शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

Maha Shivratri 2023: ज्योतिर्लिंग म्हणजे काय? त्यांचा शोध सर्वप्रथम कोणी घेतला? ज्योतिर्लिंगाचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:51 IST

Maha Shivratri 2023: सद्यस्थितीत सहाव्या ज्योतिर्लिंगावरून वाद सुरू आहे, शिवपुराणात त्याबद्दल काय उल्लेख आहे ते पाहू. 

राजकारणामुळे समाजकारणही ढवळून निघते. इतकी वर्षे कधीही न निघालेला मुद्दा अलीकडे चर्चेत आला आहे, तो म्हणजे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्याचे नसून आसाम येथील गुवाहाटीचे ज्योतिर्लिंग आहे असे म्हटले जात आहे. हा गोंधळ झाला आहे तो सारख्या नावांमुळे. ही दोन्ही शिवमंदिरं प्राचीन काळातली आहेत. मात्र, बारा ज्योतिर्लिंगांचा शोध आद्य शंकराचार्य यांनी लावला आणि पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत, म्हणून हे राष्ट्र 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते अशी जोड आणखी संतांनी दिली.

त्या पाचांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतले पुण्याजवळचे भीमाशंकर! त्याचीच पुनर्बांधणी अहिल्या देवी होळकर यांनी केली. त्यामुळे जी मूळ ज्योतिर्लिंग आहेत तिथे आद्य शंकराचार्य आणि अहिल्यादेवींचे मंदिर हमखास असते. हीच ज्योतिर्लिंग ओळखण्याची खूण म्हणता येईल! तसे ते मंदिर महाराष्ट्रातल्या भीमाशंकर जवळ आहे, त्यामुळे ते ज्योतिर्लिंग स्वयंभू म्हणता येईल.

मग गुवाहाटीच्या भीमाशंकरचे काय?

तर शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार कामाख्या देवीजवळदेखील भीमाशंकराचे देवस्थान आहे आणि तेही प्राचीन आहे. मात्र ज्योतिर्लिंगांच्या गणनेत त्याचा उल्लेख करता येणार नाही. कारण ते देवस्थान आदी शंकराचार्यांच्या यादीत आढळत नाही. आदी शंकराचार्य हे शंकराचे अवतार मानले जात असल्याने त्यांनी नमूद केलेली १२ ज्योतिर्लिंगं गृहीत धरता येतील. असे असले तरी गुवाहाटीच्या प्राचीन भीमाशंकराचे पावित्र्य आणि महत्त्व कमी होत नाही.

आता जाणून घेऊ ज्योतिर्लिंग म्हणजे काय? -

ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्योती म्हणजे प्रेरणा. ज्योती म्हणजे चेतना. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! ती एकूण बारा आहेत. त्याचे वर्णन एका श्लोकात केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांची नावे लक्षात राहत नसतील, तर हा श्लोक पाठ करून टाका. या श्लोकाच्या उच्चाराने ज्योतिर्लिंगांचे स्मरण होईल आणि पुण्यही पदरात पडेल.

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ।परल्यां वैद्यानाथंच डाकिन्यां भीमशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने।वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबक गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये।

सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महांकालेश्वर, ओंकारमांधता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढ्या नाननाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होत असते.

ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे. अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ज्योतिर्लिंगे! एकराष्ट्रीयत्त्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवांना प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत. 

तूर्तास 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' या संत उक्तीनुसार महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर देवस्थानांवर वाद निर्माण करण्यापेक्षा चराचरात परमेश्वर पाहून  निरपेक्ष मनाने शिवभक्ती करणे इष्ट!

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीBhimashankarभीमाशंकर