शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

आपल्या चुकांवर लोकांनी हसण्याआधी स्वतःच हसायला शिका; सांगताहेत संदीप महेश्वरी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 16:38 IST

आपण आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो, तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का? खरंच विचार करायला हवा!

तुम्हाला फेंगुशुईचा लाफिंग बुढ्ढा माहितीये का? तोच जो, या कानापासून त्या कानापर्यंत हसताना दिसतो. ती केवळ मूर्ती नाही, तर असेच दिलखुलासपणे जगणारे लोक आपल्या सभोवताली आहेत. त्यांना पाहता आपल्याला त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे की काय, असा प्रश्न पडतो. परंतु, समोरच्याच्या मनात हा संभ्रम निर्माण होण्याची स्थिती तयार करणे, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. सुख, दु:ख, उद्विग्न, चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात. परंतु, कोणी त्याचा फार विचार करतात, तर कोणी दुर्लक्ष! म्हणून लाफिंग बुढ्ढा हा आपला आदर्श हवा. आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही.

एका साधूंच्या आश्रमात एक युवक संन्यस्त जीवनाची दीक्षा घेण्यासाठी आला. साधूंच्या सभेत त्याने आपल्या गतकाळातील चुकांची कबुली दिली. साधू आपल्याला चुकांचे प्रायश्चित्त सुचवतील असे त्याला वाटले. परंतु झाले उलटेच. सगळे साधू त्याच्या चुका ऐकून हसू लागले. युवक खजिल झाला. त्यानंतर बराच काळ लोटला. परंतु, सगळे आपल्याला हसले, ही खंत मनातून जात नव्हती. एकदा धीर करून त्याऐकून ने आपल्या गुरुंना विचारले. `त्यादिवशी माझ्या चुकांची कबुली ऐकून सगळे मला का हसले?'

त्यावर गुरुजी उत्तरले, `बाळा, हीच सन्यस्त जीवनाची पहिली दिक्षा आहे. दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्याआधी आपल्या चुकांवर हसायला शिका, म्हणजे आपल्या चुकांवर कोणी हसले, याचा राग येणार नाही. संन्याशाला राग, लोभ शोभत नाही. सामान्य मनुष्यालाही या गोष्टींचा त्याग करायचा असेल, तर त्यानेही आधी गत चुकांकडे एक अपघात म्हणून पाहिले पाहिजे आणि भूतकाळ विसरून पुढे गेले पाहिजे. तरच, भविष्य घडवता येईल. भूतकाळात अडकलेले लोक वर्तमान आणि भविष्य दोन्हीही गमावतात. म्हणून हसा आणि आयुष्य सहजतेने बघायला शिका.'

या कथेतून पुन्हा डोळ्यासमोर येतो, तो लाफिंग बुढ्ढा! ज्याचे दोन्ही हात वर, ढेरपोटे पोट, तुळतुळीत टक्कल आणि मनमोकळे हास्य आपल्याला हसायला आणि आपले प्रश्न विसरायला भाग पाडते. 

आपण आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो, तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का? आपण नुसता विचार करत राहतो, त्याने खरंच काही बदल घडणार आहे का? भूतकाळ निसटून गेला आहे, त्यातल्या वाईट आठवणी उगाळून हाती काही लागणार आहे? मग का आपण स्वत:ला त्रास करून घेत आहोत? ज्या गोष्टी बदलणार नाहीत, त्यांचा विचार न करता, ज्या गोष्टी आपण बदलवू शकू, त्याचा विचार केला, तर आयुष्य आपोआपच लाफिंग बुढ्ढासारखे आनंदी होईल. 

चुका प्रत्येकाकडून घडतात आणि त्या घडायलाही हव्यात. त्याशिवाय आपण शिकणारच नाही. दर वेळी वेगवेगळ्या चुका घडल्या तरी चालेल, पण एकच चूक वारंवार न होत नाहीये ना, हे लक्षात घेतले पाहिजे. वर्तमानात हव्या तेवढ्या चुका होऊदेत, त्यातून शिकत आपल्याला भविष्य घडवायचे आहे आणि भविष्यात भूतकाळातील आपल्याच चुका आठवून हसायचे आहे, अगदी लाफिंग बुढ्ढासारखे!