शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
4
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
5
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
6
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
7
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
8
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
9
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
10
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
11
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
12
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
13
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
14
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
15
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
16
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
17
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
18
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
19
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
20
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? समर्थांच्या भक्तीचा ‘हा’ अनुभव देईल नवी दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 09:09 IST

Shree Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत, अशी मान्यता आहे.

Shree Swami Samarth Maharaj: स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत, अशी मान्यता आहे. स्वामी समर्थांचे केवळ नाव घेतले की, आधार मिळाल्यासारखे वाटते, असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामीनामामुळे प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता मिळते, असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो जण सापडतील. स्वामी महाराजांच्या अनेकविध कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत. त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते. नवा विश्वास निर्माण होतो. स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते, असे अनेक जण सांगतात. अशीच एक कथा सांगितली जाते. यामुळे 'भिऊ नकोस...'चा मंत्र पुनःप्रत्ययाला येतो, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता. एकीकडे श्रीमंताघरच्या मुलीला कशी मागणी घालायची, या विचाराने अनेक जण स्थळे सूचवत नसत. तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची; पण, मोठा हुंडा मागितला जायचा. हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते. शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात. काही दिवसांनी सर्वप्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो. महारुद्ररावांना आनंद होतो. स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प करतात.

आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते

स्वामींची भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात. तेव्हा, सावधगिरी बाळगा, हलगर्जीपणा करू नका, अशी सूचना स्वामी त्यांना करतात. मात्र, आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे महारुद्रराव फारसे लक्ष देत नाहीत. सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो. बाकीची मंडळी झोपतात. तेवढ्यात, अरे झोपला काय आहेस? चोर येऊन सर्व लुटून गेले आहे, असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात. महारुद्रराव पाहतात तर, राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यांसह त्यांचे सर्व सामान चोर लंपास करतात. महारुद्रराव स्वामींना म्हणतात की, स्वामी, चोर आले तेव्हाच का नाही सांगितले? यावर, स्वामी म्हणतात की, अरे आम्ही काय पहारेकरी आहोत का? आम्ही आधीच सांगितले होते. सावध राहा म्हणून. पण तुम्ही गाफील राहिलात. महारुद्रराव स्वामींना शरण जातो. स्वामी सांगतात की, पाच चोर होते. शोध घ्या त्यांचा.

महारुद्रराव आणि चोळप्पा गावच्या पाटीलकडे धाव घेतात

महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात. तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते. महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात. देशपांडे मदत करायला तयार होतात. परंतु, माझा एक मित्र आहे. तो गावाचा पाटील आहे. त्यांना मदतीला घेऊ शकतो, असे ते सुचवतात. सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात. पाटील चोरांच्या एका ठिकाणाची झडती घेतात. तिथे दोन चोर सापडतात. शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात. ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात. महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू मिळतात.

सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? 

ते सर्वजण स्वामींकडे येऊन येतात आणि म्हणतात की, सर्वजण आम्हाला विचारतात की, आम्ही स्वामी भक्ती का करतो? सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज? तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की, स्वामी भक्तीने समाधान मिळते. आता मला जाणीव झाली की, स्वामी भक्तीने आधारही मिळतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते, तेव्हा सद्गुरुंचे नाव त्याला धीर देते. सद्गुरु माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरीत करते. यावर, स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.

|| श्री स्वामी समर्थ || 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकReligious Placesधार्मिक स्थळे