शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Indian Marriage: जया किशोरी सांगतात, 'मुलींसाठी स्थळ निवडताना लक्षात ठेवा 'ही' गोष्ट!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:58 IST

Marriage Rituals: मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना प्रत्येक वधूपित्याने लक्षात ठेवावी अशी गोष्ट सांगत आहेत व्याख्याता जया किशोरी. 

भारतीय लग्नसंस्था पूर्वीसारखी राहिली नसून त्यात अनेक स्थित्यंतर झाली आहेत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सोहळा, आप्त नातलग, मित्र मंडळी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधलेली लग्न गाठ आणि आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याचं दिलेलं वचन! मात्र अलीकडे हे चित्र बदलले आहे. करिअर घडवत असताना लग्नाचं  वाढलेलं वय, स्वभावात आलेली अढी आणि अपेक्षांचे डोंगर यामुळे लग्न ठरणं, होणं आणि टिकणं हे आव्हान झाले आहे. 

लग्न का ठरत नाही विचारावं, तर मुलाकडचे मुलींना आणि मुलीकडचे मुलांना दोष देऊन मोकळे होतात. पूर्वी मुलाकडचे होकार, नकार कळवण्यासाठी तंगवून ठेवायचे, आता मुलीकडचे उत्तर देण्यात दिरंगाई करतात. पर्यायी दोघांची वयं वाढतात आणि पालकांचे अपेक्षा भंग होतात. यावर उपाय म्हणून अध्यात्मिक व्याख्याता जया किशोरी यांनी मुलींना आणि पालकांना एक गोष्ट लक्षात ठेवा असे सांगितले आहे. ती पुढीलप्रमाणे- 

मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना तो अनुरूप आहे की नाही हे लक्षात घ्या. त्याचे रूप, गुण, मिळकत, स्वभाव आपल्या मुलिशी ताडून बघा. त्यात फारकत असेल तर वेळेत नकार कळवण्याचे सौजन्य दाखवा. हीच बाब मुलाकडच्यांनाही लागू होते. 

मात्र जया किशोरी विशेषतः मुलीच्या पालकांना विशेष सल्ला देतात. तो म्हणजे, 'मुलीच्या अपेक्षेप्रमाणे उच्च घरातला मुलगा शोधताना स्वप्नरंजन करू नका! सुखवस्तू कुटुंबात दिलेली मुलगी सुखीच होते असे नाही आणि मध्यमवर्गीय तसेच गरीब घरात दिलेली मुलगी दुःखी असते असेही नाही. दिवस सगळ्यांचेच बदलतात. सीतामाईसाठीदेखील जनक राजाने स्वयंवर ठेवले. शूर, वीर राजे बोलावले. रामाने पण जिंकला. सीतेशी विवाह झाला. आपली जानकी रघुवंशाची महाराणी होणार या विचाराने जनक राजा सुखावला. मात्र सीतेच्या नशिबात कालांतराने वनवास आला. तिने राजसुखाचा त्याग केला आणि वनवासात राहूनही आनंदाने स्वर्ग फुलवला. याचाच अर्थ, सुख निर्माण करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करा. त्यांना खंबीर बनवा. आहे त्या परिस्थितीशी लढा द्यायला शिकवा. तरच त्या सुखाने संसार करू शकतील. 

त्यापेक्षा मुलाचे, घरच्यांचे स्वभाव बघा, आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि जोडी अनुरूप दिसत असल्यास होकार देऊन मोकळे व्हा. अति अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होईलच शिवाय लग्नाचे वय वाढून लग्न करणारच नाही निर्णयापर्यंत मजल जाऊ शकेल हे नक्की! त्यापेक्षा वधू आणि वर मंडळींनी वेळीच सावध व्हा आणि लग्न हा व्यवहार न ठरवता आपुलकीचे नाते जोडा.' 

टॅग्स :marriageलग्न