शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
2
बांगलादेशात भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह
3
मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारताच पंतने दिलं उडवाउडवीचं उत्तर? टॉसवेळी नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
5
'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं केली षटकारांची 'बरसात'; युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा महारेकॉर्ड धोक्यात
6
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
7
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
8
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
9
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
10
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
11
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
12
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
13
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
14
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
16
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
17
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
18
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
19
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
20
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 2, 2021 18:47 IST

ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलमयी आहे. अशी ही मंगलमूर्ती!

ज्योत्स्ना गाडगीळ 

श्रीगजननासमोर देवदैत्यांनीही शरणागती पत्करली. त्याच्यासमोर विघ्नेदेखील चळाचळा कापू लागतात. ज्या मंगळ ग्रहाची आपल्याला भीती वाटते, त्यानेही बाप्पासमोर हात टेकले. एवढेच नव्हे, तर श्रीगणेशाने आपले नाव धारण करावे अशी प्रार्थना केली. अमंगलाचेही मंगल करणाऱ्या बाप्पाने त्याची विनंती मान्य केली आणि त्याचे नाव धारण केले. तेव्हापासून बाप्पा `मंगलमूर्ती' म्हणून ओळखला जाऊ लागला. 

असा हा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा सदैव आपल्यासाठी प्रेरणास्रोत म्हणून समोर असावा. म्हणून दासबोधात समर्थ रामदासांनी बाप्पाला विनवले,

ऐसा गणेश मंगळमूर्ति, तो म्या स्तविला यथामती।
वांछा धरून चित्ती, परमार्थाची!

ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलमयी आहे. अशी ही मंगलमूर्ती!

हेही वाचा : हिवाळ्यात आहार कसा असावा? तर,बाप्पासारखा!

चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती. त्याचे गुणवर्णन करताना समर्थांनी आरती लिहिली, त्यात बाप्पाचे सविस्तर वर्णन केले आहे. ती आरती सर्वांनाच पाठ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता असा बाप्पाचा लौकिक आहे. भक्तांना त्याचा अनुभवही येतो. 

आदर्श नेत्याला आवश्यक असलेले गुण, दुसऱ्यांचे अपराध पोटात घेण्याची क्षमता, दुष्ट दुर्जनांचे तुंडन करण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. तसेच नृत्य, नाट्य, संगीत यातही तो निपुण आहे. त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. नेतृत्त्वाचे गुण आहेत. तो श्रीगणेश केवळ मूर्तीत नाही, तर मानवी देहातही स्थित आहे. मानवी देहातील मूलाधार चक्राच्या ठायी गणेशाचा वास असतो. 

त्या गणरायाला साक्षी ठेवून आपणही आपल्या कार्यात त्याचे अनुकरण केले पाहिजे. शांत डोक्याने, मधूर हास्याने, आपल्या क्षेत्रात तरबेज होऊन आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात मोद अर्थात आनंद दिला पाहिजे. तिच खरी ईशसेवा. 

दासांनी हा बोध लक्षात घेऊन परमार्थाचा श्रीगणेशा करावा, असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सुचवतात.

हेही वाचा: 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!