शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

भगवान विष्णूंनी मत्स्यावतार हा पहिला अवतार घेतला होता, तो आजचाच दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 12:04 IST

आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल. 

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, चैत्र शुक्ल पंचमी या तिथीला मत्यजयंतीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले आहे. तरीही पां.वा. काणे यांनी चैत्र शुक्ल पंचमीला मत्स्यजयंती करतात असे म्हटले आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मत्स्यावताराची पूजा केली जाते. त्यामुळे संकट निवारण होते अशी समजूत आहे. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. हैग्रीव नावाच्या असुराला मारण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता. 

याच तिथी  पंचमहाभूतांची पूजा तसेच शंख, चक्र, गदा, पद्म आणि पृथ्वी यांच्या आकृत्या काढून त्यांची पंमूर्तीव्रत म्हणून पूजा केली जाते. शिवाय विष्णुप्रतिमेला हिंदोळ्यावर ठेवून झोके देण्याचा विष्णु-दोलोत्सवही काही ठिकाणी साजरा केला जातो. एकूणच ही तिथी लक्ष्मी आणि अधिककरून विष्णूंशी संबंधित आहे. 

या सर्व व्रतांमागे कामनापूर्ती, वैभवप्राप्ती अशा फललाभांचे सूचन केलेले असले, तरीही ही फळे विष्णुभक्तीपुढे गौण आहेत. मनाला आनंद मिळावा, शांतता मिळावी यासाठी ज्याने त्याने आपापल्या इच्छाशक्तीनुरूप ही व्रते केली तर काहीच हरकत नाही. या व्रतांमुळे आनंदाचे चार क्षण गाठीशी बांधले जातील हे नक्की. 

या दिवशी माशांना पीठ घालावे किंवा खाद्य टाकावे. भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून नदी, समुद्र, जलाशय, झरा, धबधबा असे पाण्याचे आणि जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल.