शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

आईला नको झालेला, परंतु जगाला हवाहवासा वाटणारा मार्तंड, त्याच्या स्मरणार्थ करतात मार्तंड सप्तमी व्रत!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 18, 2021 12:17 PM

ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे. 

पौष मासाची सुरुवातच मकर संक्रांतीच्या सणाने होते. सूर्याचे उत्तर दिशेने भ्रमण सुरू होते, म्हणून या संक्रमणाला उत्तरायण असे म्हणतात. या मासात संक्रांती व्यतिरिक्त अन्य उत्सव नसले, तरीदेखील सूर्यपूजेला विशेष महत्त्व दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे पौष शुक्ल सप्तमी (१९ जानेवारी) अर्थात मार्तंड सप्तमी या दिवशी `ऊँ मार्तंडाय नम:' असा नामोच्चार करून सूर्याला अर्घ्य द्यायचे असते. 

मार्तंड हे सूर्याचे एक नाव. तसेच या नावाशी निगडित एक पौराणिक कथा सांगितली जाते, की मार्तंड हा ऋग्वेदकालीन अदिती हिचा आठवा मुलगा. हा नको असताना  झाला, म्हणून गर्भावस्थेत तिने त्याचा त्याग केला. मात्र मृत गर्भातूनही त्याचा जन्म झाला. अदितीच्या सर्व मुलांप्रमाणे त्यालाही मार्तंड अशी ओळख मिळाली. त्याने आपल्या कर्तृत्वाने नाव गाजवले आणि लोकप्रियता मिळवली. मातेला नको असताना झालेला, पण त्याच्या गुणांमुळे जगाला हवाहवासा वाटणारा `मार्तंड' हा आदर्शच मानला पाहिजे.  ही कथा महाभारताच्या अनुशासन पर्वात वाचायला मिळते. मार्तंडाप्रमाणे आपणही जन्माला आल्यावर आपल्या गुणांनी जग जिंकून घ्यावे, हा मंत्र आपल्याला या कथेतून मिळतो, म्हणून मार्तंड सप्तमीच्या दिवशी त्याचे स्मरण करावे आणि त्याच्या नावे सूर्याला अर्घ्य द्यावे. 

याच व्रताला उभय सप्तमी असेही म्हणतात. उभय सप्तमी देखील सूर्यपूजेचे महत्त्व सांगते. यात फरक एवढाच की, केवळ पौष शुद्ध सप्तमीला सूर्यपूजा न करता याच महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या सप्तमीलादेखील सूर्यपूजा करणे अभिप्रेत असते.  या दोन्ही तिथींना हे व्रत केले जाते, म्हणून त्या उभय सप्तमी असे नाव दिले आहे.

हिवाळ्याच्या दिवसात संक्रांतीचा सण सर्वार्थाने ऊबदारच म्हणायला हवा. तीळाची स्निग्धता, गुळाचा गोडवा आणि पतंगाच्या निमित्ताने सूर्यस्नान, यामुळे थंडी कुठल्या कुठे पळून जाते. परंतु, ही व्यवस्था एकदिवसीय न राहता, सबंध महिनाभर सूर्याच्या कोवळ्या किरणांशी आपला संपर्क यावा, म्हणून पूर्वजांनी व्रतांच्या निमित्ताने रोज काही ना काही कारणाने सूर्यदर्शन योजले आहे. 

रोज सकाळी उठून सूर्याचे दर्शन घ्या, सूर्यनमस्कार घाला, असे सांगितले, तर लोक उठणार नाहीत. परंतु, कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये अनेक प्रकारचे रोग घालवण्याची क्षमता आहे, असे सांगितले, तर नक्की सूर्यदर्शन घेतील. उगवत्या सूर्याला अर्घ्य देणे, ही भारतीय संस्कृती आहे. अर्घ्य देण्याची क्रिया सूर्यासाठी असली, तरी त्याचे फायदे आपल्यालाच असतात, हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच रोज सूर्यनमस्कार घातल्यामुळे शरीर लवचिक आणि निरोगी राहते व दीर्घायुष्य लाभते. 

रोज न थकता हजर राहणारा, कोणातही भेदाभेद न करता सर्वांना समान प्रकाश देणारा, अंधाराला पराजित करून उजेडाचे साम्राज्य पसरवणारा, एकटाच असूनही तेजस्वीपणे तळपत राहणारा सूर्य हा केवळ ग्रह नाही, तर सकल सृष्टीचा पोशिंदा आणि आदर्श आहे. त्याच्या दर्शनाने आपल्या दिवसाची सुरुवात व्हावी, यासाठी सूर्याचे प्रात:दर्शन घेण्याचे पूर्वापार संकेत आहेत.

हेही वाचा : मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पौष शुक्ल षष्ठीला करतात, 'हे' सुगंधी व्रत!