शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

आपल्या चुकांवर लोकांनी हसण्याआधी स्वतःच हसायला शिका; सांगताहेत संदीप महेश्वरी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 16:38 IST

आपण आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो, तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का? खरंच विचार करायला हवा!

तुम्हाला फेंगुशुईचा लाफिंग बुढ्ढा माहितीये का? तोच जो, या कानापासून त्या कानापर्यंत हसताना दिसतो. ती केवळ मूर्ती नाही, तर असेच दिलखुलासपणे जगणारे लोक आपल्या सभोवताली आहेत. त्यांना पाहता आपल्याला त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे की काय, असा प्रश्न पडतो. परंतु, समोरच्याच्या मनात हा संभ्रम निर्माण होण्याची स्थिती तयार करणे, हेच त्यांच्या यशाचे गमक आहे. सुख, दु:ख, उद्विग्न, चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात. परंतु, कोणी त्याचा फार विचार करतात, तर कोणी दुर्लक्ष! म्हणून लाफिंग बुढ्ढा हा आपला आदर्श हवा. आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच, परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे. अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही.

एका साधूंच्या आश्रमात एक युवक संन्यस्त जीवनाची दीक्षा घेण्यासाठी आला. साधूंच्या सभेत त्याने आपल्या गतकाळातील चुकांची कबुली दिली. साधू आपल्याला चुकांचे प्रायश्चित्त सुचवतील असे त्याला वाटले. परंतु झाले उलटेच. सगळे साधू त्याच्या चुका ऐकून हसू लागले. युवक खजिल झाला. त्यानंतर बराच काळ लोटला. परंतु, सगळे आपल्याला हसले, ही खंत मनातून जात नव्हती. एकदा धीर करून त्याऐकून ने आपल्या गुरुंना विचारले. `त्यादिवशी माझ्या चुकांची कबुली ऐकून सगळे मला का हसले?'

त्यावर गुरुजी उत्तरले, `बाळा, हीच सन्यस्त जीवनाची पहिली दिक्षा आहे. दुसऱ्यांच्या चुकांवर हसण्याआधी आपल्या चुकांवर हसायला शिका, म्हणजे आपल्या चुकांवर कोणी हसले, याचा राग येणार नाही. संन्याशाला राग, लोभ शोभत नाही. सामान्य मनुष्यालाही या गोष्टींचा त्याग करायचा असेल, तर त्यानेही आधी गत चुकांकडे एक अपघात म्हणून पाहिले पाहिजे आणि भूतकाळ विसरून पुढे गेले पाहिजे. तरच, भविष्य घडवता येईल. भूतकाळात अडकलेले लोक वर्तमान आणि भविष्य दोन्हीही गमावतात. म्हणून हसा आणि आयुष्य सहजतेने बघायला शिका.'

या कथेतून पुन्हा डोळ्यासमोर येतो, तो लाफिंग बुढ्ढा! ज्याचे दोन्ही हात वर, ढेरपोटे पोट, तुळतुळीत टक्कल आणि मनमोकळे हास्य आपल्याला हसायला आणि आपले प्रश्न विसरायला भाग पाडते. 

आपण आयुष्याकडे जेवढ्या गांभीर्याने पाहतो, तेवढ्या गांभीर्याने पाहण्याची खरंच गरज आहे का? आपण नुसता विचार करत राहतो, त्याने खरंच काही बदल घडणार आहे का? भूतकाळ निसटून गेला आहे, त्यातल्या वाईट आठवणी उगाळून हाती काही लागणार आहे? मग का आपण स्वत:ला त्रास करून घेत आहोत? ज्या गोष्टी बदलणार नाहीत, त्यांचा विचार न करता, ज्या गोष्टी आपण बदलवू शकू, त्याचा विचार केला, तर आयुष्य आपोआपच लाफिंग बुढ्ढासारखे आनंदी होईल. 

चुका प्रत्येकाकडून घडतात आणि त्या घडायलाही हव्यात. त्याशिवाय आपण शिकणारच नाही. दर वेळी वेगवेगळ्या चुका घडल्या तरी चालेल, पण एकच चूक वारंवार न होत नाहीये ना, हे लक्षात घेतले पाहिजे. वर्तमानात हव्या तेवढ्या चुका होऊदेत, त्यातून शिकत आपल्याला भविष्य घडवायचे आहे आणि भविष्यात भूतकाळातील आपल्याच चुका आठवून हसायचे आहे, अगदी लाफिंग बुढ्ढासारखे!