शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

Karwa Chauth 2023: चौथ म्हणजे चतुर्थी, पण करवा म्हणजे काय? या व्रताचे महाभारत कनेक्शनही जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 13:57 IST

Karwa Chauth 2023: आज अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थीला आपण जसे चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतो तसेच अमराठी स्त्रिया करवा चौथ हे व्रत करतात, त्याबद्दल... 

आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यानिमित्त आपण बाप्पाची उपासना म्हणून संकष्टीचे व्रत करतो. तसेच आजची चतुर्थी ही अन्य कारणामुळेही महत्त्वाची ठरते, ती म्हणजे करवा चतुर्थी या व्रतामुळे. पतीला दिर्घआयुष्य मिळावे म्हणून आपल्याकडे जसे वटपौर्णिमेचे व्रत आहे, तसे उत्तर भारतीय स्त्रिया हे व्रत करवा चौथ या नावे करतात. दिवसभर उपास आणि रात्री चंद्र दर्शन घेऊन पाणी पिणे आणि फराळ करणे असे या व्रताचे स्वरूप असते. हिंदी चित्रपटात यावर आधारित अनेक दृश्य आपण पाहिली आहेत. त्याबद्दल आपणही अधिक माहिती करून घेऊ आणि या व्रताचा महाभारताशी संबंध कसा आहे तेही जाणून घेऊ. 

करवा चौथ हा शब्द आला कुठून? 

तर त्यामागे आहे एक पौराणिक कथा! करवा नावाची एक पतिव्रता स्त्री नदीवर धुणं करत असताना तिथे एक मगर आली आणि त्या मगरीने तिच्या नवऱ्याला पकडले. तिने हातातले काम सोडून चक्क मगरीचा सामना करत नवऱ्याला वाचवण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तिच्या नवऱ्याला नेण्यासाठी आलेल्या यमदूतांनी तिचे साहस पाहिले आणि यमराजाला ही माहिती दिली. तिच्या पातिव्रत्यासमोर यमराजही झुकले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला मगरमिठीतून सोडवले, तो दिवस होता चतुर्थीचा. दोघांनी मिळून चंद्र दर्शन घेतले आणि चंद्राच्या साक्षीने मिळालेले यश साजरे करण्यासाठी, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करवाने चौथचे अर्थात चतुर्थीचे वर्णन केले. तेव्हापासून अनेक उत्तर भारतीय महिला करवा चतुर्थीचे व्रत करू लागल्या. 

चंद्र दर्शनासाठी चाळणीचा वापर का?

करवा नावाची महिला पतिव्रता होती, आपल्या पतीचे मुख हेच चंद्रापेक्षा अधिक प्रिय मानणारी होती. त्याच्या जीवाचे रक्षण आणि चंद्राप्रती कृतज्ञता हे दोन्ही भाव एकत्रित व्यक्त करण्यासाठी तिने चंद्राच्या कृपेने पतीचे मुख पाहता आले, म्हणून तिने छिद्र असलेल्या चाळणीतून चंद्र दर्शन घेतले आणि नंतर त्याच चाळणीतून पतीचे दर्शन घेत व्रत पूर्ण केले. तेव्हापासून चंद्र दर्शन थेट न घेता चाळणीतून चंद्र दर्शन घेण्याची प्रथा पडली. पतीवर निस्सीम प्रेम असलेल्या या भारतीय महिलेला चंद्र देखील पतीसमोर आकर्षक वाटत नाही, म्हणून त्याच्याकडे ती आडून पाहते आणि नवऱ्याचा मुखचंद्र डोळे भरून पाहते, हा भाव त्या कृतीमागे दडला असावा. 

या व्रताला महाभाराचीही पार्श्वभूमी : 

एकदा पांडवपुत्र अर्जुन निलगिरी पर्वतावर तपस्या करत असताना त्याच्यावर नैसर्गिक संकट आलं. त्याची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून महर्षी नारदांच्या सांगण्यावरून द्रौपदीनेदेखील हे व्रत केलं आणि अर्जुनावरचं संकट टळलं. इथेही स्त्रीचं पातिव्रत्य दिसून येतं. एकूणच हे व्रत भावनांशी निगडित आहे हे लक्षात येते. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी