शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 13:11 IST

Life Lesson: हातून घडलेल्या चुकांवर कोणी पांघरूण घालतात, कोणी सारवासारव करतात, कोणी दुरुस्त करतात तर कोणी त्याचे ओझे वाहतात!

चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो हुशार माणूस आणि घडलेल्या चुका पुन्हा घडूच देत नाही तो देव माणूस! अशी एक व्याख्या आपल्याकडे सांगितली जाते. हा साधा विचार आपल्याला कळूनही, पटूनही आपण बऱ्याचदा घडलेल्या चुकांच्या अपराधी भावनेत आयुष्य वाया घालवतो. मग या अपराधी भावनेतून स्वतःची सुटका कशी करावी, हा जर तुमचा प्रश्न असेल, तर शेवट्पर्यंत वाचा. 

मुळात चूक घडली की केली, हे कळणे महत्त्वाचे आहे. चुका प्रत्येकाकडून होतात. चुकत चुकत आपण शिकत जातो. हातून चुका होणारच नाहीत, अशी व्यक्ती या जगात नाहीच. त्यामुळे चुका घडत असतील तर ते प्रगतीचे लक्षण आहे. परंतु वारंवार एकच चूक घडत असेल, तर तो आपल्या आकलन क्षमतेचा दोष ठरू शकतो. तर मूळ मुद्दा हा आहे, की चुका अजाणतेपणी घडल्या आहेत की जाणून बुजून केल्या आहेत. हे लक्षात घेतले पाहिजे. 

उदा. रस्त्यावरून वाहन चालवताना सगळे नियम पाळूनही चुकून अपघात घडतात, ही नकळत किंवा परिस्थिती मुळे झालेली चूक आहे, तर नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने गाडी चालवत वाटेत येईल त्याला तुडवत जाणे ही जाणून बुजून केलेली चूकच नाही, तर अक्षम्य अपराध आहे. या दोहोंतला फरक लक्षात घेतला, तर आपल्या हातून घडलेल्या चुकांचे वर्गीकरण आपल्याला करता येईल. 

काही गोष्टी स्थळ, काळ, परिस्थिती, व्यक्तिनुरूप घडून जातात. त्याक्षणी योग्य वाटलेला निर्णय आयुष्यभरासाठी अपराधी भाव निर्माण करणारा ठरू शकतो. अशा वेळी, सर्वात आधी घडून गेलेली गोष्ट का घडली, ती टाळता आली असती का, भविष्यात त्याचे काय पडसाद उमटणार आहेत, चूक मान्य केल्याने अपराधी भावातून मुक्तता होणार आहे का, या गोष्टींचा सर्वांगीण विचार करा. घडून गेलेल्या घडनेत कोणीच बदल घडवू शकत नाही, परंतु चूक मान्य केल्याने मनावरचा भार हलका होतो. त्या चुकीची जाणीव होऊन तीच चूक हातून पुन्हा घडत नाही. पुढच्या वेळेस निर्णय घेताना आपण सावध पवित्रा घेतो. शक्य तेवढ्या चुका टाळण्याचा प्रयत्न करतो. 

यासाठी चूक झाली, हे मान्य करण्यासाठी मनाचा प्रामाणिकपणा व मोठेपणा हवा. झालेली चूक पुन्हा घडू नये यासाठी मनाचा जागरुकपणा हवा. या गोष्टींचा नीट विचार केला असता, अपराधीपणाचे ओझे आयुष्यभर मनावर वाहावे लागणार नाही. चुका होणे ही सामान्य बाब आहे, परंतू आपल्या चुकीची शिक्षा दुसऱ्याला भोगावी लागत असेल, तर ती चूक नाही अपराध आहे. या अपराधी भावनेतून मुक्त होण्यासाठी निदान क्षमा मागणे ही पहिली पायरी आहे आणि अशा चुका हातून घडू न देणे ही अंतिम पायरी आहे. 

आयुष्य छोटं आहे. ते कुढत जगू नका. आनंदात जगा आणि दुसऱ्यांनाही आनंदात जगू द्या. आपण जगाला फसवू शकतो, पण स्वतःला नाही. स्वतःशी कायम प्रामाणिक राहा आणि आपल्या मनाचा कौल घेत राहा. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी