शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?
2
दीड ते दाेन लाखांनी घरे हाेणार स्वस्त? सिडकाे घरांच्या किमती कमी करण्यासाठी आज बैठक
3
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
4
वर्ल्डकपच्या संघातही नव्हती, ऐनवेळी संधी मिळाली अन्..., शेफाली वर्मा अशी ठरली मॅचविनर
5
स्वप्न साकार! भारतीय महिलांनी क्रिकेट वर्ल्डकप जिंकताच बॉलिवूड कलाकारांकडून अभिनंदनाचा वर्षाव
6
‘जेएनपीए-वैतरणा’वर मालगाडी गेली निर्धाेक; 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'अंतर्गत महत्त्वाचे पाऊल
7
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
8
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
9
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
10
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
11
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
12
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
13
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
14
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
15
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
16
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
17
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
18
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
19
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
20
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!

Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:13 IST

Mahabharat: बायकांना मौन पाळता येत नाही तसे गुपीतही पोटात ठेवता येत नाही, तसा त्यांना शाप मिळाला आहे, तोही थेट महाभारत काळात!

बायकांच्या पोटात काही राहत नाही, अशी शेरेबाजी नेहमी कानावर पडते. त्याला कारणही तसेच आहे. बायका शापित आहेत, त्यांना हा शाप कोणी दिला आणि कशामुळे दिला याची गोष्ट प्रेमानंद महाराजांनी सांगितली. 

August Astro Tips: ऑगस्टमध्ये ग्रहणयोग देऊ शकतो अशुभ परिणाम; राशीनुसार काय काळजी घ्यावी ते पहा!

ते म्हणतात, 'महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर सर्व मृत नातेवाईकांचे श्राद्धविधी करत होता, तेव्हा त्याची आई देवी कुंती हिने युधिष्ठिराला दानशूर कर्ण याचेही श्राद्ध करण्यास सांगितले. शास्त्रानुसार हे कर्म केवळ आप्तजनांचे केले जाते, मग आईने केलेली आज्ञा आणि त्यामागे कारण काय असे युधिष्ठिराने विचारले. त्यावर देवी कुंती म्हणाली, कर्ण अनाथ नसून तो तुमचा मोठा भाऊ आणि माझा मोठा मुलगा होता. 

हे ऐकताच युधिष्ठिराला धक्का बसला. आपण ज्याला शत्रू समजत होतो तो आपला मोठा भाऊ होता, हे कळल्यावर त्याला युद्धप्रसंग, मानहानीचे प्रसंग, वादाचे प्रसंग आठवले. युधिष्ठिर आपल्या आईला म्हणाला, 'आई हे गुपित तू लपवून ठेवण्याआधी जर वेळीच सांगितले असते, तर मी आमच्या मोठ्या भावाचे पाय धरून माफी मागितली असती आणि एवढे मोठे युद्ध टळले असते. जीवितहानी झाली नसती. नात्यांवरचा विश्वास उडाला नसता. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांना वैधव्य आले नसते, एवढी बालके अनाथ झाली नसती. हे केवळ तुझ्या मौनामुळे घडले आहे. त्यामुळे मी तुझ्या रूपाने समस्त स्त्री जातीला शाप देतो, की यापुढे कोणाही माता भगिनींच्या पोटी कोणतीही गोष्ट राहणार नाही. जरी राहिली तरी ती कोणा ना कोणाला सांगण्याची उबळ त्यांना येतच राहील आणि त्यांचे गुपित फार काळ गुपित राहणार नाही. 

यामुळेच की काय स्त्रिया फार काळ एखादे गुपित पोटात ठेवत नाहीत, कोणा न कोणाला सांगून मोकळे होतात. 

यामागील मानस शास्त्र पाहिले तर लक्षात येईल, की स्त्रीच्या मनाची रचना आधीच एवढी गुंतागुंतीची असते की त्यात एखादी गोष्ट लपवून ठेवण्याचे स्किल त्यांना पेलवत नाही आणि म्हणूनच त्या आपल्या मनातल्या गोष्टी जिवलग मैत्रिणीला सांगून मोकळ्या होतात. 

टॅग्स :MahabharatमहाभारतWomenमहिला