शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

आयुष्यातील जटिल प्रश्न चुटकीसरशी सोडवायचे असतील तर मानसशास्त्रात दिलेला 'हा' प्रयोग करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 16:07 IST

आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर समस्या येतच राहणार आहेत, त्या संपायची वाट पाहत बसलो तर आयुष्यच संपून जाईल म्हणून हा प्रयोग!

मानसशास्त्राचा तास सुरू होणार होता. विद्यार्थी आपापल्या जागेवर बसले होते. शिक्षक येताच सगळ्यांनी एकत्र उभे राहून त्यांना अभिवादन केले. शिक्षकांनी सर्वांना बसण्याची अनुमती दिली. टेबलावर पाण्याचा एक पेला आणि जग ठेवला होता. शिक्षकांनी रिकामा पेला अर्धा भरला आणि तो हातात धरत विद्यार्थ्यांकडे पाहिले. विद्यार्थ्यांना वाटले, आता नेहमीचा ठरलेला प्रश्न विचारला जाणार, `पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा?'

पण तसे झाले नाही. शिक्षकांनी वेगळाच प्रश्न विचारला. ते म्हणाले, पाणी ओतलेल्या या पेल्याचे वजन साधारण किती असेल? या अनपेक्षित प्रश्नाने विद्यार्थी गोंधळले. त्यांनी आपल्या परीने वेगवेगळी उत्तरे दिली. त्यांचे बोलून झाल्यावर शिक्षक म्हणाले, `पेल्याचे वजन किती आहे, हे महत्त्वाचे नसून पाण्याचा पेला तुम्ही किती वेळ धरून ठेवणार आहात, हे महत्त्वाचे आहे. हा पेला तुम्ही एक मिनिटं धरून ठेवला तर तुम्हाला त्याचे वजन जाणवणार नाही. तासभर धरून ठेवला, तर हाताला मुंग्या येतील. एक दिवसभर धरून ठेवला, तर हात जड होईल आणि कधी एकदा तो पेला हातून टाकून देतो असे होईल.

तीच बाब आपल्या समस्यांची आहे. आपले प्रश्न, समस्या यांच्याकडे काही क्षण पाहिले, तर आपल्याला त्रास होणार नाही. तासभर त्याचा विचार केला, तर डोके जड होईल. दिवसभर विचार केला तर डोके भणाणून जाईन. मग सबंध आयुष्य त्याच चिंतांचा, समस्यांचा विचार करत राहिलो तर वेड लागण्याचीच वेळ येईल. 

यावर उपाय हाच आहे, की जे प्रश्न सोडवता येतील त्याची उकल शोधण्याचा प्रयत्न करा. विचार करायचाच असेल तर पर्यायाचा करा, समस्यांचा नाही! तोही किती वेळ करायचा हे ठरवून टाका. कोणतेही कारण असो, त्रास तुम्हालाच होणार आहे. तो करून घेऊ नका. पाण्याचा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा याचबरोबर तो किती वेळ धरून ठेवायचा, याचाही विचार करून ठेवा. 

मनसोक्त जगा. प्रश्न आज आहेत उद्या नाहीत. परिस्थिती बदलत असते. अति विचाराने प्रश्न सुटत नाहीत. जे लोक प्रश्न कधी सुटतील याचा विचार करतात, ते कायम अडकून राहतात आणि जे लोक प्रश्न कसे सुटतील यासाठी प्रयत्न करतात, ते हमखास परिस्थितीतून मार्ग काढतात. जे प्रश्न सुटत नाहीत, ते सोडून द्या, आपोआप सुटतील. परंतु प्रश्नांमागे लागून आयुष्य संपवू नका. आयुष्यात करण्यासारखे बरेच काही आहे. यासाठी शाळेतला एक नियम लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्नपत्रिका हाती आल्यावर येत असलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहून आपण मोकळे होत असू आणि जे येत नाहीत, ते सोडून देत असू, हाच सोपा उपाय आयुष्याची प्रश्नपत्रिका सोडवताना उपयोगात आणू, म्हणजे सोडवलेले प्रश्न जास्त गुणांची कमाई करून देतील. 

टॅग्स :Mental Health Tipsमानसिक आरोग्य