शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माणसांची पारख कशी करावी ते या चार बाहुल्यांकडून शिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 08:00 IST

माणसांची पारख करताना आणि स्वत: माणूस म्हणून घडताना या बाहुल्यांची गोष्ट कायम लक्षात ठेवा.

एका उद्योगपतीने आपल्या मुलाला एकदा चार बाहुल्या दिल्या. ते पाहून मुलगा म्हणाला, 'बाबा, बाहुल्या तर मुलींना भेट दिल्या जातात, तुम्ही मला बाहुल्या का दिल्या आहेत?'बाबा म्हणाले, `बेटा, कारण या साध्यासुध्या बाहुल्या नाहीत, तर यशस्वी आयुष्याचा मंत्र शिकवणाऱ्या या बाहुल्या आहेत. यांच्या कानाला छिद्र आहे. त्यातून हा दोरा आरपार घालून बघ. मग तुला मी यांचा मंत्र सांगतो.'

मुलाने कुतुहलाने एक एक करून बाहुलीच्या कानातून दोरा आरपार करायला सुरूवात केली. पहिल्या बाहुलीच्या एका कानातून दोरा घातला असता तो दुसऱ्या कानातून बाहेर आला. दुसऱ्या बाहुलीच्या एका कानात घातलेला दोरा तोंडातून बाहेर आला. तिसऱ्या बाहुलीच्या एका कानातून घातलेला दोरा तिच्या पोटात गेला. 

ते पाहून बाबांनी मुलाला थांबवत म्हटले, `बेटा या केवळ बाहुल्या नाहीत, तर ही माणसांची वृत्ती आहे. ती ओळखायला मी तुला शिकवतोय. पहिल्या वृत्तीची माणसं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. दुसऱ्या वृत्तीची एका कानाने ऐकतात आणि तोंडाने दुसरीकडे सांगून मोकळे होतात. तिसऱ्या वृत्तीची माणसं कानाने ऐकून पोटात दडवून ठेवतात.'मुलगा भुवया उंचावत म्हणाला, `मग बाबा, या तिघींपैकी कोणाची वृत्ती चांगली? कोणावर विश्वास ठेवावा?' 

तेव्हा बाबांनी त्याला चौथी बाहुली दिली आणि तीनदा दोरा तिच्या कानातून आरपार घालायला सांगितला. त्यावेळेस दोरा एकदा कानातून, दुसऱ्यांदा ओठातून, तिसऱ्यांदा पोटातून बाहेर निघाला. ते पाहून बाबा म्हणाले, चौथ्या बाहुलीसारख्या वृत्तीचे लोक विश्वसनीय असतात. जे आवश्यक तिथे बोलतात, आवश्यक ते पोटात ठेवतात आणि आवश्यक तिथेच बोलतात. असे लोक जोडायला शिक आणि तू सुद्धा असाच बनलास, तरच विश्वसनीय ठरशील आणि भविष्यात मोठा उद्योगपती बनशील.

उद्योजकाने दिलेली शिकवण आपणही लक्षात घेण्यासारखी आहे. तेव्हा माणसांची पारख करताना आणि स्वत: माणूस म्हणून घडताना या बाहुल्यांची गोष्ट कायम लक्षात ठेवा.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी