शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

नक्कल करून अक्कल येत नाही; वाचा जादुई चष्म्याची गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 14:39 IST

ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?

एका गावात एक अडाणी शेतकरी होता. जमिनीच्या वादावरून त्याची कोर्टात केस चालू होती. आपल्या कागदपत्रांची फाईल घेऊन तो शहरात एका वकिलाकडे आला.

वकिलाने टेबलावरचा चष्मा उचलून डोळ्याला लावला आणि फायलींची पानं तो उलटू लागला. उलट सुलट कागद पाहिल्यानंतर तो म्हणाला, `तुमच्या केसमध्ये काही दम नाही, तरीही हा खटला तुम्ही नक्कीच जिंकाल'

शेतकऱ्याने विचार केला, की काय आश्चर्य आहे! वकिलाने चष्मा लावताच आपण केस जिंकणार असे सांगितले. नक्कीच त्या चष्म्यामध्ये काहीतरी जादू असणार! असा विचार करून त्याने वकिलाला विचारले, `साहेब, आपण हा चष्मा कोठून खरेदी केला?' वकिलाने त्याल दुकानदाराचे नाव सांगितले. शेतकरी त्या दुकानात गेला. त्याने अगदी तसाच चष्मा दुकानदाराकडून खरेदी केला. नंतर आपल्या गावी गेल्यावर त्याने घोषणा केली, की ज्याचा कोणाचा कोर्टात खटला चालू असेल, तो खटला ते जिंकणार की नाही, हे सांगण्यासाठी कोणालाही वकिलाकडे जाण्याची गरज लागणार नाही. मी तुम्हाला सांगेन की कोण जिंकणार आणि कोण हरणार!

सगळ्यांनीच नाही, पण काही लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ते आपापल्या खटल्याच्या फाईली घेऊन त्याच्याकडे गेले. शेतकऱ्याने टेबलावर चष्मा ठेवला होता. तो उचलून त्याने डोळ्याला लावला. चष्मा लावून त्याने फाईल २-३ वेळा उलट-सुलट चाळून पाहिल्या. पण त्याला काही दिसले नाही. लिहिलेली अक्षरं मात्र मोठी दिसत होती. त्याला अक्षर ओळखही नव्हती. त्यामुळे त्याला काही कळेना. त्याला वाटले चष्मा पुढे काय घडणार याचे आगाऊ भविष्य सांगत असेल. पण तसे काहीही घडले नाही.

चष्मा तर तसाच आहे, मग चमत्कार का घडत नाही? त्याने शंभर वेळा फाईल चाळून पाहिली. पण...व्यर्थ! गावातल्या एका समजूतदार माणसाने त्याची अवस्था पाहिली आणि त्याला समजावले, `भाऊ, हा चष्मा फक्त अक्षर मोठे करून दाखवतो. तुम्हाला तर अक्षरओळखही नाही. मग या चष्म्याचा तुम्हाला काय उपयोग? केवळ वकिलासारखा चष्मा लावल्याने कोणी कायदेपंडित होत नाही. त्यासाठी कायद्याचे ज्ञान असावे लागते. शिवाय तुम्हाला फाईलीतलेही काही कळणार नाही. समजले?'शेतकऱ्याला आपल्या मूर्खपणाची खात्री पटली. त्याने आपली चूक मान्य करून सर्वांची माफी मागितली. 

भक्तीच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. बाह्य वेशभूषा पाहून आपण एखाद्याला `संत' `महात्मा' समजतो. परंतु त्याला जर ईश्वराचे ज्ञानच नसेल, तर त्याची अवस्था ही अशिक्षित शेतऱ्यासारखी होते. म्हणून महत्त्व बाह्य रूपाला नसून ज्ञानाला आहे. ज्याच्याकडे ज्ञानाची दृष्टी नाही, तो जगाचे कल्याण करण्याची जादू कशी करणार?