शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Makar Sankranti 2025: काय असतो किंक्रांतीचा कुळाचार आणि महत्त्व? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:51 IST

Makar Sankranti 2025: संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी किंक्रांत असते आणि त्या दिवशीही कुळाचार असतो, पण या दिवसाचे महत्त्व काय तेही जाणून घेऊ.

'तिळगूळ घ्या गोड बोला' असे म्हणत एकमेकांना तिळगूळ देतात, तो दिवस- संक्रांत! आता तिळगुळाची जागा हलव्याने घेतली आहे. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, त्याला संक्रांती म्हणतात. यामुळे प्रत्येक वर्षात बारा संक्रांती येतात. यातील आषाढ अणि पौष महिन्यातील सूर्याची ही संक्रमणे जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण आषाढात तो कर्क राशीत संक्रमण करतो. ते दक्षिणायनात होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो, हे त्याचे संक्रमण जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण आषाढात तो कर्कराशीत संक्रमण करतो. ते दक्षिणायनात होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो. हे त्याचे संक्रमण उत्तरायणात होते. यातील हा दुसरा म्हणजे मकरसंक्रमणाचा दिवस पुण्यकारक मानलेला आहे. तीच ही तिळगूळ देण्याघेण्याची संक्रांत! तीळ आणि गूळ हे स्नेहाचे प्रतीक आहे, म्हणून ते यावेळी वाटण्यात येत असते.

पण तसे म्हटले तर संक्रांतीच्या सणाचा कुळाचार तीन दिवसांचा असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पहाटे स्त्रिया नाहतात. उंची वस्त्रे परिधान करतात. तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी यांचा नैवेद्य देवाला समर्पण करून मग सर्वजण तो भोजनाचा महाप्रसाद घेतात. असा नैवेद्य दाखवणे हा एक कुळधर्मही आहे. भोगीचा सण म्हणजे उपभोगीचा दिवस!

यानंतर दुसरा दिवस म्हणजे संक्रांत! जुन्या पंचांगाची संक्रांत सर्वसाधारणपणे १४ जानेवारीला आणि टिळक पंचांगाची संक्रांत १० जानेवरीला येत असते. उत्तरायणाचा आरंभ संक्रांतीपासून होत असतो.

सुवर्ण आणि माती या दोन प्रकारच्या भांड्यांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे आणि म्हणून मातीच्या बोळक्यावर हळदकुंकवाच्या रेघा काढून त्यात उसाचे करवे, गहू-हळकुंड, कापूस आणि दक्षिणा ठेवून त्याचे दान करतात, हाही कुळाचार आहे. या मातीच्या बोळक्याला सुघट म्हणतात. 

स्त्रिया या दिवशी हळदकुंकू करतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात, त्याला वाण लुटणे म्हणतात. या दिवशी देवाच्या नैवेद्याला गुळाच्या पोळ्या करून त्याचा भोजन प्रसाद घेतात. 

संकासुर आणि किंकरासुर नावाचे दोन दैत्य होते. ते ऋषिमुनिंना त्रस्त करू लागले. देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचाही वध केला. प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले, म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संक्रांतीचाच एक भाग आहे. 

संक्रांतीच्या सणाला तान्हा बाळाला तसेच पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना बोरन्हाण घालतात. चुरमुरे, चणे, साखरदाणे, गोळ्या, चिंचा, बोरे डोक्यावर टाकली जातात. तसेच नवीन जावई, नवीन सून यांचे कोडकौतुक करण्यासाठी त्यांना हलव्याचे दागिने घालणे हादेखील कुळाचार आहे. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीPuja Vidhiपूजा विधी