शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा जादुई चष्म्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:39 IST

ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?

एका गावात एक अडाणी शेतकरी होता. जमिनीच्या वादावरून त्याची कोर्टात केस चालू होती. आपल्या कागदपत्रांची फाईल घेऊन तो शहरात एका वकिलाकडे आला.

वकिलाने टेबलावरचा चष्मा उचलून डोळ्याला लावला आणि फायलींची पानं तो उलटू लागला. उलट सुलट कागद पाहिल्यानंतर तो म्हणाला, `तुमच्या केसमध्ये काही दम नाही, तरीही हा खटला तुम्ही नक्कीच जिंकाल'

शेतकऱ्याने विचार केला, की काय आश्चर्य आहे! वकिलाने चष्मा लावताच आपण केस जिंकणार असे सांगितले. नक्कीच त्या चष्म्यामध्ये काहीतरी जादू असणार! असा विचार करून त्याने वकिलाला विचारले, `साहेब, आपण हा चष्मा कोठून खरेदी केला?' वकिलाने त्याल दुकानदाराचे नाव सांगितले. शेतकरी त्या दुकानात गेला. त्याने अगदी तसाच चष्मा दुकानदाराकडून खरेदी केला. नंतर आपल्या गावी गेल्यावर त्याने घोषणा केली, की ज्याचा कोणाचा कोर्टात खटला चालू असेल, तो खटला ते जिंकणार की नाही, हे सांगण्यासाठी कोणालाही वकिलाकडे जाण्याची गरज लागणार नाही. मी तुम्हाला सांगेन की कोण जिंकणार आणि कोण हरणार!

सगळ्यांनीच नाही, पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ते आपापल्या खटल्याच्या फाईली घेऊन त्याच्याकडे गेले. शेतकऱ्याने टेबलावर चष्मा ठेवला होता. तो उचलून त्याने डोळ्याला लावला. चष्मा लावून त्याने फाईल २-३ वेळा उलट-सुलट चाळून पाहिल्या. पण त्याला काही दिसले नाही. लिहिलेली अक्षरं मात्र मोठी दिसत होती. त्याला अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे त्याला काही कळेना. त्याला वाटले चष्मा पुढे काय घडणार याचे आगाऊ भविष्य सांगत असेल. पण तसे काहीही घडले नाही.

चष्मा तर तसाच आहे, मग चमत्कार का घडत नाही? त्याने शंभर वेळा फाईल चाळून पाहिली. पण...व्यर्थ! गावातल्या एका समजूतदार माणसाने त्याची अवस्था पाहिली आणि त्याला समजावले, `भाऊ, हा चष्मा फक्त अक्षर मोठे करून दाखवतो. तुम्हाला तर अक्षरओळखही नाही. मग या चष्म्याचा तुम्हाला काय उपयोग? केवळ वकिलासारखा चष्मा लावल्याने कोणी कायदेपंडित होत नाही. त्यासाठी कायद्याचे ज्ञान असावे लागते. शिवाय तुम्हाला फाईलीतलेही काही कळणार नाही. समजले?'शेतकऱ्याला आपल्या मूर्खपणाची खात्री पटली. त्याने आपली चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली. 

भक्तीच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. बाह्य वेशभूषा पाहून आपण एखाद्याला `संत' `महात्मा' समजतो. परंतु त्याला जर ईश्वराचे ज्ञानच नसेल, तर त्याची अवस्था ही अशिक्षित शेतऱ्यासारखी होते. म्हणून महत्त्व बाह्य रूपाला नसून ज्ञानाला आहे. ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?