शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन..! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 11:43 IST

शेवटी त्या कर्माचं आणि फळाचं गणित हे प्रारब्धावर अवलंबून असते..

फळाची अपेक्षा न बाळगता आयुष्यात आपण नेहमी फक्त कर्म करत राहावे. आणि ते कर्म सत्याच्या वाटेवरचं आणि कमीपणाचा अभिनिवेश मानता करणे गरजेचे आहे. शेवटी त्या कर्माचं आणि फळाचं गणित हे प्रारब्धावर अवलंबून असते.मग आपोआप गमावण्याची भीती आणि शून्यपणाची लाज गळून पडते.  दुकानात कामाला असणारा एक नोकर मालकाला कोणतीही पूर्व कल्पना न देता गैरहजर राहिला. मालकाला वाटलं ह्याचा जर पगार वाढवला तर हा काम मन लावून करेल. म्हणून पुढच्या वेळेस मालकाने पगाराहुन अधिक पैसे त्याला दिले. तो काही बोलला नाही , त्याने चुपचाप मिळालेले पैसे ठेवून दिले. काही महिन्यानंतर परत त्याचप्रमाणे घडले. तो कोणतीही पूर्व कल्पना न देता सुट्टीवर गेला . 

मालकाला त्याचा खूप राग आला आणि त्याने विचार केला की, याचा पगार वाढवून काय फायदा झाला? हा काही सुधारणार नाही. पुढच्या वेळेस मालकाने त्याला वाढवलेला पगार कमी करून त्याच्या हाती रक्कम ठेवली . त्याने कुठलीही तक्रार न करता चुपचाप तो पगार घेतला. मालकाला खूप आश्चर्य वाटलं.       अखेर न राहवून त्याने त्याला विचारलं, ''मागच्या वेळेस तू गैरहजर राहीलास तरी तुझा पगार वाढवला. तेंव्हा सुद्धा तू काही बोलला नाहीस आणि ह्या वेळेस सुद्धा तू न पूर्वसुचना गैरहजर राहिला.  म्हणून तुझा वाढवलेला पगार कापला. तरीही तू काही बोलत नाही.. असं का ? त्यावर त्याने दिलेलं उत्तर विचार मनाला भिडणारं होतं. .''तो म्हणाला, मालक पहिल्या वेळी मी गैरहजर राहीलो त्यावेळी मला मुलगा झाला होता. तुम्ही माझा पगार वाढवलात तेंव्हा मी विचार केला , देवाने माझ्या मुलाचा पालनपोषणाचा हिस्सा पाठवला. दुसऱ्यांदा जेंव्हा मी गैरहजर राहिलो तेंव्हा माझ्या आईचं निधन झाले होते. आणि तुम्ही माझा वाढवलेला पगार कापलात. मी मनाशी विचार केला माझी आई तिचा वाटा तिच्या बरोबर घेऊन गेली .मग मी ह्या पगाराबद्दल चिंता का करू ?ज्याची जबाबदारी खुद्द देवाने घेतली आहे ...

.शिकवण : जीवनात काय मिळवलं आणि काय गमावलं असं जर कुणा विचारलं तर ,आवर्जून सांगा, जे गमावलं तो माझा अविचार होता आणि जे कमावलं ती सद्गुरू कृपा होती.. 

टॅग्स :PuneपुणेAdhyatmikआध्यात्मिक