शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mahabharat : धनुर्धारी अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्यापुढे नतमस्तक होण्यामागे होते 'हे' एकमेव कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:15 IST

Mahabharat Story: महाभारतातील छोटे छोटे प्रसंगही खूप मोठा बोध देतात, जगदजेता अर्जुन आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याबद्दल सुधा मूर्ती काय सांगतात पहा!

लेखिका सुधा मूर्ती आपल्या एका व्याख्यानात सांगतात, रामायण महाभारतातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. छोटे छोटे प्रसंग, वाक्य, श्लोक, सुभाषिते जीवनाला मोठा बोध देतात. माझ्या आजोबांनी मला बालपणी महाभारतातला एक श्लोक सांगितला होता, तो मला कायमस्वरूपी लक्षात राहिला. त्या श्लोकाचे सार सांगते- 

एकाने अर्जुनाला विचारले की तुझ्याकडे एवढे शौर्य आहे, धनुर्विद्या आहे, राज्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, सुंदर पत्नी आहे, तरी तू त्या द्रोणाचार्य ऋषींना एवढा मान का देतोस? अर्जुनाने एका वाक्यात उत्तर दिले, हे सगळे त्यांच्यामुळेच मला मिळाले आहे म्हणून!

द्रोणाचार्यांकडे सत्ता-संपत्ती नाही, पण त्यांच्याकडे जे बहुमूल्य ज्ञान आहे, ते कोणीही चोरू शकत नाही, मिटवू शकत नाही की हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे असलेले ज्ञान ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या संपत्तीची तुलना प्रापंचिक सुखांशी होणारही नाही. त्या ज्ञानासमोर मी नतमस्तक होतो. कारण भौतिक सुख येईल-जाईल, मात्र ज्ञान हे नेहमीच वर्धिष्णू राहील. म्हणून आपण सर्वानीच गुरूंसमोर नतमस्तक झाले पाहिजे. 

अर्जुन द्रोणाचार्य हे गुरु शिष्याचे सुंदर नाते आजच्या पिढीसमोर ठेवायला हवे. आजचे विद्यार्थी शिक्षकांची मस्करी करतात, अपमान करतात, कमी लेखतात, त्यांनी अर्जुनाला आपला आदर्श मानून गुरूंना द्रोणाचार्य मानले पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षण घेऊन ज्ञानाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ज्ञान जितके वाटाल तेवढे वाढते. 

म्हणूनच आजच्या तंत्रज्ञान युगातही एक गोष्ट निक्षून सांगावीशी वाटते, की जग कितीही वेगाने पुढे जात असले, ५G चे युग आले, तरी गुरुG ना पर्याय नाही. गुरूंचा आदर करा आणि अर्जुनासारखे शिष्योत्तम होऊन भारताची प्रतिमा जगात उंच करण्यासाठी प्रयत्नशील व्हा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी