शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

वाद राहू द्या; शंकराचार्यांची निवड कोणातर्फे होते व त्यांचे अधिकार कोणकोणते, ते आधी जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 17:19 IST

Ayodya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरावरील वक्तव्यामुळे शंकराचार्यांबद्दल विविध चर्चा सुरू आहेत, पण त्यांचे बोलणे त्यांना बहाल केलेल्या अधिकारात येते का? ते पाहू. 

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या स्थापनेचा एवढा मोठा धार्मिक विधी पार पडत असताना शंकराचार्यांच्या नावे जनमानसात शिमगा सुरू आहे. मुहूर्त, पुजा विधी, यजमान पद, आमंत्रण अशा अनेक विषयांवरुन शंकरचार्य अधून मधून आपले मत नोंदवत आहेत.मात्र, पूर्ण देशभरात रामलल्लाच्या स्वागताची तयारी होत असताना शंकराचार्यांची कार्यक्रमाला अनुपस्थिती वादाला कारणीभूत ठरू शकते. तरीदेखील मुख्य  सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार हे आगामी काळच सांगेल. 

देशभरात राम मंदिराच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. मंदिर ट्रस्टकडून देशातील ज्येष्ठ मान्यवर आणि संतांना अभिषेकासाठी निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. त्यात चार पिठाच्या शंकराचार्यांनाही आमंत्रण आहे. मात्र २२ जानेवारी रोजी पूर्व नियोजित कामांमुळे त्यांना उपस्थित राहता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. एवढेच काय, दोन ठिकाणच्या शंकराचार्यांनी आशीर्वचने देखील पाठवली आहेत. परंतु,  त्यावर उलट सुलट चर्चा होऊन त्यांचा या कार्याला विरोध असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे अकारण टीकेचा सुर लागला आहे. त्यानिमित्ताने आपणही शंकराचार्य आणि त्यांचे कार्य, वास्तव्य आणि अधिकार याबद्दल जाणून घेऊ. 

शंकराचार्य म्हणजे कोण?

धार्मिक मान्यतेनुसार आदि शंकराचार्यांनी मठांची सुरुवात केली.ते एक हिंदू तत्वज्ञानी आणि धार्मिक व्यक्तिमत्त्व होते,त्यांना जगद्गुरू म्हणूनही ओळखले जाते. त्यांना सनातन धर्माचे संरक्षण आणि प्रसार करायचा होता. कर्ममार्गी कर्मठ गृहस्थ केवळ कर्मकांड करून स्वर्गप्राप्ती याच निष्ठेत जगत होते , अशा लोकांना हे समजावून देणे कि धर्माचा उद्देश केवळ अर्थ आणि कामापुरता नसून मोक्ष हे त्याचे मूळ उद्दिष्ट आहे. समाजाचा उद्धार करण्यासाठी आचार्यांना धर्माची पताका हातात घ्यावी लागली. शैव ,शाक्त , इत्यादि मतमतांतरे हि पूर्ण ज्ञानाच्या अभावामुळे परस्पर वैमनस्य उत्पन्न करीत होती , त्यांच्यात एकवाक्यता आणण्यासाठी आचार्यांनी समाजाला पंचायतन पूजेची संकल्पना दिली. अशी अनेक कारणे आहेत. या कार्याचा विस्तार वाढवण्यासाठी त्यांनी देशाच्या चारही दिशांना स्थापन केलेल्या मठांची जबाबदारी आपल्या चार मुख्य शिष्यांवर दिली. या मठांच्या प्रमुखाला शंकराचार्य म्हणतात.शंकराचार्यांना सनातन धर्मात सर्वोच्च मानले जाते.

शंकराचार्य पीठ म्हणजे काय?

सनातन धर्मानुसार, मठात गुरु आपल्या शिष्यांना सनातन धर्माचे शिक्षण आणि ज्ञान देतात. तिथे आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. यासोबतच मठांमध्ये जीवनातील काही महत्त्वाच्या बाबी, समाजसेवा,साहित्य इत्यादींचे ज्ञानही मिळते. द्वारका, ज्योतिष, गोवर्धन आणि शृंगेरी पीठ हे देशातील चार प्रमुख मठ आहेत.संस्कृतमध्ये मठांना पीठ म्हणतात. म्हणून तेथील जबाबदारी सांभाळणार्‍या शंकराचार्यांना पिठाधीपती म्हणतात. 

शंकराचार्य कसे निवडले जातात?

त्यागी, दंडी संन्यासी, संस्कृत, चतुर्वेद, वेदांत ब्राह्मण, ब्रह्मचारी आणि पुराणांचे ज्ञान असणे ही शंकराचार्य पदासाठी योग्यता असावी लागते.शंकराचार्य होण्यासाठी चारही वेद आणि सहा वेदांगांचे ज्ञान असणारे ब्राह्मण असणे अनिवार्य आहे. ज्यांना शंकराचार्य बनवले जाते त्यांना आखाड्यांचे प्रमुख,आचार्य महामंडलेश्वर,नामवंत संतांची सभा आणि काशी विद्वत परिषदेच्या मान्यतेची शिक्कामोर्तब आवश्यक असते.यानंतरच शंकराचार्य ही पदवी मिळते.

देशाचे प्रमुख शंकराचार्य कोण आणि कोणत्या मठात आहेत?

गोवर्धन मठ : ओडिशाच्या पुरी राज्यात गोवर्धन मठाची स्थापना केली आहे. गोवर्धन मठातील भिक्षूंच्या नावावरून ‘अरण्य’ संप्रदाय हे नाव लावले जाते.निश्चलानंद सरस्वती हे या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठात 'ऋग्वेद' ठेवण्यात आला आहे. गोवर्धन मठाचे पहिले मठाधिपती पद्मपद आचार्य हे आदि शंकराचार्यांचे पहिले शिष्य होते.

शारदा मठ: शारदा मठ द्वारकाधाम,गुजरात येथे स्थित आहे.सदानंद सरस्वती हे शारदा मठाचे शंकराचार्य आहेत.या मठातील भिक्षूंच्या नावावरून तीर्थ किंवा आश्रम हे नाव पडले आहे. या मठात 'सामवेद'ठेवण्यात आला आहे. शारदा मठाचे पहिले मठाधिपती हस्तमालक (पृथ्वीधर) होते.

ज्योतिर्मठ : ज्योतिर्मठ उत्तराखंडच्या बद्रिकाश्रमात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद हे या मठाचे शंकराचार्य आहेत. या मठात अथर्ववेद ठेवलेला आहे. या मठाचे पहिले मठाधिपती त्रोटकाचार्य होते.

शृंगेरी मठ : शृंगेरी मठाची स्थापना दक्षिण भारतातील रामेश्वरम येथे आहे. या मठातील भिक्षूंच्या नावांमागे सरस्वती किंवा भारती वापरली जाते. जगद्गुरू भारतीतीर्थ हे या मठाचे शंकराचार्य आहेत.या मठात 'यजुर्वेद' ठेवण्यात आला आहे. या मठाचे पहिले मठाधिपती आचार्य सुरेशवराचार्य होते.

चारही पिठाचे शंकरचार्य गोरक्षण ते अखंड भ्रमण करून जनसंपर्क वाढवत धर्माचे कार्य करत असतात. त्यांच्या संकेत स्थळावर त्यांच्या कामाचा तपशीलदेखील बघायला मिळतो. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजीचा सुर लावण्याची आवश्यकता नाही. त्यांचे आशीर्वाद पाठीशी असून हा सोहळा उत्तम रित्या पार पडणार असे पदाधिकार्‍यांचे सांगणे आहे. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर