शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

Kojagiri purnima 2020: कोजागिरी पौर्णिमा खास का?; काय आहे मुहूर्त, व्रत, वैशिष्ट्य, अन चंद्राच्या नैवेद्यामागचे शास्त्र? जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 29, 2020 19:00 IST

Kojagiri Purnima 2020: शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हटले जाते. यंदा ३० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. सायंकाळी ५. ४५ मिनीटांनी सरू होऊन दुसऱ्या दिवशी ८.१८ मिनीटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. या दिवशी शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठून महालक्ष्मी आणि लक्ष्मीपती विष्णू यांची पूजा करायची असते. धूप-दीप-गंधाक्षता वाहून श्रीसुक्त आणि विष्णुसहस्रनामाचे पठण करावे. 

हेही वाचा : Kojagiri purnima 2020 : कोजागिरीच्या पौर्णिमेच्या रात्री, देवी लक्ष्मी विचारते, 'को जागरति?' जाणून घ्या, कोजागिरीचं महत्त्व!

शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो. आजकाल नव्हे, तर वैदिक काळापासून आपल्या रसिक पूर्वजांनी वर्षातील सगळ्या रात्रींचे, सगळ्या पौर्णिमांचे नीट निरीक्षण करून या अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शारदीय पौर्णिमेचा बहुमान दिला. इतकेच नव्हे, तर याच पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी सुखसंपत्तीच्या वरदानाचे वाटप करत भूतलावर फिरते अशी रम्यतम श्रद्धा जनमानसात दृढ आहे. सर्वांनी जागे राहून या रात्रीचा रसिकतेने निरीक्षणाचा आनंद घ्यावा, असा त्यामागील हेतू आहे. जागे राहणे म्हणजे केवळ न झोपणे असे नाही, तर आपल्या कर्तव्याप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती, निसर्गाप्रती आपण जागृत असणे, महालक्ष्मीला अभिप्रेत असते. जो जागृत असतो, तोच आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ शकतो. निसर्गाशी मैत्री करू शकतो. अशा शरद ऋतूचे कौतुक करताना आणि या रात्रीचे वैशिष्ट्य सांगताना ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ज्ञानोबामाऊली म्हणतात, 

आणि बरवा शारदु, शारदी पुढती चांदु, चंद्री जैसा संबंधु, पूर्णिमेचा।

सर्व चांगल्या गोष्टी एकत्र आल्यावर काय घडते, हे ज्ञानोबांनी या ओवीत सांगितले आहे. असेच आपल्याही आयुष्यात सर्वकाही चांगले घडावे, म्हणून कोजागिरीचे व्रत करावे, असे म्हटले जाते. 

पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. म्हणून कोजागिरीला चंद्राला दूधाचा नैवेद्य दाखवतात आणि त्याची किरणे दूधात पडल्यावर ते दूध प्रसादरूपी ग्रहण करतात. 

कोजागिरीच्या रात्री, द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त कोजागिरीला रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना या दिवशी केली जाते. 

अनेक ठिकाणी कोजागिरीनिमित्त संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. चंद्रावर आधारित गाण्यांनी कोजागिरीची सायंकाळ सुरेल होते. उगवला चंद्र पुनवेचा, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र आहे साक्षीला, चंद्रिका ही जणू, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, चांदण्यात फिरताना, तोच चंद्रमा नभात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, हे सुरांनो चंद्र व्हा...अशी कित्येक भावगीते आपल्या मनातही चांदणे शिंपडतात. 

आकाशीचा चंद्रमा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथ देतो. आपण जाऊ तिथे आपल्या सोबत असतो. म्हणून बालपणी चांदोमामा म्हणत त्याच्याशी जडलेले नाते, प्रियकर-प्रेयसीचा दूत होण्यापर्यंत तो निभावतो. एवढेच नाही, तर वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा देखील त्याच्याच साक्षीने रंगतो. अशा चंद्राची शितलता आपल्या आयुष्यात व्यापून राहावी, हेच मागणे देवी शारदेकडे मागुया.

हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

टॅग्स :kojagariकोजागिरी