शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दर वेळी संकटाला सामोरे न जाता प्रसंगी जीव वाचवणेही महत्त्वाचे असते; घेऊया महापुरुषांकडून धडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 15:26 IST

प्रसंगी खुद्द श्रीकृष्णाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा हेच धोरण अवलंबिले होते.

धैर्य ही केवळ रणांगणात दाखवण्याची गोष्ट नाही. तर बारीकसारीक निर्णय प्रक्रियेत अचूक निर्णय घेण्यासाठी लागणारा विचार देखील धैर्याचे प्रतीक आहे. कोणताही निर्णय योग्य असतोच असे नाही, तर तो योग्य आहे हे सिद्ध करावे लागते. त्या निर्णयाच्या क्षणी वापरलेल्या सद्सदविवेकबुद्धीलाही धैर्य म्हणतात. प्रत्येक गोष्टीचा सामना करण्यासाठी धैर्य लागते. ते शारीरिक, मानसिक आणि आर्थिक स्वरूपाचे असते. त्याचा योग्य वेळी योग्य तऱ्हेने वापर करावा लागतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी उघडपणे केलेले युद्ध हे धैर्य आणि प्रसंगी केलेला गनिमी कावा, हेदेखील धैर्यच! कृष्णाने केलेले कालियामर्दन हे धैर्य आणि युद्धप्रसंगी रणछोडदास म्हणून पत्करलेली भूमिकासुद्धा धैर्यच! कंस वधानंतर मगधचा जरासंध राजा मथुरेवर आक्रमण करणार होता. कृष्णाने विचार केला, माझ्या एकट्यामुळे मथुरेवर संकट नको, म्हणून त्याने सुरक्षित जागी पलायन केले. लोक काय म्हणतील याचा विचार न करता त्याने रणछोडदास हे विशेषण पत्करले. हे धैर्याचेच प्रतीक म्हणायला हवे ना...!

विपत्काली धैर्य प्रभुपणि सहिष्णुत्व बरवे,सभे पांडित्याचा प्रसर समरी शौर्य मिरवे,स्वकीर्तीच्या ठायी प्रचुर अति विद्याव्यसन जे,तयांचे हे स्वाभाविक गुण सहा सत्पुरुष ते।

संकटकाळी धैर्य? ते पाहिजेच की हो! पण मग एकट्या सत्पुरुषांनाच काय म्हणून? एवढी लहानशी मांजरदेखील बघा, कोणी शेपटी ओढली तर कशी फिसकन अंगावर येते! हाताचा उगारलेला पंजा आणि नागाचा फणा कशाचे प्रतीक आहे? विपत्काला धैर्याचेच ना? म्हणजे एकूणच काय? विपत्काली धैर्य हा स्वाभाविक गुण केवळ सत्पुरुषांनाच लागू होतो असे नाही, तर तो सजीवांचा, अखिल प्राणीमात्रांचा स्वाभाविक गुण आहे. सत्पुरुषांचे धैर्य हे तुमच्याआमच्यापेक्षा निराळे तर नाही ना? याचा विचार करता सॉक्रेटिसची गोष्ट आठवली.

अथेन्समध्ये एका वक्त्याचे धैर्य म्हणजे काय? या विषयावर घणाघाती भाषण झाले. हुतात्म्याची गोष्ट सांगून वक्त्याने समारोपात म्हटले, की अशा तऱ्हेने संकटसमयी तत्व न सोडणे म्हणजे धैर्य!

सॉक्रेटिस खवचट! तो त्या वक्त्याला म्हणतो कसा, 'माफ करा महाशय, तुमच्या भाषणातून धैर्य म्हणजे काय याचा मला बोध झाला नाही. संकटसमयी तत्त्व न सोडणे म्हणजे धैर्य असे आपण म्हणतात. समुद्रात असताना जीवितरक्षणासाठी जहाजावरची जागा सोडू नये, हे तत्व म्हणून ठिक आहे. पण जहाजच बुडू लागले तर?'

यावर वक्ता गडबडला. तो म्हणाला, 'ते निराळं आहे. अशावेळी तत्व सोडणे. जागा सोडणे महत्वाचे आहे. तेदेखील धैर्य आहे.'मग सॉक्रेटिस इथे थांबतोय का? तो म्हणाला, 'महाशय याचा अर्थ असा झाला, की संकटकाळी तत्व न सोडणे म्हणजेही धैर्य आणि तत्व सोडणे म्हणजेही धैर्य, हे खरे ना?'

वक्ता चक्रावून गेला. सॉक्रेटिसला शरण येऊन म्हणाला, 'खरे म्हणजे धैर्य म्हणजे काय हे मलाच कळले नाही.'शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, 'भावनेच्या आहारी न जाता सारासार विचार करून मनाला पटेल तसे वागणे, याला` धैर्य म्हणूया का?'

सॉक्रेटिसने केलेली धैर्याची व्याख्या पाहता मला क्षणार्धात सगळी कोडी उलगडली. सावरकरांची ती समुद्रात घेतलेली उडी, गांधीजींचा प्रामाणिकपणा, शिवाजी महाराजांनी घेतलेला आग्र्याचा निर्णय, विवेकानंदांचे शिकागोतील भाषण, न्या. रानडे यांनी दुसऱ्या लग्नानंतर समाजाची सोसलेली टीका, ही धैर्याची रूपे नव्हे का?

म्हणून कुठलेही आव्हाने आले, की त्याला धीराने तोंड द्या. लगेच बाहू स्फुरण पावून चार हात करायला धावू नका. शांतपणे विचार करून प्रतिसाद द्या. तो विचार तुमच्या ठायी असलेल्या धैर्याची खूण पटवून देईल.