शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
4
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
5
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
6
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
7
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
8
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
9
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
10
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
11
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
12
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
13
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
14
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
15
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
16
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
17
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
18
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
19
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
20
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले

आनंद तरंग: व्यापक अभिव्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2020 00:10 IST

परिपक्व समजतो, त्या व्यक्तीही चटकन् रागावतात. पारिजातकाच्या फुलाच्या जखमेनेही घायाळ होतात. आम्ही मनातून चांगले जग निर्माण व्हावे, असा विचार करतो

इंद्रजित देशमुखसमाजमाध्यमांनी व्यक्त होण्यासाठी मोठे माध्यम समोर आणले आहे; पण यातील व्यक्त होणे बऱ्याच प्रमाणात विकृतीच्या पातळीवर गेलेय. कळपशाही व कंपूशाहीतून प्रकट झालेले शब्दांचे विषारी तुषार अंगावर येत आहेत. खूप कमी अभिव्यक्ती विशाल व व्यापक आहे. मी स्वत:विषयी कोष निर्माण केला आहे. ‘मी सर्वज्ञ आहे. निर्दोष आहे.’ हे कोष मी माझ्याभोवती निर्माण केलेत; पण तसे दिसून येत नाही.

परिपक्व समजतो, त्या व्यक्तीही चटकन् रागावतात. पारिजातकाच्या फुलाच्या जखमेनेही घायाळ होतात. आम्ही मनातून चांगले जग निर्माण व्हावे, असा विचार करतो; पण बाह्यजगाच्या धक्क्याने त्या जगाचे स्वप्न भग्न पावतेय. संवाद, अभिव्यक्तीचा दर्जा माणसाच्या समजुतीनुसार वाढतो. जितकी समज खोल, तितका संवादाचा व अभिव्यक्तीचा दर्जा उच्चतम; पण इथे समज खोल व्हायला तयार नाही. परिपक्व लोकही काय प्रतिसाद देतील सांगता येत नाही. मन्सूर नावाच्या संतांना त्या देशातील राजाने सुळावर चढवायचे ठरविले. राजाच्या बाजूने असणारा जमाव जमला. मन्सूर यांचे गुरूही उपस्थित होते. मन्सूर यांना सुळावर देताना लोक दगड मारत होते. मन्सूर शांतपणे दगडांचा स्वीकार करीत होते; पण त्यांच्या गुरूंनी त्यांच्यावर फुले उधळली, तेव्हा ते व्यथित झाले. ‘गुरुजी तुम्हीसुद्धा?’ गुरुजींची फुले त्यांना पचवायला जड गेली; कारण अर्धवट झुंडीने मारलेले दगड सहज आहेत. कारण ते अर्धवटच आहेत; पण परिपक्व माणूसही गर्दीत सहभागी होतो तेव्हा तोही झुंडीपैकी एक होतो, हे वेदनादायी असते. म्हणून संवाद, अभिव्यक्ती दर्जेदार हवी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक