शहरं
Join us  
Trending Stories
1
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा
2
“जनतेला फसवणाऱ्या महायुती सरकारविरोधात लढाई तीव्र करणार”; मुंबई बैठकीत काँग्रेसचा निर्धार
3
महेश मांजरेकरांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर; मुक्ता बर्वे, काजोलचाही होणार सन्मान
4
Waqf Law: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
5
"....म्हणून मी तिला देणार नाही घटस्फोट’’,  होणाऱ्या जावयासोबत पळाळेल्या महिलेच्या पतीनं सांगितलं कारण
6
कोकणची राणी होत Ratnagiri Jets मधून नव्या प्रवासाला निघाली स्मृती मानधना
7
मोठ्या पडद्यावर ब्लॉकबस्टर, ओटीटीवर सुपरफ्लॉप; 'छावा'ची नेटफ्लिक्सवर वाईट अवस्था
8
स्वारगेट प्रकरणात मोठी अपडेट..! आरोपी दत्ता गाडेविरोधात 893 पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
9
५० कोटींचा 'तो' श्वान निघाला भारतीय जातीचा; ईडीने धाड टाकल्यावर मालकाने सगळेच सांगितले
10
उदयनराजे, उद्धव ठाकरेंच्या मागणीला संभाजीराजेंचे समर्थन; म्हणाले, “किल्ल्यांचे जतनही व्हावे”
11
रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'या' ३ गोष्टी; सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्टचा मोलाचा सल्ला
12
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सच्या संघात 'मारिया शारापोवा'; MS Dhoni शी आहे खास कनेक्शन
13
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
14
"बलात्कार करायचा तर करा, पण, आमच्या पती, मुलांना सोडा…’’ मुर्शिदाबाद प्रकरणी कोर्टासमोर आली धक्कादायक माहिती   
15
Think Positive: स्वतःला आनंदी ठेवणे, हे आज मोठे आव्हान; जे AI ला सुद्धा जमणार नाही; पण... 
16
मुंबई पोलीस असल्याचे सांगून आमदाराला लुटण्याचा प्रयत्न; १२ तासांनी समोर आला खरा प्रकार
17
३६० अंकांनी घसरल्यानंतर सेन्सेक्सची १५०० अंकांची झेप; 'ही' आहेत तेजीची ५ कारणे
18
IPL 2025: ट्रेव्हिस हेडच्या जाहिरातीवरून तुफान राडा! RCB ने घेतली कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
19
रेणुका शहाणेंनी सासरी पाळल्या सर्व रुढी-परंपरा; म्हणाल्या, "राणाजींनी कधीच मला..."
20
Video: धोनीने जिंकली चाहत्यांची मनं..!! व्हिलचेअर बसलेल्या चाहतीजवळ स्वत: जाऊन काढला 'सेल्फी'

भगवान विष्णूंनी मत्स्यावतार हा पहिला अवतार घेतला होता, तो आजचाच दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 12:04 IST

आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल. 

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर लिखित धर्मबोध या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, चैत्र शुक्ल पंचमी या तिथीला मत्यजयंतीमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. देवाचा पहिला अवतार मत्स्याचा होता. तो वर्षप्रतिपदेच्या दिवशी झाला असे अनेक धर्मग्रंथात म्हटले आहे. तरीही पां.वा. काणे यांनी चैत्र शुक्ल पंचमीला मत्स्यजयंती करतात असे म्हटले आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मत्स्यावताराची पूजा केली जाते. त्यामुळे संकट निवारण होते अशी समजूत आहे. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारामध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. हैग्रीव नावाच्या असुराला मारण्यासाठी आणि वेदांचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता. 

याच तिथी  पंचमहाभूतांची पूजा तसेच शंख, चक्र, गदा, पद्म आणि पृथ्वी यांच्या आकृत्या काढून त्यांची पंमूर्तीव्रत म्हणून पूजा केली जाते. शिवाय विष्णुप्रतिमेला हिंदोळ्यावर ठेवून झोके देण्याचा विष्णु-दोलोत्सवही काही ठिकाणी साजरा केला जातो. एकूणच ही तिथी लक्ष्मी आणि अधिककरून विष्णूंशी संबंधित आहे. 

या सर्व व्रतांमागे कामनापूर्ती, वैभवप्राप्ती अशा फललाभांचे सूचन केलेले असले, तरीही ही फळे विष्णुभक्तीपुढे गौण आहेत. मनाला आनंद मिळावा, शांतता मिळावी यासाठी ज्याने त्याने आपापल्या इच्छाशक्तीनुरूप ही व्रते केली तर काहीच हरकत नाही. या व्रतांमुळे आनंदाचे चार क्षण गाठीशी बांधले जातील हे नक्की. 

या दिवशी माशांना पीठ घालावे किंवा खाद्य टाकावे. भगवान विष्णूंची पूजा करावी. तसेच आजच्या काळात मत्स्यपुजा करायची तर सागरी जलजीवन सुकर व्हावे, म्हणून नदी, समुद्र, जलाशय, झरा, धबधबा असे पाण्याचे आणि जलजीवांचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा. ही सेवा भगवान विष्णूंच्या चरणी नक्कीच रुजू होईल.