शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आनंद तरंग: झाड आणि इंजेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 09:25 IST

अठराव्या शतकाच्या अगोदरच्या काळापासून तर धागेदोरे, मंत्रतंत्र, गावठी भगताचा पगडा, देवापुढे बळी, सती प्रथा, मानवी श्रेष्ठत्वांचे स्तोम अशा माऱ्यात समाज पिचला होता.

विजयराज बोधनकरशुभशकुन आणि अपशकुन या दोन पायवाटेवरून चालतांना कित्येक वर्षांपासून मानवी मनात भांडणतंटे निर्माण झालेले आजही पहायला मिळतात. जर कोऱ्या कागदावर टोकाचे नकारात्मक लिहिले तर तो कागदच अपशकुनी आणि दुर्दैवी ठरवला जातो आणि तेच सकारात्मक लिहिले की तोच कागद शुभशकुनी आणि सकारात्मक ठरत जातो. हा लिहिणाऱ्याचा दोष की कागदाचा? आपल्या मनाचे कागद आपण कसे लिहून ठेवले आहेत हे प्रत्येकाने तपासून पाहणे गरजेचे आहे.

पूर्वी मांजर आडवे गेले की लोक घरी परत जायचे आणि आता नव्या काळाने मांजरीला डोक्यातून हद्दपार केल्यामुळे मूळ अज्ञानाचाच पराजय माणसानेच केला आहे, पण मांजरीसारख्या हजारो पोकळ गोष्टी आजही जुनाट विचारसरणीतून नव्या मुक्तीच्या मार्गावर येतांना दिसत नाही. ग्रामीण भागात या अपशकुनाची मुळं आजही घट्ट रूतून असल्याने आर्थिक आणि वैचारिक गरीबीचा घेराव कमी झालेला नाही. नव्या पिढीने यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.डोक्यातला भ्रम संपला की कामाचा योग्य क्रम सुरू होतो. जिथे या शकुन, अपशकुनाचे खेळ थांबलेले दिसते तिथे शांती आणि क्रांतीची सकाळ होताना दिसते. नवा भारत, नवी पिढी सक्षम होण्यात अडचण असेल तर ती अपशकुनाच्या ओझ्याची. देव, धर्म, जात, पंथ, उत्सव, पारायणं, व्रत याचे नवे अर्थ काढणारी मंडळी जोपर्यंत ताकदीने उभी होत नाहीत तोपर्यंत स्वयंप्रेरीत माणसं, समाज घडवणं कसं शक्य आहे? अठराव्या शतकाच्या अगोदरच्या काळापासून तर धागेदोरे, मंत्रतंत्र, गावठी भगताचा पगडा, देवापुढे बळी, सती प्रथा, मानवी श्रेष्ठत्वांचे स्तोम अशा माऱ्यात समाज पिचला होता. त्यातून बराचसा समाज बाहेर पडला असला तरी त्याचा मोठा अंश आजही शिल्लक आहे. त्याचा नायनाट करणे नव्या पिढीच्या हाती आहे. झाडाला मारण्याचे इंजेक्शन दिले तर झाड मरते, अन्यथा त्याचा वटवृक्ष होऊ शकतो.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक