शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला तिळगुळाचे दान केल्याने शनिदोष होतो दूर; वाचा त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:32 IST

Makar Sankranti 2025: सालाबादप्रमाणे यंदाही १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे, शनिदोष निवारणासाठी त्या दिवशी तिळगुळ दान का करतात ते जाणून घ्या. 

सनातन धर्मात मकर संक्रांत हा केवळ एक सण नसून तो शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. यंदाही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत (Makar Sankranti 2025) आहे. असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवसापासून सर्व शुभ आणि धार्मिक विधी सुरू होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यदेवाचे तेज अधिक वाढते असे म्हणतात. ते तेज आपल्यालाही मिळावे म्हणून मकर संक्रांतीपासून वर्षभर सूर्य पूजा केली जाते तसेच सूर्य नमस्कारदेखील घातले जातात. हा उत्तरायणाचा काळ शुभ मानला जातो. या काळात दान धर्म केल्याने अधिक पुण्य मिळते असे जुने जाणते सांगत असत. हिवाळ्याच्या मौसमात उबदार कपडे देऊन वस्त्रदान केले जाते किंवा तीळगूळ लाडू किंवा कच्चे अन्न दान केले जाते. 

मकर संक्रांतीच्या सणाला प्रत्येकाच्या घरी गुळापासून बनवलेले पदार्थ बनवले जातात. गुळपोळी, तीळगुळाचा लाडू, तिळवडी, तीळ शेंगदाणे चिक्की, गुळपापडी, गजक, गुडदाणी असे विविध प्रकार केले जातात, पण यासगळ्यात तीळ-गुळाचा समावेश केला जातो. हिवाळ्यात हे दोन घटक मुख्यत्त्वे वापरण्यामागे कोणते पौराणिक कारण आहे ते जाणून घेऊ 

मकर संक्रांतीला तिळगुळाचाच लाडू का? 

एकदा सूर्यदेव त्यांच्या मुलाच्या अर्थात शनिदेवाच्या घरी त्यांना भेटायला गेले, तो मुहूर्त होता मकर संस्क्रान्तीचा! शनिदेवाने आपल्या वडिलांचे मोठ्या आदराने स्वागत केले. त्यांनी सूर्यपूजा केली. नात्यात आणि शरीरात स्निग्धता निर्माण करणाऱ्या तीळ आणि गुळाचे दान केले. सूर्यदेवाला ती भेट आवडली. त्यांचे नाते आणखी दृढ झाले. आपल्या पुत्राच्या भक्तीवर सूर्यदेव प्रसन्न झाले. शनिदेवाला आशीर्वाद देताना ते म्हणाले की, जो कोणी तीळ आणि गुळाचे सेवन करून मकर संक्रांतीच्या पवित्र सणाच्या दिवशी माझी पूजा करील, त्याला माझे आशीर्वाद मिळतील! याला जोड देत शनिदेव म्हणाले, अशा भाविकाला माझेही आशीर्वाद लाभतील. कृपा राहील. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ खाण्याची परंपरा सूर्यदेवाच्या आशीर्वादाने सुरू झाली. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यत्त्वे तीळ गूळ लाडू बनवले जातात.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तीळ गुळाचे महत्त्व :

हिंदू धर्मात गुळ हा शुभ मानला जातो आणि अनेक धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यावरून गुळाचे महत्त्व लक्षात येते. ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतूचे दोष दूर करण्यासाठी गूळ विशेषतः उपयुक्त मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा केतूचा अशुभ प्रभाव असेल तर ती व्यक्ती गुळाचे दान करून या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करू शकते. विशेषत: रविवारी गुळाचे दान केल्यास लाभ होतो. गुळ हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. शनिदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी शनिदेवाच्या मंत्रांच्या जपासह गुळाचे दान करणे किंवा गुळाचे सेवन करणे शुभ सांगितले जाते. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीAstrologyफलज्योतिष