शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

केशव मासानिमित्त जाणून घेऊया पुरीच्या जगन्नाथ मंदिराचा महिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 07:20 IST

सध्याचे जगन्नाथचे मंदिर १२ व्या शतकात बांधले असावे. लाकडाच्या ओबडधोबड मूर्तींना हातपाय नाहीत. फक्त डोळे, नाक व तोंड हे अवयव आहेत. याबाबतीत एक परंपरागत कथा आहे ती अशी.

मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण, या महिन्यावर भगवान विष्णू यांचे अधिपत्य असते. त्यामुळे जिथे जिथे विष्णूंचे, कृष्णाचे मंदिर असते, तिथे तिथे भाविकांची दर्शनासाठी रीघ लागते. पुरीचे जगन्नाथ मंदिरही त्यापैकी एक. ओरिसा राज्यातील समुद्रतीरी बांधण्यात आलेल्या मंदिरातील श्रीकृष्णाच्या काष्ठमूर्तीला जगन्नाथ नावाने संबोधण्यात येते. या मंदिरात जगन्नाथाच्या मूर्तीबरोबर सुभद्रा आणि बलराम यांच्याही मूर्ती आहेत. आषाढ शुद्ध द्वितीया या दिवशी रथामध्ये या मूर्ती ठेवून रथयात्रा काढली जाते. या उत्सवात लाखो भाविक रथ ओढतात.

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (पूर्वार्ध)

सध्याचे जगन्नाथचे मंदिर १२ व्या शतकात बांधले असावे. लाकडाच्या ओबडधोबड मूर्तींना हातपाय नाहीत. फक्त डोळे, नाक व तोंड हे अवयव आहेत. याबाबतीत एक परंपरागत कथा आहे ती अशी-

प्राचीन काळी पुरी नगरीमध्ये इंद्रद्युम्न राजा राज्य करीत होता. त्याने आपल्या नगरात देवमंदिर बांधले, पण त्या स्थापन करण्यासाठी इंद्रनील मण्याची सुंदर मूर्ती हवी होती. मोठ्या कष्टाने त्याने त्या मूर्तीचा शोध लावला. एक शबदर नित्य तिथे जाऊन तिची पूजा करत होता. राजाने एक सैन्यतुकडी मूर्ती आणण्यास पाठवली. पण मूर्ती तिथून अदृश्य झाली.  त्याच रात्री स्वप्नात येऊन नीलमाधवाने राजाला म्हटले, `हे राजा, तू अहंकाराने माझा भक्त शबदर याच्याकडून मला छिनावून आणणार होतास म्हणून मी अदृष्य झालो. आता मी तुझ्या राज्यात चंदनी ओंडक्याच्या रूपाने प्रगट होईन. त्या ओंडक्यावर पद्म आणि चक्र ही चिन्हे दिसली की, तीच माझी मूर्ती आहे असे समज. 

तसा ओंडका सापडला. पण त्याच्यावर सुताराची हत्यारे चालेनात. अनंत नावाच्या एका म्हाताऱ्या मूर्तीकाराने राजाला सांगितले, देवळाच्या गाभाऱ्यात मला एकवीस दिवस एकटा कोंडून ठेव आणि देवळाचे सर्व दरवाजे बंद कर. या मुदतीत मी या ओंडक्याची मूर्ती घडवीन. एकवीस दिवसांनी तू गाभाऱ्याचा दरवाजा उघड. राजाने मान्य केले. तरीपणे संशयशिच्चाने ग्रस्त होऊण आणि राणीच्या आग्रहामुळे मुदतीच्या आधीच दार त्याने उघडले. तर त्याला हातपाय नसलेला डोळे वटारलेला मुखवटा दिसला. मूर्तीकार मात्र अदृश्य झाला. तेव्हापासून अशाच रुपाच्या मूर्तीची रथयात्रा काढली जाते.

आषाढ शुद्ध द्वितीयेपासून आठ दिवस हा उत्सव चालतो. सर्व भारतातून लाखो भाविक जगन्नाथाचा रथ आपल्या हातांनी ओढण्यासाठी येतात. कृष्ण, बलराम आणि सुभद्रा या तिन्ही मुर्तींसाठी तीन मोठे रथ दरवर्षी बनवतात. मंदिराच्या सिंहद्वारापासून रथयात्रा निघते आणि जनकापुरापर्यंत जाते. येथे जगन्नाथाला भेटण्यासाठी लक्ष्मी येते अशी भाविकांची समजूत आहे. अधिक मासात, मार्गशीर्ष मासात देखील भाविक मोठ्या संख्येने जगन्नाथाच्या दर्शनाला जातात. 

हेही वाचा : हिताचिया गोष्टी सांगू एकमेका, शोक, मोह, दु:खा निरसू तेणे -चांगल्या गोष्टींचे 'शेअरिंग' महत्त्वाचे! (उत्तरार्ध)