शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Life Lesson: सुखाच्या शोधात फिरताय? ते तर तुमच्या जवळच आहे; कसे शोधायचे ते पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 07:05 IST

Life Lesson: आपण सगळेच जण सुखासाठी धडपडत असतो, एकदा का ते गवसले की देहाने आणि मनानेही स्थिर होतो, त्यासाठी हा राजमार्ग...

एक राजा रोज आपल्या राज्यातून फेरफटका मारायचा. त्याची नजर एका साधू बाबावर पडायची. तो साधू बाबा नेहमी आनंदी असायचा. नाच, गाणं, बासरी वाजवणं, देवाचं भजन म्हणणं, राहत्या जागेची स्वच्छता करणं, सगळ्या कामात तो रंगून जायचा. त्याच्या चेहऱ्यावर नैराश्य कधी बघितलंच नाही. म्हणून एक दिवस राजाने त्याच्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायचं ठरवलं आणि त्या साधू बाबांना आपल्या महालात येण्याची विनंती केली. 

साधू बाबा एका क्षणात हो म्हणाले. राजासाठी हे अनपेक्षित होतं. त्याला वाटलं, साधू बाबांना आग्रह करावा लागेल, ते नाही म्हणतील, तरी मी मनधरणी करेन, शेवटी ते हो म्हणतील, पण असं काही न होता हे लगेच हो म्हणाले, याचा अर्थ माझं यांच्यावर लक्ष आहे हे ते जाणून असावेत. 

राजाचं मन थोडंसं कलुषित झालं. पण आता आपणहून बोलावलं आहे तर न्यावं लागणारच! म्हणून राजाने आपल्या रथात त्यांना बसवलं आणि स्वतः पायी चालू लागला. साधू बाबा आपल्या आनंदात होते. रथात बसलोय म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर अधिक समाधान वगैरे दिसले नाही, पण ते नेहमीसारखे स्वतः मध्ये रंगले होते. 

राजाच्या दरबारात साधू बाबांचा पाहुणचार सुरु झाला. सुका मेवा, उंची वस्त्र, दास, दासी सगळ्या गोष्टींचा ते यथेच्छ उपभोग घेत होते. ते पाहून राजाचा राग वाढत होता. सहा महिने झाल्यावर राजा म्हणाला साधू महाराज तुमच्या आनंदाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. झोपडीत असो वा राज महालात तुम्ही एकसारखे आनंदी कसे राहता? तुमची सुखाची व्याख्या काय? मलाही सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं?

साधू बाबा म्हणाले, आता फार रात्र झाली, उद्या सकाळी सांगतो. त्या उत्सुकतेपोटी राजाला रात्रभर झोप लागेना. जेमतेम सकाळ झाली. राजा साधू बाबांच्या दालनात गेला. साधू बाबांनी उंची वस्त्र काढून आपली फाटकी वस्त्र परिधान केली आणि राजाला म्हणाला वाटेने जाता जाता तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. राजा नाईलाजाने त्याच्या बरोबर चालू लागला. बराच पुढे आल्यावर राजा दमला आणि म्हणाला, साधू बाबा, माझ्याने आणखी चालवत नाही, आता इथेच उत्तर द्या!

साधू बाबा म्हणाले, तुला हो म्हटलं त्या दिवशीच तुझ्या डोळ्यातली असूया मला जाणवली. साधू असून महालात राहायला हो म्हटल्यावर तुला माझ्याबद्दल असलेला आदर कमी झाला हे माझ्या लक्षात आलं. सुखाची व्याख्या विचार होतास ना? आज, आत्ता हा क्षण आनंदाने जगणं म्हणजे सुख आहे. पुढचा क्षण कसा असेल, असेल की नसेल हेही आपल्या हातात नसताना उगीच चिंता करण्यात आयुष्य वाया न घालवणं हे माझं तत्त्व आहे. तू तुझ्या संसारात, राज्यात अडकलेला आहेस, त्यामुळे तुला माझा चिरंतन आनंद कशात आहे, हे जाणून घ्यायला सहा महिने घालवावे लागले. इथून पुढे लक्षात ठेव, जर आता श्वास घेतलेला क्षण आनंदाने जगायला शिकलास तर आणि तरच सुखी राहशील आणि सदैव आनंदी राहशील हे लक्षात ठेव!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी