शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

Mahabharat : धनुर्धारी अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्यापुढे नतमस्तक होण्यामागे होते 'हे' एकमेव कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:15 IST

Mahabharat Story: महाभारतातील छोटे छोटे प्रसंगही खूप मोठा बोध देतात, जगदजेता अर्जुन आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याबद्दल सुधा मूर्ती काय सांगतात पहा!

लेखिका सुधा मूर्ती आपल्या एका व्याख्यानात सांगतात, रामायण महाभारतातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. छोटे छोटे प्रसंग, वाक्य, श्लोक, सुभाषिते जीवनाला मोठा बोध देतात. माझ्या आजोबांनी मला बालपणी महाभारतातला एक श्लोक सांगितला होता, तो मला कायमस्वरूपी लक्षात राहिला. त्या श्लोकाचे सार सांगते- 

एकाने अर्जुनाला विचारले की तुझ्याकडे एवढे शौर्य आहे, धनुर्विद्या आहे, राज्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, सुंदर पत्नी आहे, तरी तू त्या द्रोणाचार्य ऋषींना एवढा मान का देतोस? अर्जुनाने एका वाक्यात उत्तर दिले, हे सगळे त्यांच्यामुळेच मला मिळाले आहे म्हणून!

द्रोणाचार्यांकडे सत्ता-संपत्ती नाही, पण त्यांच्याकडे जे बहुमूल्य ज्ञान आहे, ते कोणीही चोरू शकत नाही, मिटवू शकत नाही की हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे असलेले ज्ञान ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या संपत्तीची तुलना प्रापंचिक सुखांशी होणारही नाही. त्या ज्ञानासमोर मी नतमस्तक होतो. कारण भौतिक सुख येईल-जाईल, मात्र ज्ञान हे नेहमीच वर्धिष्णू राहील. म्हणून आपण सर्वानीच गुरूंसमोर नतमस्तक झाले पाहिजे. 

अर्जुन द्रोणाचार्य हे गुरु शिष्याचे सुंदर नाते आजच्या पिढीसमोर ठेवायला हवे. आजचे विद्यार्थी शिक्षकांची मस्करी करतात, अपमान करतात, कमी लेखतात, त्यांनी अर्जुनाला आपला आदर्श मानून गुरूंना द्रोणाचार्य मानले पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षण घेऊन ज्ञानाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ज्ञान जितके वाटाल तेवढे वाढते. 

म्हणूनच आजच्या तंत्रज्ञान युगातही एक गोष्ट निक्षून सांगावीशी वाटते, की जग कितीही वेगाने पुढे जात असले, ५G चे युग आले, तरी गुरुG ना पर्याय नाही. गुरूंचा आदर करा आणि अर्जुनासारखे शिष्योत्तम होऊन भारताची प्रतिमा जगात उंच करण्यासाठी प्रयत्नशील व्हा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी