शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Makar Sankranti 2025: काय असतो किंक्रांतीचा कुळाचार आणि महत्त्व? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:51 IST

Makar Sankranti 2025: संक्रांतीच्या दुसर्‍या दिवशी किंक्रांत असते आणि त्या दिवशीही कुळाचार असतो, पण या दिवसाचे महत्त्व काय तेही जाणून घेऊ.

'तिळगूळ घ्या गोड बोला' असे म्हणत एकमेकांना तिळगूळ देतात, तो दिवस- संक्रांत! आता तिळगुळाची जागा हलव्याने घेतली आहे. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, त्याला संक्रांती म्हणतात. यामुळे प्रत्येक वर्षात बारा संक्रांती येतात. यातील आषाढ अणि पौष महिन्यातील सूर्याची ही संक्रमणे जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण आषाढात तो कर्क राशीत संक्रमण करतो. ते दक्षिणायनात होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो, हे त्याचे संक्रमण जास्त महत्त्वाची मानली जातात. कारण आषाढात तो कर्कराशीत संक्रमण करतो. ते दक्षिणायनात होते आणि पौष मासात तो मकर राशीत प्रवेश करतो. हे त्याचे संक्रमण उत्तरायणात होते. यातील हा दुसरा म्हणजे मकरसंक्रमणाचा दिवस पुण्यकारक मानलेला आहे. तीच ही तिळगूळ देण्याघेण्याची संक्रांत! तीळ आणि गूळ हे स्नेहाचे प्रतीक आहे, म्हणून ते यावेळी वाटण्यात येत असते.

पण तसे म्हटले तर संक्रांतीच्या सणाचा कुळाचार तीन दिवसांचा असतो. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. त्या दिवशी पहाटे स्त्रिया नाहतात. उंची वस्त्रे परिधान करतात. तीळ लावलेल्या बाजरीची भाकरी, मुगाच्या डाळीची खिचडी यांचा नैवेद्य देवाला समर्पण करून मग सर्वजण तो भोजनाचा महाप्रसाद घेतात. असा नैवेद्य दाखवणे हा एक कुळधर्मही आहे. भोगीचा सण म्हणजे उपभोगीचा दिवस!

यानंतर दुसरा दिवस म्हणजे संक्रांत! जुन्या पंचांगाची संक्रांत सर्वसाधारणपणे १४ जानेवारीला आणि टिळक पंचांगाची संक्रांत १० जानेवरीला येत असते. उत्तरायणाचा आरंभ संक्रांतीपासून होत असतो.

सुवर्ण आणि माती या दोन प्रकारच्या भांड्यांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण स्थान आहे आणि म्हणून मातीच्या बोळक्यावर हळदकुंकवाच्या रेघा काढून त्यात उसाचे करवे, गहू-हळकुंड, कापूस आणि दक्षिणा ठेवून त्याचे दान करतात, हाही कुळाचार आहे. या मातीच्या बोळक्याला सुघट म्हणतात. 

स्त्रिया या दिवशी हळदकुंकू करतात आणि एकमेकींना भेटवस्तू देतात, त्याला वाण लुटणे म्हणतात. या दिवशी देवाच्या नैवेद्याला गुळाच्या पोळ्या करून त्याचा भोजन प्रसाद घेतात. 

संकासुर आणि किंकरासुर नावाचे दोन दैत्य होते. ते ऋषिमुनिंना त्रस्त करू लागले. देवीने यावेळी संकासुराचा वध केला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचाही वध केला. प्राण सोडताना त्यांनी देवीकडे पाहून हात जोडले, म्हणून हे कुळाचार त्यांच्या नावाने म्हणजे संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत अशा नावाने प्रसिद्ध झाले. हाही संक्रांतीचाच एक भाग आहे. 

संक्रांतीच्या सणाला तान्हा बाळाला तसेच पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना बोरन्हाण घालतात. चुरमुरे, चणे, साखरदाणे, गोळ्या, चिंचा, बोरे डोक्यावर टाकली जातात. तसेच नवीन जावई, नवीन सून यांचे कोडकौतुक करण्यासाठी त्यांना हलव्याचे दागिने घालणे हादेखील कुळाचार आहे. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीPuja Vidhiपूजा विधी