शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Margashirsha Guruvar 2023: महालक्ष्मीच्या पूजेत ठेवलेल्या नारळाला तडा जाणे 'शुभ' की 'अशुभ'? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:11 IST

Margashirsha Guruvar 2023: मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मीची पूजा केली जाते, अशा वेळी पूजेतील नारळाला तडा जात असेल तर त्यावर हे उत्तर!

>> हृषीकेश श्रीकांत वैद्य, वसई 

हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे. धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना, पूजा करताना श्रीफळ वापरले जाते. तोही बिनापाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र संकेत आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृदधी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो, तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात. त्याचे निवारण व्हावे त्यासाठीच हा लेखप्रपंच...

अनेकदा पुजत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी,  पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक  तडा जाते. अश्या वेळेस अनेकांचे मन खट्टू होते / मनात पाल चुकचकते की काही अशुभ संकेत तर नाही ना हा ? तर सज्जन हो निव्वळ हवेच्या आकुंचन व प्रसरण पावण्यामुळे नारळाला तडा जाते. 

सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा  प्रकार घडताना दिसतो. थंडीत/ भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आटले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात व त्यामुळे नारळाला तडा जाते. अनेकदा पूजा एसी खोलीत किंवा हॉल वर केल्या जातात, तेव्हा ही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जाते. 

थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओले करून गोणपाटात टाकून ठेवलेले दिसतील , ज्या दुकानात असेल केलेले नसते त्यांच्या दुकानातील नाराळांना ही भरपूर तडा जातात. तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराकडे याचे निरीक्षण करा किंवा त्यालाच विचारा. 

त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली, आता काहीतरी अघटीत घडणार, पूजा बरोबर झाली नाही, देव कोपला ई सारखे विचार मनात अजिबात आणू नका बिंधास रहा. पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही. 

मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा, जेणेकरून नारळाला तडा गेली तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३