शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

स्वामींनी सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवून दिवसाची प्रसन्न सुरुवात करूया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 08:00 IST

सुंदर विचारांचे अलंकार ल्यायलेली व्यक्ती सुंदर दिसते व सुंदर वागते.

स्वामीनी आपल्याला वैचारिक चार रत्न दिली आहेत.विचारांचे अलंकार घालणे केव्हाही चांगलेच. ते चोरीला गेले, तरी ज्याने चोरले त्याचेही भले आणि ज्याचे चोरले गेले त्याचेही भले. या अमूल्य रत्नांचा ठेवा स्वतःकडे बाळगूया. 

पहिले रत्न आहे...माफी

तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलूद्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करु नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका.उलट त्यांना माफ करा.

दुसरे रत्न....विसरून जाणे

आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा,लोभ ठेवू नका. कारण अपेक्षाभंगाचे दुःख वाईट असते. 

तिसरे रत्न.....विश्वास

नेहमी आपल्या मेहनतीवर आणि स्वामींच्या वचनावर अतूट विश्वास ठेवा. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' असे म्हणत स्वामी सदैव आपल्या सोबत असतात. हेच खरे सफलतेचे सूत्र आहे...

चौथे रत्न.....वैराग्य

नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो, तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही, तर क्षणभंगुर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात अडकू नका.