शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:24 IST

Life lesson : सद्यस्थितीत शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे, त्याला कारण आहे अशांत मन; ते शांत ठेवण्याचा मार्ग जाणून घ्या. 

मन शांत नाही अशी अनेकांची तक्रार असते. सद्यस्थितीत तर लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांसाठीच ही अडचण झाली आहे. मनावर शेकडो विषयांचा मारा होत असताना, मन शांत होणार तरी कसं? मनाला शांत करण्यासाठी लागणारा सराव आपण करतच नाही. मोबाईल हातात आल्यापासून ही अस्वस्थता जास्त वाढली आहे. सतत हलती चित्र, स्क्रोलिंगची सवय, एका विषयाशी न थांबता सतत काहीतरी ऐकण्याचा, पाहण्याचा अट्टहास आपल्या मनाला शांत राहूच देत नाही. 

मग हे आपल्याला जमणारच नाही का? निश्चितच जमेल. कोणतीही गोष्ट सरावाने साध्य करता येते. जर तुम्हाला क्रिकेट खेळण्याची रुची असेल, पण खेळणं प्रभावी नसेल तर रोज त्याच विषयाला दहा तास दिले, तर वर्षभरात तुम्ही विराट कोहली व्हाल असे नाही पण उत्तम क्रिकेटपटू होऊ शकाल हे नक्की. कोणतेही यश एका रात्रीत मिळत नाही. त्यासाठी सातत्य ठेवावे लागते. मन शांत करण्यासाठी, एकाग्र करण्यासाठी सुद्धा सराव गरजेचा असतो. तो कसा आणि कधी करायचा ते पाहू. 

म्हणून सकाळी उठल्यावर काही काळ अंथरुणावर बसून मन एकाग्र करण्याचा सराव करावा. तेव्हा आजू बाजूला आवाज नसतात.  सुरुवातीला हा सराव ब्रह्ममुहूर्तावर करावा. निसर्गाला आलेली जाग, पहाटेची निरव शांतता आणि मनात शेकडो विचार असले तर डोळ्यासमोर शांतपणे उलगडत जाणारा काळोख. यामुळे मनातले विचार कीतीही त्रासदायक वाटले तरी त्याचवेळेस बाहेरील वातावरणाचा मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि रोजच्या सरावाने मन शांत होण्यास मदत होते. 

एकदा का मन एकाग्र करण्याचे तंत्र आत्मसात झाले की दिवसभरात जेव्हा जेव्हा तुम्हाला अस्वस्थ वाटेल, मन अशांत आहे असं जाणवेल, तेव्हा तेव्हा तुम्ही क्षणार्धात ध्यानधारणा करून या स्थितीतून बाहेर पडू शकता. एवढंच काय तर या मनशक्तीच्या जोरावर जे हवे ते साध्य करू शकता. फक्त त्यासाठी सराव करा. 'प्रयत्ने कण रगडीता वाळूतून तेलही गळे' या म्हणीला अनुसरून सराव सुरु करा. जर एकट्याने हा सराव करणे शक्य नसेल तर या विषयातील जाणकारांची मदत घ्या. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडून घेतलेली मदत आयुष्यभरासाठी उपयोगी पडू शकेल हे नक्की! 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य