शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
4
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
5
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
7
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
8
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
9
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
10
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
11
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
12
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
13
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
14
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
15
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
16
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
17
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
18
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
19
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
20
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?

मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाकारण्यामागे पूर्वी 'हे' होते कारण...! - सद्गुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:58 IST

मातृत्त्व हे वरदान असेल, तर मासिक धर्मदेखील वरदानच म्हटले पाहिजे. त्याकडे विटाळ म्हणून न पाहता, अन्य नैसर्गिक बाबींप्रमाणेच त्याची गणना केली पाहिजे. 

विटाळ या शब्दाशी स्त्रियांचा काळानुकाळ लढा सुरू होता आणि तो आजतागायत सुरू आहे. मासिक पाळीच्या चार दिवसात स्त्रियांना बाहेर बसवणे, त्यांचा स्पर्श टाळणे, धार्मिक कार्यात सहभागी करून न घेणे अशा गोष्टी आजही अनेक घरातून पाळल्या जातात. पूर्वी या गोष्टी घडवण्यामागे विशिष्ट कारणे होती, मात्र स्थलकालपरत्वे त्यात बदल न करता आजही त्या चालीरीतींचे अंधानुकरण केले जात आहे.

याबाबत स्पष्टीकरण देताना अध्यात्मिक व्याख्याते सद्गुरु मार्गदर्शन करतात, 'आताच्या तुलनेत पूर्वीच्या स्त्रियांना अंगमेहनतीची कामे खूप होती.घरकाम, शेतकाम, चूल-मूल असा संसारगाडा रेटत असताना तिला क्षणभराचीही विश्रांती मिळत नसे. माणूस असो नाहीतर यंत्र, त्याला विश्रांती दिली नाही, तर ते बंद पडेल. आताच्या काळात नोकरी करणाऱ्या महिलांना आठवड्याची सुटी असते किंवा प्रसंगी सुटी घेता येते. पूर्वी तशी काहीच सुविधा नव्हती. यावर उपाय म्हणून मासिक पाळीची चार दिवसांची सक्तीची विश्रांती!

स्त्री मुळातच संवेदनशील असते. त्या चार दिवसात ती अति संवेदनशील होते. तिच्यावर बाह्य परिस्थितीचा विपरित परिणाम होऊ नये, म्हणून त्या दिवसात तिला बंद दाराआड ठेवले जात असे. विटाळ हा शब्द त्यातूनच आला. मात्र, ही सुविधा तिच्यावर जाच म्हणून नाही, तर तिच्या सुरक्षिततेसाठी आणि विश्रांतीसाठी होती. 

पूर्वी मंदिर, शिवालय गावकुसाबाहेर असत. तिथे जंगली श्वापदांची भीती असे. श्वापदांना दूरूनही रक्ताचा वास येतो. अशा स्थितीत स्त्रियांच्या जिवाला धोका नको, म्हणून मासिक पाळीच्या दिवसात त्यांना मंदीरात जाऊ नका असे सांगितले जात असे. तसेच पूर्वी प्रत्येक शिवालयाबाहेर चिंचेचे झाड असे. ते झाड सगळी वाईट ऊर्जा, जीव जिवाणूंना आकर्षून घेत असे. मासिक पाळीच्या काळात स्त्रियांनी तिथे गेल्यास वाईट ऊर्जेचा त्यांच्या शरीरात प्रवेश होईल. तसेच अनावश्यक गोष्टींकडे स्त्रिचे मन आकृष्ट होईल, या विचाराने तिच्यासाठी मंदिराचा प्रवेश निषिद्ध मानला जात असे. 

त्या दिवसात स्त्रियांच्या शरीरात अनेक अंतर्गत बदल घडत असतात. शारीरिक ऊर्जेच्या पातळीवर एक चक्र कार्यान्वित होत असते. तिच्या मनस्थितीत अनेक बदल घडत असतात. घटकेत राग, तर घटकेत आनंद, अशी तिची भावावस्था असते. अशा अवस्थेत धार्मिक कार्यात सहभागी होताना तिचे मन रमणार नाही, म्हणून तिला धार्मिक कार्यात सहभागी न होण्याची सूट दिली जात असे. या गोष्टींमागी तर्क समजून न घेता आपण केवळ शास्त्र म्हणून त्याकडे पाहत आलो. मात्र वेळोवेळी आपण शास्त्राची उकल करून घेतली पाहिजे. त्यामुळे जुन्या गोष्टी कालसुसंगत कशा होत्या आणि त्यात कालानुरूप काय बदल केले पाहिजेत, यावर विचार करणे सोपे होईल.

आता परिस्थिती खूप बदलली आहे. आपण शहरात राहतो. गावाकडेही परिस्थिती सुधारली आहे. दळणवळणासाठी तसेच घरकामासाठी अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत. स्त्रियांचे कष्ट पूर्वीच्या तुलनेत कमी झाले आहेत. परंतु, आजही त्या दिवसात होणारा शारीरिक त्रास पाहता, स्त्रियांना शारीरिक आणि मानसिक विश्रांतीची गरज असते. ती त्यांना मिळालीच पाहिजे. मात्र, त्यासाठी धार्मिक बंधनांची गरज नाही. कारण मासिक पाळी ही धार्मिक बाब नसून वैज्ञानिक बाब आहे. 

मासिक पाळीला मासिक धर्म असेही म्हणतात. जो निसर्गाने स्त्रियांना बहाल केला आहे. ते चक्र नियमित सुरू राहिले, तरच तिला मातृत्त्वाचे सौख्य प्राप्त होते. मातृत्त्व हे वरदान असेल, तर मासिक धर्मदेखील वरदानच म्हटले पाहिजे. त्याकडे विटाळ म्हणून न पाहता, अन्य नैसर्गिक बाबींप्रमाणेच त्याची गणना केली पाहिजे. 

" target="_blank">

टॅग्स :womens healthस्त्रियांचे आरोग्य