शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:11 IST

Life Lesson: हातून घडलेल्या चुकांवर कोणी पांघरूण घालतात, कोणी सारवासारव करतात, कोणी दुरुस्त करतात तर कोणी त्याचे ओझे वाहतात!

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस! अशी एक व्याख्या आपल्याकडे सांगितली जाते. हा साधा विचार आपल्याला कळूनही, पटूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेत आयुष्य वाया घालवतो. मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी, हा जर तुमचा प्रश्न असेल, तर शेवट्पर्यंत वाचा. 

मुळात चूक घडली की केली, हे कळणे महत्त्वाचे आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. चुकत चुकत आपण शिकत जातो. हातून चुका होणारच नाहीत, अशी व्यक्ती या जगात नाहीच. त्यामुळे चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे. परंतु वारंवार एकच चूक घडत असेल, तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो. तर मूळ मुद्दा हा आहे, की चुका अजाणतेपणी घडल्या आहेत की जाणून बुजून केल्या आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. 

उदा. रस्त्यावरून वाहन चालवताना सगळे नियम पाळूनही चुकून अपघात घडतात, ही नकळत किंवा परिस्थिती मुळे झालेली चूक आहे, तर नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला तुडवत जाणे ही जाणून बुजून केलेली चूकच नाही, तर अक्षम्य अपराध आहे. या दोहोंतला फरक लक्षात घेतला, तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. 

काही गोष्टी स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्तिनुरूप घडून जातात. त्याक्षणी योग्य वाटलेला निर्णय आयुष्यभरासाठी अपराधी भाव निर्माण करणारा ठरू शकतो. अशा वेळी, सर्वात आधी घडून गेलेली गोष्ट का घडली, ती टाळता आली असती का, भविष्यात त्याचे काय पडसाद उमटणार आहेत, चूक मान्य केल्याने अपराधी भावातून मुक्तता होणार आहे का, या गोष्टींचा सर्वांगीण विचार करा. घडून गेलेल्या घडनेत कोणीच बदल घडवू शकत नाही, परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. त्या चुकीची जाणीव होऊन तीच चूक हातून पुन्हा घडत नाही. पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध पवित्रा घेतो. शक्य तेवढ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो. 

यासाठी चूक झाली, हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा व मोठेपणा हवा. झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागरुकपणा हवा. या गोष्टींचा नीट विचार केला असता, अपराधीपणाचे ओझे आयुष्यभर मनावर वाहावे लागणार नाही. चुका होणे ही सामान्य बाब आहे, परंतू आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल, तर ती चूक नाही अपराध आहे. या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणे ही पहिली पायरी आहे आणि अशा चुका हातून घडू न देणे ही अंतिम पायरी आहे. 

आयुष्य छोटं आहे. ते कुढत जगू नका. आनंदात जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदात जगू द्या. आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःला नाही. स्वतःशी कायम प्रामाणिक राहा आणि आपल्या मनाचा कौल घेत राहा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी