शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

Life lesson: क्रोधावर आवर घालून सुखाचा मार्ग कसा शोधावा? तर भगवान बुद्ध यांच्यासारखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 07:05 IST

Life Lesson : सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतो, पण सुख नेमके कसे आणि कुठे शोधायचे ते जाणून घ्या.

आजच्या जगात सर्व काही मिळेल, नाही मिळत ती फक्त मन:शांती. त्या शोधात मनुष्य धडपडत असतो. त्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. विषयात गुंतलेले मन विरक्त करावे लागते. या गोष्टी सहजसाध्य होत नाहीत. त्या केवळ संतांच्या सान्निध्यात शक्य होतात, म्हणून सत्संग केला जातो. असाच एक धनिक मन:शांतीच्या शोधात भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मसभेत पोहोचला. तिथे भगवान बुद्धांकडून त्याला कोणती शिकवण मिळाली, ते पाहू. 

एक धनिक अतिशय रागीट होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याचे लोकांशी वाद होत असत. वादातून मन:स्ताप होत असे आणि मन:स्तापामुळे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नसे. कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धनिकाने ता ऐकला. धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत. धनिकाने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची, असे ठरवले. त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला.

मात्र, मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत नसे. उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळामुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला. बुद्ध वारंवार समजावून सांगत असत, `लोभ, द्वेष, मोह हेच पापाचे मूळ आहे. त्यांचा त्याग करा.' मात्र धनिकाला नेमके तेच करणे जमत नव्हते. बुद्ध सांगत, 'संतापणाऱ्यावर जो संतापतो, त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो, तो मोठे युद्ध जिंकतो.'

त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकट गाठले आणि धीर करून सांगितले, `भगवान, गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे, परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही. असे का होत असेल?'

बुद्धांनी त्याच्याकडे स्मित करून पाहिले आणि म्हणाले, `हरकत नाही. आपण कुठे राहता?'

`इथून खूप दूर. फक्त प्रवचन ऐकण्यासाठी मी रोज एवढा प्रवास करून येत होतो.'

`अच्छा. तरी साधारण किती लांब आहे?' - बुद्धांनी विचारले.

`तासभर तरी लागतोच.'- धनिक उत्तरला.

`तिकडे कसे जाता', असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला.

`वाहनाने!'

त्या माणसान हिशोब करून वेळ सांगितला. त्यावर बुद्धांनी आणखी एक प्रश्न विचारला-

`इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवास स्थळी पोहोचू शकता का?'

धनिक म्हणाला, `हे कसे शक्य आहे? तिथे जायला पाहिले ना?' 

बुद्ध प्रेमाने म्हणाले, `तुमचे म्हणणे योग्य आहे. चालल्याशिवाय आपण इच्छिात स्थळी पोहोचू शकत नाही. चालल्यावरच पोहोचू शकतो...त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो. मिळवलेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, असे नुसते म्हणून भागणार नाही, तर ती आचरणातही आणावी लागेल.'

धनिक वरमला. बुद्धांच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग करून शांतिमार्गाला लागला. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी