शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
2
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
3
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
4
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
5
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
6
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
7
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
8
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
9
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
10
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
11
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
12
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...
13
विमान अपघातानंतर मोठा बदल! एन. चंद्रशेखरन आता एअर इंडियाचे 'कॅप्टन'! का घेतला निर्णय?
14
Malegaon Factory Election Result: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
15
भारतासोबतचा पंगा तुर्कस्तानच्या अंगलट आला! एक महिन्यात कोट्यवधीच नुकसान झालं
16
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री पहिल्यांदाच येणार आमने-सामने, भेट होणार? समोर येतेय अशी माहिती  
17
नेहा त्याला भाऊ मानायची, पण तौफीकला लग्न करायचं होते, त्यामुळे त्याने...; कुटुंबाचा दावा
18
मुंबईमध्ये नऊ कोटींचे सोने जप्त, सोने वितळवणाऱ्या ७ जणांना अटक, असे करायचे काम
19
ओसाड वाळवंट असलेला कतार कसा झाला श्रीमंत देश! ५० वर्षांपूर्वीची 'ती' घटना, जिने बदलून टाकलं सारं चित्र!
20
Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

फक्त आठवडाभर हा प्रयोग करून पहा, तुमचं आयुष्यच बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 08:33 IST

दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

यशस्वी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. परंतु, आपल्या यशात अडथळे आणण्यास आपणच जबाबदार आहोत, हे मात्र आपल्याला काही केल्या उमगत नाही. आपल्या अपयशासाठी आपण दुसऱ्याला दोष देत राहतो. लेखक व. पु. काळे म्हणत, 'माणूस अपयशाला भीत नाही, तर अपयशाचे खापर फोडायला कारण मिळाले नाही, तर तो अस्वस्थ होतो!' म्हणून स्वतःच्या यशाची किंवा अपयशाची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. दुसऱ्याने कसे वागावे याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तो वेळ स्वतःला घडवण्यावर खर्च करा आणि दोन वाक्यांची आयुष्याला जोड द्या. तुमचे आयुष्य बदलून जाईल. 

१. आजचे काम उद्यावर ढकलू नका : जेव्हा एखादे काम आपल्याला मनापासून करावेसे वाटते, ते सुरू करण्यासाठी आपण नेहमी उद्यापासून सुरुवात करण्याची योजना आखतो. इंग्रजीत म्हण आहे, 'टुमॉरो नेव्हर कम' उद्या कधीच उगवत नाही. हिंदीतही म्हणतात, 'कल करे सो आज कर, आज करे सो अब' म्हणजेच कामाची चालढकल करू नका. जेव्हा आपण उद्यापासून सुरुवात करू म्हणतो, तेव्हा आजची जबाबदारी झटकत असतो. कामाची टाळाटाळ करत असतो. आपले मन त्या कामाची जबाबदारी झटकत असते त्यामुळे मेंदूलाही ते काम न करण्याची सूचना मिळते आणि काम कधीच सुरू होत नाही. म्हणून जी गोष्ट मनात आहे, ती मनात आल्याबरोबर त्यावर लगेच काम सुरू करा. उदा. व्यायामाची सुरुवात करायची आहे. पण हा विचार रात्री मनात आला, तर सुरुवात नक्कीच उद्यापासून होईल, परंतु रात्री प्रत्यक्ष व्यायाम शक्य नसला, तरी किमान शतपावलीने मी माझ्या ठरवलेल्या कामाची सुरुवात केली, याची जाणीव मेंदूला होते आणि दुसऱ्या दिवसापासून मेंदू स्वतः तुम्हाला तुमच्या नियोजित कामाची सूचना देतो. वेळ कधीच गेलेली नसते, तिचा वापर योग्य प्रकारे करावा लागतो आणि कामाला उद्यापासून नाही, तर आजपासून सुरुवात करावी लागते. 

२. जे करेन ते चांगलेच करेन : व्यक्तीची ओळख त्याच्या कर्तृत्वावरून होत असते. ज्याचे काम चांगले त्याला दाम अधिक मिळतो. दोन पैसे अधिक गेले तरी चालतील, पण काम चांगले झाले पाहिजे, अशी आपली मानसिकता असते. याचाच अर्थ चांगल्या कामाला चांगला मोबदला मिळतो आणि चांगल्या कामाची प्रत्येक जण दखल घेतो. म्हणून लहानात लहान काम करताना सुद्धा ते इतके पद्धतशीरपणे करा, की लोकांना तुमची दखल घ्यावीच लागेल. काम करताना प्रामाणिकपणे करा. आपल्याकडून १०० टक्के कसे देता येतील, याचा विचार करा. माणसांची पारख त्याच्या गुणांवरून होते. छोट्या छोट्या सवयीवरून होते. म्हणून उरकून टाकण्याची सवय सोडून द्या. स्वतःला बजावून सांगा, 'चलता है, नही चलेगा!' कोणी माझे काम पाहो न पाहो, मला माझे काम आवडले पाहिजे, मला माझ्या कामाचे समाधान मिळाले पाहिजे. एवढी प्रामाणिकता अंगी बाणली, तरी यशापासून आपल्याला कोणीही दूर ठेवू शकणार नाही. 

हे दोन्ही प्रयोग आजपासून सुरू करा. अगदी आतापासून...!