शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रामरक्षेतील केवळ ‘हा’ श्लोक म्हणा; संपूर्ण विष्णुसहस्रनामाचे पुण्य मिळवा; पाहा, रामनामाचा महिमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 08:19 IST

रामनाम ज्याचे मुखी, तो नर धन्य तिन्ही लोकी, असे म्हटलेच गेले आहे. पाहा, रामनामाचे महत्त्व...

भारतीय संस्कृतीत देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. देशभरातील हजारो मंदिरांमध्ये दररोज अगदी न चुकता अभिषेक, पूजा परंपरांप्रमाणे पार पडत असतात. याशिवाय कोट्यवधी घरात आपापले कुळाचार, कुळधर्म यांप्रमाणे सकाळी पूजा आणि सांजवात केली जाते. यावेळी अनेकविध प्रकारची स्तोत्र, मंत्र म्हटली जातात. आताच्या घडीला शेकडो प्रकारची, अनेक देवतांची लाखो श्लोक, स्तोत्र, मंत्र आहेत आणि याचे पठण नित्यनेमाने केले जाते. 

प्रत्येक स्तोत्राचे स्वत:चे अस्तित्व, वैशिष्ट्य, प्रभाव, लाभ, उपयुक्तता वेगळी आहे. यामध्ये विष्णुसहस्रनामाचे महत्त्व वेगळे आहे. मात्र, प्रत्येकाला विष्णुसहस्रनाम किंवा त्याचा पाठ करता येतोच असे नाही. इच्छा असूनही अनेकांना त्याचे पठण करता येत नाही. मात्र, यामुळे निराश व्हायचे काहीच कारण नाही. कारण कालातीत महत्त्व असलेल्या रामरक्षेतील केवळ एक श्लोक पुरेसा असून, संपूर्ण विष्णुसहस्रनामाचे पुण्य मिळू शकते, असे सांगितले जाते. रामरक्षा हजारो वर्षांपासून उपलब्ध असून, त्याचे महत्त्व, प्रभाव, पुण्य वेगळे आहे. रामरक्षेतील तो श्लोक कोणता, यासंदर्भात एक पौराणिक कथा सांगितली जाते. जाणून घेऊया...

एकदा पार्वतीने विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण करण्याचा संकल्प केला होता. पार्वती या स्तोत्राचे १००० पाठ करत असे. एखाद्या वेळेस जर काही विघ्ने आल्यास, पार्वती देवी ते पुन्हा पहिल्यापासून म्हणण्यास सुरुवात करायची. एकदा विष्णुसहस्रनाम स्तोत्र पठण असताना अचानक देवाधिदेव महादेव शिवशंकर तेथे आले. महादेवांमूळे पार्वतीच्या स्तोत्र पठनात खंड पडला. निराश झालेल्या पार्वतीला पाहून महादेवांनी तिला राम नामाचा जप करण्यास सांगितला. विष्णुसहस्रनाम आणि श्रीराम नामात काय फरक आहे? असे पार्वतीने महादेवाला विचारले, असता महादेव म्हणाले, 

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे| साहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने|| 

म्हणजेच, एकदा श्रीराम नाम घेणे म्हणजेच एक हजारवेळा नामपठण करणे होय. विष्णूसहस्रनामात भगवान श्रीविष्णूंची १००० नावे आहेत. मात्र, श्रीविष्णूंचा सातवा अवतार असलेल्या श्रीरामांचे केवळ नामस्मरण करणे हे नाव १००० नामाबरोबरीचे आहे. त्यामुळे १००० विष्णुसहस्रनामाचे जेवढे फल मिळते तेवढेच राम नामाने मिळते. महादेव पार्वतीला सांगतात की, श्रीराम हे माझे आदर्श आहेत. मी सदैव ध्यान करताना श्रीराम नामाचा नेहमी जप करत असतो, असे महादेव पार्वती देवीला सांगतात. 

महाभारतात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख

भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

विष्णुसहस्रनामाचा प्रभाव आणि लाभ

विष्णुसहस्रनाम पठणाने आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते. मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो, असे सांगितले जाते.  

टॅग्स :spiritualअध्यात्मिक