शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनाला विजयी करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गरुडध्वज रथाचीच निवड का केली, ते जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 17:08 IST

भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य शक्तींनी प्रभावित झालेल्या रथाने अर्जुनाला संरक्षण कवच दिले असे म्हणता येईल!

भगवान श्रीकृष्ण ६४ कलांमध्ये निपुण होते आणि सोबत त्यांचा शिष्य सर्वोत्तम धनुर्धर अर्जुन होता. तो द्वंद्वयुद्धातही निपुण होता. याशिवायकृष्णाकडे अनेक शस्त्रास्त्रे होती. त्यांची नारायणी सेना महाभारत काळातील सर्वात बलशाली सेना होती. श्रीकृष्णानेच कलरीपट्टू नावाच्या लढाईच्या कलेचा शोध लावला, ज्याला आता मार्शल आर्ट म्हणतात.श्रीकृष्णाच्या धनुष्याचे नाव 'सारंग' होते. त्यांच्या खड्गाचे नाव 'नंदक', गदेचे नाव 'कौमुदकी' आणि शंखाचे नाव 'पांचजन्य' होते, जो गुलाबी रंगाचा होता. महाभारतात श्रीकृष्णाचे दोन रथ होते. चला त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया.

१. श्री कृष्णाचे २ अतिशय दिव्य रथ होते. पहिल्याचे नाव गरुडध्वज आणि दुसऱ्याचे नाव जैत्र.

२. गरुडध्वजाच्या सारथीचे नाव दारुका होते आणि त्याच्या घोड्यांची नावे शैव्य, सुग्रीव, मेघपुष्प होती.

३. श्रीकृष्णाचा जैत्र नावाचा सेवकही होता आणि एक रथही होता. या रथांचा उल्लेख श्रीमद भागवत महापुराणात आढळतो.

४. गरुडध्वज रथ हा अतिशय वेगवान रथ होता. या रथावर स्वार होऊन रुक्मिणीचे अपहरण करण्यात आले. वादळाच्या वेगाप्रमाणे हा रथ मंदिराजवळ क्षणभर थांबला आणि श्रीकृष्णाने लगेचच राजकुमारी रुक्मिणीला रथावर बसवले आणि रथाचे घोडे पूर्ण वेगाने धावले, असे म्हणतात.

५ श्रीकृष्णाने हा रथ स्वर्गातून आणला असे म्हणतात. बिहारच्या राजगीरमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जी महाभारत काळाशी संबंधित आहेत. यापैकी एक श्रीकृष्णाच्या रथाच्या खुणा आहेत. हाच रथ श्रीकृष्णाने महाभारताच्या युद्धात वापरला होता. या रथाच्या शिरावर खुद्द हनुमंत बसले होते म्हणून शत्रू सैन्यातून येणाऱ्या दुष्ट शक्तींपासून अर्जुनाचा बचाव होऊ शकला. 

टॅग्स :Mahabharatमहाभारत