शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Magh Mass 2023: पौषामुळे स्थगित झालेल्या शुभकार्यांना माघ मासामुळे मिळणार चालना; जाणून घ्या माघ मासाची महती आणि माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 11:37 IST

Magh Mass 2023: वसंताचे आगमन, गणरायचा उत्सव आणि भोलेनाथाची महाशिवरात्र यांनी सजलेला माघ मास २२ जानेवारीपासून सुरू!

२१ जानेवारी रोजी पौष मास संपून २२ जानेवारी रोजी माघ मास सुरु होत आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला अथवा तिच्या आधी किंवा नंतर 'मघा' नक्षत्र येते, म्हणून या मासाला 'माघ' असे नाव प्राप्त झाले आहे. याचे प्राचीन नाव `तप' असे आहे.  या मासातील बहुतेक व्रतांमध्ये पौष मासाप्रमाणे तिळाचा अधिक उपयोग केल जातो. भगवान शिवशंकराची महाशिवरात्री आणि कश्यप अदितीचा पुत्र म्हणून गणपतीने `महोत्कट विनायक' म्हणून ज्या तिथीला अवतार घेतला, ती विनायकी ही गणेशजयंती अशा पिता पुत्राच्या अवतारांनी हा माघ महिना सर्व शिवभक्तांना तसेच गणेशभक्तांना अतिप्रिय आहे. 

याशिवाय माघातील शुद्ध सप्तमीला येणारी 'रथसप्तमी' ही सूर्योपासकाां 'पर्वणी' वाटते. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी येणारी भीमाष्टमी ही भिष्म पितामहांच्या श्राद्धकर्मासाठी आपल्या धर्मधुरिणांनी आग्रहपूर्वक तसेच आदरपूर्वक राखून ठेवल्याने भारतीय संस्कृतीचा एक वेगळा हृदयंगम असा पैलू अखिल जगाला दाखवून देते. 

कृष्णपक्षातील 'दासनवमी' ही समर्थभक्तांसाठी आणि समर्थ सांप्रदायिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. हा नेमक्याच परंतु अतिमहत्त्वाच्या तिथ्यांमुळे माघ महिना आपले वेगळे आणि महत्त्वाचे स्थान दाखवतो. या मासात विशेष कोणती व्रते नाहीत. तरीही त्याचे उत्साहाने स्वागत केले जाते. पौषामुळे साखरपुडा, मुंज, गृहप्रवेश इ. खोळंबलेल्या शुभ कार्यांना माघ मासामुळे पुनश्च चालना मिळते. 

माघ मासात वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतू हा समस्त ऋतूंचा राजा. वसंताचे आगमन ही सृष्टीसाठीदेखील एक सुंदर कलाटणी असते. शिशिराची पानगळती संपवून वसंताची चाहूल लागताच कोकीळ कूजन कानावर पडू लागते. झाडावर फुटलेली नवीन पालवी वसंतोत्सवाची वर्दी देते. निष्पर्ण झालेली झाडे इवल्याशा पानांनी साजिरी दिसू लागतात आणि पाहता पाहता निसर्गाचे रूप पालटू लागते. याच काळात रसिकजनांना साहित्य संगीताची मेजवानी मिळावी, म्हणून वसंत व्याख्यानमाला, वसंत संगीत महोत्सव इ. कार्यक्रमांची आखणी केली जाते. दूरदर्शनपूर्वीच्या काळात  असे कार्यक्रम लोकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करत असत. आजच्या मोबाईलयुगात या कार्यक्रमांचे स्वरूप पालटले असले, तरीही सातत्य कायम आह़े. 

माघ मासात दानाला अतिशय महत्त्व आहे. येनकेनप्रकारेण आपल्या हातून पुण्य घडावे, हा त्यामागील आशय आहे. आपल्या उत्पन्नाचा दहावा भाग समाजासाठी, देशासाठी खर्च व्हावा. कारण आपण जसे समाजाकडून घेत असतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो. व्रत वैकल्याच्या निमित्ताने ही छोटीशी परतफेड करावी, हा आपल्या संस्कृतीने आपल्यावर घातलेला संस्कार आहे.

याशिवाय माघ मासातील दिनविशेष आणि सण उत्सवांची महती आणि माहिती वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूच, तुर्तास एवढेच!