शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावल्याने घरात लक्ष्मी येते; वाचा सायंकाळी दिवा लावण्याचे फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 14:25 IST

दिवा केवळ प्रकाश दर्शवत नाही तर मनातील अंधःकार देखील दूर करतो. रोज सायंकाळी दिवा लावून काही क्षण देवाच्या सान्निध्यात घालवा आणि फरक बघा!

'दिवा पाहुनी लक्ष्मी येते, करू तिची प्रार्थना, शुभं करोति म्हणा' हे गीत आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहे. सायंकाळ झाली की देवापाशी आणि तुळशीपाशी दिवा लावणे हा आपल्यावर झालेला संस्कार आहे. दिव्याची ज्योत देवाजवळच नाही, तर आपल्या मनातही प्रकाश पाडते. तिचे चैतन्य आपल्याला अनुभवता येते. समईच्या ठेवणाऱ्या संथ ज्योतीकडे पाहत दोन क्षण उभे राहिले, तरी मन शांत होते. वास्तुशास्त्रातही दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. 

दिवा हे अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. त्यातून जिवंतपणा, कृतिशीलता, बुद्धिमत्ता, साहस या गोष्टी दिसतात. दिव्यामुळे अंधाराचे साम्राज्य नाहीसे होते. आजही संपूर्ण भारतात दिवाळीत घराघरात जास्तीत जास्त दिवे पहावयास मिळतात, लहानपणापासूनच "दिवे लावा शंभर दारी, भाग्य येईल तुमच्या घरी" असे आपण शिकत आलो आहोत या दिव्याचे निरनिराळे उपयोग आता आपण पाहूयात. 

>>घरामध्ये सकाळी व संध्याकाळी देवाजवळ निदान एक तास तरी दिवा लावावा त्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 

>>घराच्या आग्नेय दिशेला दिवा लावावा त्या मुळे घरात आजारपणे येत नाहीत (कर्पूर होम केला तर अत्युत्तम)

>>रोज सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने भाग्य उजळते.

>>घरात देवाजवळ निरंतर दिवा चालू ठेवल्याने ठेवल्याने घरावर अरिष्ट येत नाहीत.

>>गुलाब पाण्यातल्या वातीचा उपयोग करून दिवा लावल्यास घरात शांततेचा अनुभव होतो.

>>रोज देवघरातल्या दिव्याच्या ज्योती कडे दोन मिनिटं एकटक डोळ्यातून पाणी येईपर्यंत पहावे) (यास अग्नी त्राटक म्हणतात) यामुळे आपली नजर तीक्ष्ण होऊन आत्मविश्वास वाढतो.

>>देवाजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावल्यास आर्थिक अडचण दूर होते (हा दिवा निरंतर असल्यास जास्त फायदा होतो).

>>गाईच्या तुपाचा उपयोग करून कापूराबरोबर दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा तर जातेच शिवाय आर्थिक अडचणीही दूर होते (याचा अनुभव बऱ्याच लोकांना आहे) यात तुम्ही कापुराशिवाय, अत्तर, वाळलेली कडुलिंबाची पाने, तुळशीची पाने सुद्धा टाकू शकता.