करून देईल. तुमची उत्तरे तुम्हाला अवश्य सापडतील. 

या सरावासाठी सलग तीन दिवस, दहा दिवस मोबाईल किंवा अन्य संपर्क साधनांपासून दूर राहिले पाहिजे. तसे केले, तरच तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख होईल. बाहेरचे आवाज शांत झाले की आतला आवाज ऐकू येईल आणि तो कधीच चुकीचा मार्ग दाखवणार नाही. यासाठी खूप अवघड गोष्ट म्हणजे एखाद्या मुद्द्याशी थांबणे, चिंतन करणे, स्वतःला वेळ देणे. म्हणतात ना, 'तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी'

ध्यानधारणा ही त्याची प्राथमिक पातळी आहे. रोज स्वतःसाठी दहा मिनिटे काढा. विचार मनात आले तरी येऊ द्या. शांत राहिल्याने तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होईल, जशी आपली संगणक व्यवस्था असते. तिच्यावर बटनं दाबून मारा केला तर ती आणखी कोलमंडते, याउलट वेळ दिला तर यंत्रणा शांत होते आणि आपोआप कार्यन्वित होते. 

तीच शांतता मेंदूलाही आवश्यक असते. त्याला शांत होऊ द्या, तुम्हाला तुमचा आतला आवाज नक्की सापडेल!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य