शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दुसऱ्यांसाठी अमंगल ठरणारा मंगळ, बाप्पाच्या नावात विराजमान झाला!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 2, 2021 18:47 IST

ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलमयी आहे. अशी ही मंगलमूर्ती!

ज्योत्स्ना गाडगीळ 

श्रीगजननासमोर देवदैत्यांनीही शरणागती पत्करली. त्याच्यासमोर विघ्नेदेखील चळाचळा कापू लागतात. ज्या मंगळ ग्रहाची आपल्याला भीती वाटते, त्यानेही बाप्पासमोर हात टेकले. एवढेच नव्हे, तर श्रीगणेशाने आपले नाव धारण करावे अशी प्रार्थना केली. अमंगलाचेही मंगल करणाऱ्या बाप्पाने त्याची विनंती मान्य केली आणि त्याचे नाव धारण केले. तेव्हापासून बाप्पा `मंगलमूर्ती' म्हणून ओळखला जाऊ लागला. 

असा हा भक्तांची मनोकामना पूर्ण करणारा बाप्पा सदैव आपल्यासाठी प्रेरणास्रोत म्हणून समोर असावा. म्हणून दासबोधात समर्थ रामदासांनी बाप्पाला विनवले,

ऐसा गणेश मंगळमूर्ति, तो म्या स्तविला यथामती।वांछा धरून चित्ती, परमार्थाची!

ऊँकार हे गणेशाचे निर्गुण रूप आहे. परंतु, ऊँकार उभा लिहिला असता, तो हत्तीच्या सोंडेसारखा दिसतो. यावरून त्याला गजानन, गणेश, गणपती अशी ओळख मिळाली. निर्गुण रूपात तर तो सर्वत्र व्यापून आहेच, परंतु सगुण रूपातही त्याचे रूप साजिरे आहे. आनंद देणारे आहे. मंगलमयी आहे. अशी ही मंगलमूर्ती!

हेही वाचा : हिवाळ्यात आहार कसा असावा? तर,बाप्पासारखा!

चौदा विद्या चौसष्ट कलांचा तो अधिपती. त्याचे गुणवर्णन करताना समर्थांनी आरती लिहिली, त्यात बाप्पाचे सविस्तर वर्णन केले आहे. ती आरती सर्वांनाच पाठ आहे. सुखकर्ता दु:खहर्ता असा बाप्पाचा लौकिक आहे. भक्तांना त्याचा अनुभवही येतो. 

आदर्श नेत्याला आवश्यक असलेले गुण, दुसऱ्यांचे अपराध पोटात घेण्याची क्षमता, दुष्ट दुर्जनांचे तुंडन करण्याचे सामर्थ्य त्याच्यात आहे. तसेच नृत्य, नाट्य, संगीत यातही तो निपुण आहे. त्याच्याकडे दूरदृष्टी आहे. नेतृत्त्वाचे गुण आहेत. तो श्रीगणेश केवळ मूर्तीत नाही, तर मानवी देहातही स्थित आहे. मानवी देहातील मूलाधार चक्राच्या ठायी गणेशाचा वास असतो. 

त्या गणरायाला साक्षी ठेवून आपणही आपल्या कार्यात त्याचे अनुकरण केले पाहिजे. शांत डोक्याने, मधूर हास्याने, आपल्या क्षेत्रात तरबेज होऊन आपल्या आणि इतरांच्या आयुष्यात मोद अर्थात आनंद दिला पाहिजे. तिच खरी ईशसेवा. 

दासांनी हा बोध लक्षात घेऊन परमार्थाचा श्रीगणेशा करावा, असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सुचवतात.

हेही वाचा: 'संकटी पावावे, निर्वाणि रक्षावे' हीच प्रार्थना!