शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:13 IST

Mahabharat: बायकांना मौन पाळता येत नाही तसे गुपीतही पोटात ठेवता येत नाही, तसा त्यांना शाप मिळाला आहे, तोही थेट महाभारत काळात!

बायकांच्या पोटात काही राहत नाही, अशी शेरेबाजी नेहमी कानावर पडते. त्याला कारणही तसेच आहे. बायका शापित आहेत, त्यांना हा शाप कोणी दिला आणि कशामुळे दिला याची गोष्ट प्रेमानंद महाराजांनी सांगितली. 

August Astro Tips: ऑगस्टमध्ये ग्रहणयोग देऊ शकतो अशुभ परिणाम; राशीनुसार काय काळजी घ्यावी ते पहा!

ते म्हणतात, 'महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर सर्व मृत नातेवाईकांचे श्राद्धविधी करत होता, तेव्हा त्याची आई देवी कुंती हिने युधिष्ठिराला दानशूर कर्ण याचेही श्राद्ध करण्यास सांगितले. शास्त्रानुसार हे कर्म केवळ आप्तजनांचे केले जाते, मग आईने केलेली आज्ञा आणि त्यामागे कारण काय असे युधिष्ठिराने विचारले. त्यावर देवी कुंती म्हणाली, कर्ण अनाथ नसून तो तुमचा मोठा भाऊ आणि माझा मोठा मुलगा होता. 

हे ऐकताच युधिष्ठिराला धक्का बसला. आपण ज्याला शत्रू समजत होतो तो आपला मोठा भाऊ होता, हे कळल्यावर त्याला युद्धप्रसंग, मानहानीचे प्रसंग, वादाचे प्रसंग आठवले. युधिष्ठिर आपल्या आईला म्हणाला, 'आई हे गुपित तू लपवून ठेवण्याआधी जर वेळीच सांगितले असते, तर मी आमच्या मोठ्या भावाचे पाय धरून माफी मागितली असती आणि एवढे मोठे युद्ध टळले असते. जीवितहानी झाली नसती. नात्यांवरचा विश्वास उडाला नसता. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांना वैधव्य आले नसते, एवढी बालके अनाथ झाली नसती. हे केवळ तुझ्या मौनामुळे घडले आहे. त्यामुळे मी तुझ्या रूपाने समस्त स्त्री जातीला शाप देतो, की यापुढे कोणाही माता भगिनींच्या पोटी कोणतीही गोष्ट राहणार नाही. जरी राहिली तरी ती कोणा ना कोणाला सांगण्याची उबळ त्यांना येतच राहील आणि त्यांचे गुपित फार काळ गुपित राहणार नाही. 

यामुळेच की काय स्त्रिया फार काळ एखादे गुपित पोटात ठेवत नाहीत, कोणा न कोणाला सांगून मोकळे होतात. 

यामागील मानस शास्त्र पाहिले तर लक्षात येईल, की स्त्रीच्या मनाची रचना आधीच एवढी गुंतागुंतीची असते की त्यात एखादी गोष्ट लपवून ठेवण्याचे स्किल त्यांना पेलवत नाही आणि म्हणूनच त्या आपल्या मनातल्या गोष्टी जिवलग मैत्रिणीला सांगून मोकळ्या होतात. 

टॅग्स :MahabharatमहाभारतWomenमहिला