शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:13 IST

Mahabharat: बायकांना मौन पाळता येत नाही तसे गुपीतही पोटात ठेवता येत नाही, तसा त्यांना शाप मिळाला आहे, तोही थेट महाभारत काळात!

बायकांच्या पोटात काही राहत नाही, अशी शेरेबाजी नेहमी कानावर पडते. त्याला कारणही तसेच आहे. बायका शापित आहेत, त्यांना हा शाप कोणी दिला आणि कशामुळे दिला याची गोष्ट प्रेमानंद महाराजांनी सांगितली. 

August Astro Tips: ऑगस्टमध्ये ग्रहणयोग देऊ शकतो अशुभ परिणाम; राशीनुसार काय काळजी घ्यावी ते पहा!

ते म्हणतात, 'महाभारताच्या युद्धानंतर जेव्हा धर्मराज युधिष्ठिर सर्व मृत नातेवाईकांचे श्राद्धविधी करत होता, तेव्हा त्याची आई देवी कुंती हिने युधिष्ठिराला दानशूर कर्ण याचेही श्राद्ध करण्यास सांगितले. शास्त्रानुसार हे कर्म केवळ आप्तजनांचे केले जाते, मग आईने केलेली आज्ञा आणि त्यामागे कारण काय असे युधिष्ठिराने विचारले. त्यावर देवी कुंती म्हणाली, कर्ण अनाथ नसून तो तुमचा मोठा भाऊ आणि माझा मोठा मुलगा होता. 

हे ऐकताच युधिष्ठिराला धक्का बसला. आपण ज्याला शत्रू समजत होतो तो आपला मोठा भाऊ होता, हे कळल्यावर त्याला युद्धप्रसंग, मानहानीचे प्रसंग, वादाचे प्रसंग आठवले. युधिष्ठिर आपल्या आईला म्हणाला, 'आई हे गुपित तू लपवून ठेवण्याआधी जर वेळीच सांगितले असते, तर मी आमच्या मोठ्या भावाचे पाय धरून माफी मागितली असती आणि एवढे मोठे युद्ध टळले असते. जीवितहानी झाली नसती. नात्यांवरचा विश्वास उडाला नसता. एवढ्या मोठ्या प्रमाणात स्त्रियांना वैधव्य आले नसते, एवढी बालके अनाथ झाली नसती. हे केवळ तुझ्या मौनामुळे घडले आहे. त्यामुळे मी तुझ्या रूपाने समस्त स्त्री जातीला शाप देतो, की यापुढे कोणाही माता भगिनींच्या पोटी कोणतीही गोष्ट राहणार नाही. जरी राहिली तरी ती कोणा ना कोणाला सांगण्याची उबळ त्यांना येतच राहील आणि त्यांचे गुपित फार काळ गुपित राहणार नाही. 

यामुळेच की काय स्त्रिया फार काळ एखादे गुपित पोटात ठेवत नाहीत, कोणा न कोणाला सांगून मोकळे होतात. 

यामागील मानस शास्त्र पाहिले तर लक्षात येईल, की स्त्रीच्या मनाची रचना आधीच एवढी गुंतागुंतीची असते की त्यात एखादी गोष्ट लपवून ठेवण्याचे स्किल त्यांना पेलवत नाही आणि म्हणूनच त्या आपल्या मनातल्या गोष्टी जिवलग मैत्रिणीला सांगून मोकळ्या होतात. 

टॅग्स :MahabharatमहाभारतWomenमहिला