शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Kojagiri purnima 2020: कोजागिरी पौर्णिमा खास का?; काय आहे मुहूर्त, व्रत, वैशिष्ट्य, अन चंद्राच्या नैवेद्यामागचे शास्त्र? जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: October 29, 2020 19:00 IST

Kojagiri Purnima 2020: शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो.

ज्योत्स्ना गाडगीळ

अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हटले जाते. यंदा ३० ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. सायंकाळी ५. ४५ मिनीटांनी सरू होऊन दुसऱ्या दिवशी ८.१८ मिनीटांपर्यंत पौर्णिमेची तिथी असणार आहे. या दिवशी शक्य झाल्यास ब्रह्म मुहूर्तावर उठून महालक्ष्मी आणि लक्ष्मीपती विष्णू यांची पूजा करायची असते. धूप-दीप-गंधाक्षता वाहून श्रीसुक्त आणि विष्णुसहस्रनामाचे पठण करावे. 

हेही वाचा : Kojagiri purnima 2020 : कोजागिरीच्या पौर्णिमेच्या रात्री, देवी लक्ष्मी विचारते, 'को जागरति?' जाणून घ्या, कोजागिरीचं महत्त्व!

शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. खगोलशास्त्रीयदृष्ट्या कोजागिरीच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या सगळयात जवळ असतो. आजकाल नव्हे, तर वैदिक काळापासून आपल्या रसिक पूर्वजांनी वर्षातील सगळ्या रात्रींचे, सगळ्या पौर्णिमांचे नीट निरीक्षण करून या अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला शारदीय पौर्णिमेचा बहुमान दिला. इतकेच नव्हे, तर याच पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी सुखसंपत्तीच्या वरदानाचे वाटप करत भूतलावर फिरते अशी रम्यतम श्रद्धा जनमानसात दृढ आहे. सर्वांनी जागे राहून या रात्रीचा रसिकतेने निरीक्षणाचा आनंद घ्यावा, असा त्यामागील हेतू आहे. जागे राहणे म्हणजे केवळ न झोपणे असे नाही, तर आपल्या कर्तव्याप्रती, कुटुंबाप्रती, समाजाप्रती, राष्ट्राप्रती, निसर्गाप्रती आपण जागृत असणे, महालक्ष्मीला अभिप्रेत असते. जो जागृत असतो, तोच आयुष्याचा भरभरून आनंद घेऊ शकतो. निसर्गाशी मैत्री करू शकतो. अशा शरद ऋतूचे कौतुक करताना आणि या रात्रीचे वैशिष्ट्य सांगताना ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात ज्ञानोबामाऊली म्हणतात, 

आणि बरवा शारदु, शारदी पुढती चांदु, चंद्री जैसा संबंधु, पूर्णिमेचा।

सर्व चांगल्या गोष्टी एकत्र आल्यावर काय घडते, हे ज्ञानोबांनी या ओवीत सांगितले आहे. असेच आपल्याही आयुष्यात सर्वकाही चांगले घडावे, म्हणून कोजागिरीचे व्रत करावे, असे म्हटले जाते. 

पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो. या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती, असे म्हणतात. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणे विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. म्हणून कोजागिरीला चंद्राला दूधाचा नैवेद्य दाखवतात आणि त्याची किरणे दूधात पडल्यावर ते दूध प्रसादरूपी ग्रहण करतात. 

कोजागिरीच्या रात्री, द्वापार युगात वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. वृंदावनात निधीवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला रचतात अशी मान्यता आहे. त्या विशेष प्रसंगाची आठवण करुन वैष्णव संप्रदायाचे भक्त कोजागिरीला रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधाची विशेष उपासना या दिवशी केली जाते. 

अनेक ठिकाणी कोजागिरीनिमित्त संगीतसंध्येचे आयोजन केले जाते. चंद्रावर आधारित गाण्यांनी कोजागिरीची सायंकाळ सुरेल होते. उगवला चंद्र पुनवेचा, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र आहे साक्षीला, चंद्रिका ही जणू, चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले, चांदण्यात फिरताना, तोच चंद्रमा नभात, लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, हे सुरांनो चंद्र व्हा...अशी कित्येक भावगीते आपल्या मनातही चांदणे शिंपडतात. 

आकाशीचा चंद्रमा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली साथ देतो. आपण जाऊ तिथे आपल्या सोबत असतो. म्हणून बालपणी चांदोमामा म्हणत त्याच्याशी जडलेले नाते, प्रियकर-प्रेयसीचा दूत होण्यापर्यंत तो निभावतो. एवढेच नाही, तर वयाची ८० वर्षे पूर्ण केल्यावर सहस्रचंद्रदर्शन सोहळा देखील त्याच्याच साक्षीने रंगतो. अशा चंद्राची शितलता आपल्या आयुष्यात व्यापून राहावी, हेच मागणे देवी शारदेकडे मागुया.

हेही वाचा : Navratri 2020: त्रिभुवन भुवनी पाहता तुज ऐसी नाही...देवीच्या आरतीचा भावार्थ!

टॅग्स :kojagariकोजागिरी