शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

अंघोळ करण्याआधी खाणे योग्य आहे की अयोग्य? शास्त्र काय सांगते वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 08:00 IST

शास्त्रात म्हटले आहे, की अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. उठल्यावर आपल्या दिनचर्येची सुरुवात प्रसन्न व्हावी, यासाठी व्यायाम, अंघोळ, पूजाआणि नंतर न्याहारी असा शास्त्राने क्रम ठरवून दिला आहे.

आपल्यापैकी अनेकांना सवय असते, सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्कीट खाण्याची! ही सवय एवढी अंगवळणी पडते, की अनेकदा या सवयीमुळे उपास तुटतो. कारण आज उपास आहे आणि उपासाला बिस्कीट खाल्लेले चालत नाही, हे लक्षातच येत नाही. परंतु हा सवयीचा भाग योग्य आहे की अयोग्य, याबाबत शास्त्र काय सांगते, ते पाहू!

शास्त्रात म्हटले आहे, की अंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नये. उठल्यावर आपल्या दिनचर्येची सुरुवात प्रसन्न व्हावी, यासाठी व्यायाम, अंघोळ, पूजाआणि नंतर न्याहारी असा शास्त्राने क्रम ठरवून दिला आहे. ज्यांना औषध घ्यावे लागते, त्यांचा अपवाद वगळता सुदृढ लोकांनी अंघोळ केल्याशिवाय न्याहारी करू नये, असे म्हटले आहे. सकाळी उठल्यापासून विषय सुखात मन अडकवून न घेता परमात्म्याचे चिंतन करावे मग अन्य विषयांचा विचार करावा, ही त्यामागील भावना आहे. त्याला विज्ञानाने देखील पुष्टी दिली आहे. 

विज्ञान सांगते -व्यायाम केल्याने शरीरातून येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. स्नान केल्याने ती पातळी संतुलित होते. शरीराला शीतलता आणि स्फूर्ती येते आणि भूक देखील लागते. भूक लागल्यानंतर आपण काही खाल्ले तर ते अन्न शरीराला जास्त पुष्टिवर्धक असते. अंघोळ करण्यापूर्वी काही खाल्ले, तर जठराग्नी ते पचवण्याचे कार्य करते. त्यानंतर अंघोळ केल्यास ते थंड पडते आणि पचनक्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि पचनक्रियेचे आजार उद्भवतात. पोटात वात धरतो आणि दिवसभर अस्वस्थता जाणवते. 

म्हणून सकाळी उठल्या उठल्या चहाचा कप, मध लिंबू पाणी, कोमट पाणी असे द्रव पदार्थ काहीही प्या, परंतु व्यायाम, अंघोळ, पूजा झाल्यानंतरच अन्नाचे सेवन करा.