शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

फक्त आठवडाभर हा प्रयोग करून पहा, तुमचं आयुष्यच बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 08:33 IST

दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

यशस्वी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, आपल्या यशात अडथळे आणण्यास आपणच जबाबदार आहोत, हे मात्र आपल्याला काही केल्या उमगत नाही. आपल्या अपयशासाठी आपण दुसऱ्याला दोष देत राहतो. लेखक व. पु. काळे म्हणत, 'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला कारण मिळाले नाही, तर तो अस्वस्थ होतो!' म्हणून स्वतःच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

१. आजचे काम उद्यावर ढकलू नका : जेव्हा एखादे काम आपल्याला मनापासून करावेसे वाटते, ते सुरू करण्यासाठी आपण नेहमी उद्यापासून सुरुवात करण्याची योजना आखतो. इंग्रजीत म्हण आहे, 'टुमॉरो नेव्हर कम' उद्या कधीच उगवत नाही. हिंदीतही म्हणतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' म्हणजेच कामाची चालढकल करू नका. जेव्हा आपण उद्यापासून सुरुवात करू म्हणतो, तेव्हा आजची जबाबदारी झटकत असतो. कामाची टाळाटाळ करत असतो. आपले मन त्या कामाची जबाबदारी झटकत असते त्यामुळे मेंदूलाही ते काम न करण्याची सूचना मिळते आणि काम कधीच सुरू होत नाही. म्हणून जी गोष्ट मनात आहे, ती मनात आल्याबरोबर त्यावर लगेच काम सुरू करा. उदा. व्यायामाची सुरुवात करायची आहे. पण हा विचार रात्री मनात आला, तर सुरुवात नक्कीच उद्यापासून होईल, परंतु रात्री प्रत्यक्ष व्यायाम शक्य नसला, तरी किमान शतपावलीने मी माझ्या ठरवलेल्या कामाची सुरुवात केली, याची जाणीव मेंदूला होते आणि दुसऱ्या दिवसापासून मेंदू स्वतः तुम्हाला तुमच्या नियोजित कामाची सूचना देतो. वेळ कधीच गेलेली नसते, तिचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो आणि कामाला उद्यापासून नाही, तर आजपासून सुरुवात करावी लागते. 

२. जे करेन ते चांगलेच करेन : व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून होत असते. ज्याचे काम चांगले त्याला दाम अधिक मिळतो. दोन पैसे अधिक गेले तरी चालतील, पण काम चांगले झाले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. याचाच अर्थ चांगल्या कामाला चांगला मोबदला मिळतो आणि चांगल्या कामाची प्रत्येक जण दखल घेतो. म्हणून लहानात लहान काम करताना सुद्धा ते इतके पद्धतशीरपणे करा, की लोकांना तुमची दखल घ्यावीच लागेल. काम करताना प्रामाणिकपणे करा. आपल्याकडून १०० टक्के कसे देता येतील, याचा विचार करा. माणसांची पारख त्याच्या गुणांवरून होते. छोट्या छोट्या सवयीवरून होते. म्हणून उरकून टाकण्याची सवय सोडून द्या. स्वतःला बजावून सांगा, 'चलता है, नही चलेगा!' कोणी माझे काम पाहो न पाहो, मला माझे काम आवडले पाहिजे, मला माझ्या कामाचे समाधान मिळाले पाहिजे. एवढी प्रामाणिकता अंगी बाणली, तरी यशापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकणार नाही. 

हे दोन्ही प्रयोग आजपासून सुरू करा. अगदी आतापासून...!