शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

Indian Marriage: जया किशोरी सांगतात, 'मुलींसाठी स्थळ निवडताना लक्षात ठेवा 'ही' गोष्ट!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 14:58 IST

Marriage Rituals: मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना प्रत्येक वधूपित्याने लक्षात ठेवावी अशी गोष्ट सांगत आहेत व्याख्याता जया किशोरी. 

भारतीय लग्नसंस्था पूर्वीसारखी राहिली नसून त्यात अनेक स्थित्यंतर झाली आहेत. लग्न म्हणजे दोन कुटुंबांचा सोहळा, आप्त नातलग, मित्र मंडळी, देवा ब्राह्मणाच्या साक्षीने बांधलेली लग्न गाठ आणि आयुष्यभर एकमेकांचा सांभाळ करण्याचं दिलेलं वचन! मात्र अलीकडे हे चित्र बदलले आहे. करिअर घडवत असताना लग्नाचं  वाढलेलं वय, स्वभावात आलेली अढी आणि अपेक्षांचे डोंगर यामुळे लग्न ठरणं, होणं आणि टिकणं हे आव्हान झाले आहे. 

लग्न का ठरत नाही विचारावं, तर मुलाकडचे मुलींना आणि मुलीकडचे मुलांना दोष देऊन मोकळे होतात. पूर्वी मुलाकडचे होकार, नकार कळवण्यासाठी तंगवून ठेवायचे, आता मुलीकडचे उत्तर देण्यात दिरंगाई करतात. पर्यायी दोघांची वयं वाढतात आणि पालकांचे अपेक्षा भंग होतात. यावर उपाय म्हणून अध्यात्मिक व्याख्याता जया किशोरी यांनी मुलींना आणि पालकांना एक गोष्ट लक्षात ठेवा असे सांगितले आहे. ती पुढीलप्रमाणे- 

मुलीसाठी मनपसंत जोडीदार निवडताना तो अनुरूप आहे की नाही हे लक्षात घ्या. त्याचे रूप, गुण, मिळकत, स्वभाव आपल्या मुलिशी ताडून बघा. त्यात फारकत असेल तर वेळेत नकार कळवण्याचे सौजन्य दाखवा. हीच बाब मुलाकडच्यांनाही लागू होते. 

मात्र जया किशोरी विशेषतः मुलीच्या पालकांना विशेष सल्ला देतात. तो म्हणजे, 'मुलीच्या अपेक्षेप्रमाणे उच्च घरातला मुलगा शोधताना स्वप्नरंजन करू नका! सुखवस्तू कुटुंबात दिलेली मुलगी सुखीच होते असे नाही आणि मध्यमवर्गीय तसेच गरीब घरात दिलेली मुलगी दुःखी असते असेही नाही. दिवस सगळ्यांचेच बदलतात. सीतामाईसाठीदेखील जनक राजाने स्वयंवर ठेवले. शूर, वीर राजे बोलावले. रामाने पण जिंकला. सीतेशी विवाह झाला. आपली जानकी रघुवंशाची महाराणी होणार या विचाराने जनक राजा सुखावला. मात्र सीतेच्या नशिबात कालांतराने वनवास आला. तिने राजसुखाचा त्याग केला आणि वनवासात राहूनही आनंदाने स्वर्ग फुलवला. याचाच अर्थ, सुख निर्माण करण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करा. त्यांना खंबीर बनवा. आहे त्या परिस्थितीशी लढा द्यायला शिकवा. तरच त्या सुखाने संसार करू शकतील. 

त्यापेक्षा मुलाचे, घरच्यांचे स्वभाव बघा, आर्थिक स्थितीचा आढावा घ्या आणि जोडी अनुरूप दिसत असल्यास होकार देऊन मोकळे व्हा. अति अपेक्षा ठेवल्या तर अपेक्षा भंग होईलच शिवाय लग्नाचे वय वाढून लग्न करणारच नाही निर्णयापर्यंत मजल जाऊ शकेल हे नक्की! त्यापेक्षा वधू आणि वर मंडळींनी वेळीच सावध व्हा आणि लग्न हा व्यवहार न ठरवता आपुलकीचे नाते जोडा.' 

टॅग्स :marriageलग्न