शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा जादुई चष्म्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:39 IST

ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?

एका गावात एक अडाणी शेतकरी होता. जमिनीच्या वादावरून त्याची कोर्टात केस चालू होती. आपल्या कागदपत्रांची फाईल घेऊन तो शहरात एका वकिलाकडे आला.

वकिलाने टेबलावरचा चष्मा उचलून डोळ्याला लावला आणि फायलींची पानं तो उलटू लागला. उलट सुलट कागद पाहिल्यानंतर तो म्हणाला, `तुमच्या केसमध्ये काही दम नाही, तरीही हा खटला तुम्ही नक्कीच जिंकाल'

शेतकऱ्याने विचार केला, की काय आश्चर्य आहे! वकिलाने चष्मा लावताच आपण केस जिंकणार असे सांगितले. नक्कीच त्या चष्म्यामध्ये काहीतरी जादू असणार! असा विचार करून त्याने वकिलाला विचारले, `साहेब, आपण हा चष्मा कोठून खरेदी केला?' वकिलाने त्याल दुकानदाराचे नाव सांगितले. शेतकरी त्या दुकानात गेला. त्याने अगदी तसाच चष्मा दुकानदाराकडून खरेदी केला. नंतर आपल्या गावी गेल्यावर त्याने घोषणा केली, की ज्याचा कोणाचा कोर्टात खटला चालू असेल, तो खटला ते जिंकणार की नाही, हे सांगण्यासाठी कोणालाही वकिलाकडे जाण्याची गरज लागणार नाही. मी तुम्हाला सांगेन की कोण जिंकणार आणि कोण हरणार!

सगळ्यांनीच नाही, पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ते आपापल्या खटल्याच्या फाईली घेऊन त्याच्याकडे गेले. शेतकऱ्याने टेबलावर चष्मा ठेवला होता. तो उचलून त्याने डोळ्याला लावला. चष्मा लावून त्याने फाईल २-३ वेळा उलट-सुलट चाळून पाहिल्या. पण त्याला काही दिसले नाही. लिहिलेली अक्षरं मात्र मोठी दिसत होती. त्याला अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे त्याला काही कळेना. त्याला वाटले चष्मा पुढे काय घडणार याचे आगाऊ भविष्य सांगत असेल. पण तसे काहीही घडले नाही.

चष्मा तर तसाच आहे, मग चमत्कार का घडत नाही? त्याने शंभर वेळा फाईल चाळून पाहिली. पण...व्यर्थ! गावातल्या एका समजूतदार माणसाने त्याची अवस्था पाहिली आणि त्याला समजावले, `भाऊ, हा चष्मा फक्त अक्षर मोठे करून दाखवतो. तुम्हाला तर अक्षरओळखही नाही. मग या चष्म्याचा तुम्हाला काय उपयोग? केवळ वकिलासारखा चष्मा लावल्याने कोणी कायदेपंडित होत नाही. त्यासाठी कायद्याचे ज्ञान असावे लागते. शिवाय तुम्हाला फाईलीतलेही काही कळणार नाही. समजले?'शेतकऱ्याला आपल्या मूर्खपणाची खात्री पटली. त्याने आपली चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली. 

भक्तीच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. बाह्य वेशभूषा पाहून आपण एखाद्याला `संत' `महात्मा' समजतो. परंतु त्याला जर ईश्वराचे ज्ञानच नसेल, तर त्याची अवस्था ही अशिक्षित शेतऱ्यासारखी होते. म्हणून महत्त्व बाह्य रूपाला नसून ज्ञानाला आहे. ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?