शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

Margashirsha Guruvar 2023: महालक्ष्मीच्या पूजेत ठेवलेल्या नारळाला तडा जाणे 'शुभ' की 'अशुभ'? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 17:11 IST

Margashirsha Guruvar 2023: मार्गशीर्षातले चार गुरुवार महालक्ष्मीची पूजा केली जाते, अशा वेळी पूजेतील नारळाला तडा जात असेल तर त्यावर हे उत्तर!

>> हृषीकेश श्रीकांत वैद्य, वसई 

हिंदू धर्मात श्रीफळाला अतिशय मान आहे. धार्मिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ओटी भरताना, पूजा करताना श्रीफळ वापरले जाते. तोही बिनापाण्याचा नारळ नाही तर पाण्याने भरलेला नारळच वापरावा असे शास्त्र संकेत आहेत. श्री म्हणजे लक्ष्मी. म्हणजे ऐश्वर्य, समृदधी. नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागाचा काही ना काही उपयोग होतोच. हीच त्या झाडातली खरी श्री आहे. म्हणूनही ते उत्तम टिकाऊ, आरोग्यदायी, एकाच वेळी क्षुधा व तृष्णा भागवणारे फळ आहे म्हणून ते श्रेष्ठ फळ- श्रीफळ म्हणून ओळखले जाते. शेंडीखाली डोळे हे त्रिगुणांचे निदर्शक म्हणून काही वेळा त्याला देवत्त्वही बहाल केले जाते व त्याची पूजाही होते. मात्र जेव्हा पूजेत ठेवलेल्या श्रीफळाला नैसर्गिकरित्या तडा जातो, तेव्हा भाविकांच्या मनातही शंका कुशंका निर्माण होतात. त्याचे निवारण व्हावे त्यासाठीच हा लेखप्रपंच...

अनेकदा पुजत किंवा कलशावर ठेवलेल्या नारळाला पूजेच्या आधी,  पूजा करत असताना किंवा पूजा झाल्यावर अचानक  तडा जाते. अश्या वेळेस अनेकांचे मन खट्टू होते / मनात पाल चुकचकते की काही अशुभ संकेत तर नाही ना हा ? तर सज्जन हो निव्वळ हवेच्या आकुंचन व प्रसरण पावण्यामुळे नारळाला तडा जाते. 

सहसा थंडीच्या दिवसात किंवा भर उन्हाळ्यात किंवा यज्ञ सुरू असताना नारळाला तडा जाण्याचा  प्रकार घडताना दिसतो. थंडीत/ भर उन्हाळ्यात व यज्ञ सुरू असताना बाहेरील तापमानात अचानक बदल होतो आणि नारळाचे आटले तापमान वेगळे असते त्यामुळे आत आणि बाहेर वेगवेगळे दाब निर्माण होतात व त्यामुळे नारळाला तडा जाते. अनेकदा पूजा एसी खोलीत किंवा हॉल वर केल्या जातात, तेव्हा ही हवामानात अचानक बदल झाल्यामुळे नारळाला तडा जाते. 

थंडीच्या दिवसात किराणा दुकानात गेलात तर नारळ ओले करून गोणपाटात टाकून ठेवलेले दिसतील , ज्या दुकानात असेल केलेले नसते त्यांच्या दुकानातील नाराळांना ही भरपूर तडा जातात. तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराकडे याचे निरीक्षण करा किंवा त्यालाच विचारा. 

त्यामुळे कलशावर ठेवलेल्या नारळाला तडा गेला म्हणजे आता लक्ष्मी रुसली, आता काहीतरी अघटीत घडणार, पूजा बरोबर झाली नाही, देव कोपला ई सारखे विचार मनात अजिबात आणू नका बिंधास रहा. पूजेत ठेवताना नारळ ओला करून ठेवा म्हणजे सहसा तडा जाणार नाही. 

मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत नक्की पोहोचते हा विश्वास ठेवा, जेणेकरून नारळाला तडा गेली तरी तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही!

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३