शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

Maha Shivratri 2023: ज्योतिर्लिंग म्हणजे काय? त्यांचा शोध सर्वप्रथम कोणी घेतला? ज्योतिर्लिंगाचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 17:51 IST

Maha Shivratri 2023: सद्यस्थितीत सहाव्या ज्योतिर्लिंगावरून वाद सुरू आहे, शिवपुराणात त्याबद्दल काय उल्लेख आहे ते पाहू. 

राजकारणामुळे समाजकारणही ढवळून निघते. इतकी वर्षे कधीही न निघालेला मुद्दा अलीकडे चर्चेत आला आहे, तो म्हणजे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्याचे नसून आसाम येथील गुवाहाटीचे ज्योतिर्लिंग आहे असे म्हटले जात आहे. हा गोंधळ झाला आहे तो सारख्या नावांमुळे. ही दोन्ही शिवमंदिरं प्राचीन काळातली आहेत. मात्र, बारा ज्योतिर्लिंगांचा शोध आद्य शंकराचार्य यांनी लावला आणि पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत, म्हणून हे राष्ट्र 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते अशी जोड आणखी संतांनी दिली.

त्या पाचांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतले पुण्याजवळचे भीमाशंकर! त्याचीच पुनर्बांधणी अहिल्या देवी होळकर यांनी केली. त्यामुळे जी मूळ ज्योतिर्लिंग आहेत तिथे आद्य शंकराचार्य आणि अहिल्यादेवींचे मंदिर हमखास असते. हीच ज्योतिर्लिंग ओळखण्याची खूण म्हणता येईल! तसे ते मंदिर महाराष्ट्रातल्या भीमाशंकर जवळ आहे, त्यामुळे ते ज्योतिर्लिंग स्वयंभू म्हणता येईल.

मग गुवाहाटीच्या भीमाशंकरचे काय?

तर शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार कामाख्या देवीजवळदेखील भीमाशंकराचे देवस्थान आहे आणि तेही प्राचीन आहे. मात्र ज्योतिर्लिंगांच्या गणनेत त्याचा उल्लेख करता येणार नाही. कारण ते देवस्थान आदी शंकराचार्यांच्या यादीत आढळत नाही. आदी शंकराचार्य हे शंकराचे अवतार मानले जात असल्याने त्यांनी नमूद केलेली १२ ज्योतिर्लिंगं गृहीत धरता येतील. असे असले तरी गुवाहाटीच्या प्राचीन भीमाशंकराचे पावित्र्य आणि महत्त्व कमी होत नाही.

आता जाणून घेऊ ज्योतिर्लिंग म्हणजे काय? -

ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्योती म्हणजे प्रेरणा. ज्योती म्हणजे चेतना. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! ती एकूण बारा आहेत. त्याचे वर्णन एका श्लोकात केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांची नावे लक्षात राहत नसतील, तर हा श्लोक पाठ करून टाका. या श्लोकाच्या उच्चाराने ज्योतिर्लिंगांचे स्मरण होईल आणि पुण्यही पदरात पडेल.

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ।परल्यां वैद्यानाथंच डाकिन्यां भीमशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने।वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबक गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये।

सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महांकालेश्वर, ओंकारमांधता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढ्या नाननाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होत असते.

ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे. अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ज्योतिर्लिंगे! एकराष्ट्रीयत्त्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवांना प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत. 

तूर्तास 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' या संत उक्तीनुसार महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर देवस्थानांवर वाद निर्माण करण्यापेक्षा चराचरात परमेश्वर पाहून  निरपेक्ष मनाने शिवभक्ती करणे इष्ट!

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीBhimashankarभीमाशंकर