शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Life lesson: क्रोधावर आवर घालून सुखाचा मार्ग कसा शोधावा? तर भगवान बुद्ध यांच्यासारखा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 07:05 IST

Life Lesson : सुखासाठी प्रत्येक जण धडपडत असतो, पण सुख नेमके कसे आणि कुठे शोधायचे ते जाणून घ्या.

आजच्या जगात सर्व काही मिळेल, नाही मिळत ती फक्त मन:शांती. त्या शोधात मनुष्य धडपडत असतो. त्यासाठी भौतिक सुखांचा त्याग करावा लागतो. विषयात गुंतलेले मन विरक्त करावे लागते. या गोष्टी सहजसाध्य होत नाहीत. त्या केवळ संतांच्या सान्निध्यात शक्य होतात, म्हणून सत्संग केला जातो. असाच एक धनिक मन:शांतीच्या शोधात भगवान गौतम बुद्ध यांच्या धर्मसभेत पोहोचला. तिथे भगवान बुद्धांकडून त्याला कोणती शिकवण मिळाली, ते पाहू. 

एक धनिक अतिशय रागीट होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून त्याचे लोकांशी वाद होत असत. वादातून मन:स्ताप होत असे आणि मन:स्तापामुळे कोणत्याही गोष्टीत लक्ष लागत नसे. कोणीतरी त्याला भगवान गौतम बुद्ध यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. धनिकाने ता ऐकला. धर्मसभेत रोज भगवान बुद्ध यांची प्रवचने होत असत. धनिकाने थेट जाऊन बोलण्याचे धाडस न करता रोजची हजेरी लावायची, असे ठरवले. त्याप्रमाणे तो रोज गौतम बुद्धांची प्रवचने ऐकायला जाऊ लागला.

मात्र, मनात असंख्य विचार सुरू असल्यामुळे त्याच्यावर प्रवचनाचा कोणताही प्रभाव पडत नसे. उलट डोक्यात सतत घुमणाऱ्या वैचारिक वादळामुळे तो आणखीनच उद्विग्न होऊ लागला. बुद्ध वारंवार समजावून सांगत असत, `लोभ, द्वेष, मोह हेच पापाचे मूळ आहे. त्यांचा त्याग करा.' मात्र धनिकाला नेमके तेच करणे जमत नव्हते. बुद्ध सांगत, 'संतापणाऱ्यावर जो संतापतो, त्याचे नुकसान होते आणि जो संतापाचे उत्तर शांततेत देतो, तो मोठे युद्ध जिंकतो.'

त्रासलेल्या धनिकाने एक दिवस बुद्धांना एकट गाठले आणि धीर करून सांगितले, `भगवान, गेले महिनाभर मी आपले प्रवचन ऐकत आहे, परंतु माझ्यावर त्याचा कणभरही परिणाम झाला नाही. असे का होत असेल?'

बुद्धांनी त्याच्याकडे स्मित करून पाहिले आणि म्हणाले, `हरकत नाही. आपण कुठे राहता?'

`इथून खूप दूर. फक्त प्रवचन ऐकण्यासाठी मी रोज एवढा प्रवास करून येत होतो.'

`अच्छा. तरी साधारण किती लांब आहे?' - बुद्धांनी विचारले.

`तासभर तरी लागतोच.'- धनिक उत्तरला.

`तिकडे कसे जाता', असे विचारत बुद्धांनी संवाद वाढवला.

`वाहनाने!'

त्या माणसान हिशोब करून वेळ सांगितला. त्यावर बुद्धांनी आणखी एक प्रश्न विचारला-

`इथे बसल्या बसल्या तुम्ही तुमच्या निवास स्थळी पोहोचू शकता का?'

धनिक म्हणाला, `हे कसे शक्य आहे? तिथे जायला पाहिले ना?' 

बुद्ध प्रेमाने म्हणाले, `तुमचे म्हणणे योग्य आहे. चालल्याशिवाय आपण इच्छिात स्थळी पोहोचू शकत नाही. चालल्यावरच पोहोचू शकतो...त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी जीवनात प्रत्यक्ष अंमलात आणल्या तरच त्याचा परिणाम दिसून येतो. मिळवलेल्या ज्ञानाचे रूपांतर कर्मात होत नसेल, तर ते ज्ञान व्यर्थ आहे. म्हणून आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, असे नुसते म्हणून भागणार नाही, तर ती आचरणातही आणावी लागेल.'

धनिक वरमला. बुद्धांच्या पायाशी आपल्या क्रोधाचा त्याग करून शांतिमार्गाला लागला. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी