शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

Life Lesson: तुम्हाला त्रास देणाऱ्या, छळणाऱ्या, लोकांकडे किडा समजून दुर्लक्ष करा!- सद्गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2024 15:29 IST

Life Lesson: आपल्या सभोवती आणि काही ठिकाणी तर घरातच लोकांनी छळ मांडलेला असतो, अशा परिस्थितीचा सामना कसा करायचा हे सांगताहेत सद्गुरू. 

'जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' समर्थ रामदास स्वामींनी सूक्ष्म समाजनिरीक्षणातून हे अनमोल वचन मांडले आहे. या जगात पूर्णतः सुखी कोणीच नाही. प्रत्येक जण आपापलेच दुःख कुरवाळत बसला आहे. दुसऱ्यांच्या दुःखापेक्षा आपले दुःख कसे मोठे हे सांगण्याची चढाओढ सुरु आहे. अशातच मनःस्ताप देणाऱ्या व्यक्तींचा गराडा आपल्या भोवती असतोच, कधी कधी तर जिवाभावाची नातीदेखील उपद्रवी वाटू लागतात, छळ करतात. अशा लोकांना सोडून पळ तरी कुठवर काढायचा? ठिकाण बदलले तर माणसं बदलतील पण वृत्ती सगळीकडे सारखीच असते. अशा वेळी संकटातून पळ न काढता ठाम उभे राहून परिस्थितीशी सामना कसा करायचा हे सांगताहेत सद्गुरू जग्गी वासुदेव. 

शब्द हे अनेकांच्या हातातले असे धारदार शस्त्र असते की ज्याच्यावर हे वाकबाण सुटतात, ती व्यक्ती घायाळ झालीच पाहिजे. शब्दाच्या जखमा खोलवर होतात. वर्षानुवर्षे भरून निघत नाही. अशा वेळी या शब्दांचा सामना करणे आणि ते लावून न घेणे हे मोठे कसब असते. ते अंगी बाणायला हवे, असे सद्गुरू सांगतात. यासाठी ते रातकिड्याचे उदाहरण देतात. 

'जे लोक तुम्हाला टोचून बोलतात, टोमणे मारतात, अपमान करतात, निंदा करतात, त्यांचे बोलणे ऐकून तुम्ही स्वतःला त्रास करून घेता. पण संध्याकाळ झाली की घराच्या कोपऱ्यातून, बाहेरच्या अंगणातून, झाडाझुडुपातून रातकिड्याची किरकिर सुरु होते. त्याच्याकडे तुम्ही लक्ष देता का? त्याला शोधून गप्प बस सांगण्याचा प्रयत्न करता का? असे शेकडो किडे, पक्षी घराबाहेर आवाज करत असतात, त्यांच्या भाषेत बोलत असतात, त्या सगळ्यांचे बोलणे तुम्ही ऐकता का? समजून घेण्याचा प्रयत्न करता का? मनाला लावून घेता का? त्यांच्याशी हुज्जत घालता का? नाही ना! मग आपल्याला बोलणारी व्यक्ती सुद्धा त्याच रातकिड्यासारखी आहे असे समजून तिच्याकडे दुर्लक्ष करा. ती तिच्या भाषेत बोलत राहील, तुम्हाला डिवचत राहील. पण रातकिड्याकडे तुम्ही जसे दुर्लक्ष करता, तसे दुर्लक्ष त्या व्यक्तीकडे करायला शिकलात तर त्यांचे बोलणे तुम्हाला म्यूट केलेल्या चित्रासारखे वाटेल. जे दिसते पण ऐकू येत नाही. ही स्थिती कृतीत आणणे अवघड आहे पण अशक्य नाही. 

त्रास देणाऱ्या व्यक्तीकडे तुम्ही दुर्लक्ष करू लागलात की त्याचाही त्या व्यक्तीला त्रास होतो. तो आपोआप तुमचा मार्ग मोकळा करतोय. तोवर तग धरायला हवी, तरच परिवर्तन घडेल. लक्ष देऊन ऐकण्यासारख्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐका, त्या पहा, फक्त अशा विचित्र लोकांच्या मागे किंवा त्यांना सुधारण्यात स्वतःचा वेळ वाया घालवू नका. 

किडे जोवर फक्त आवाज करतात, तोवर तुम्ही दुर्लक्ष करता! मात्र तोच कीडा जेव्हा तुमच्या अंगावर येईल, तेव्हा त्याला गोंजारत न बसता त्याचे काय करायचे हे तुम्ही जाणता! त्याचप्रमाणे त्रास देणारे उपद्रवी घटक जोवर फक्त बोलून तुमचा तिरस्कार करत असतील तोवर तुम्ही दुर्लक्ष करू शकता, मात्र प्रकरण अंगाशी आले तर काय करायचे, हेही तुम्ही जाणता! मग त्रास किती करून घ्यायचा आणि किती दुर्लक्ष करायचे हे तुम्हीच ठरवा!

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य